tag:blogger.com,1999:blog-14526031649094667312024-03-05T10:43:18.893+05:30पॅपीलॉनPrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.comBlogger79125tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-48620171195817685982012-07-17T18:48:00.000+05:302012-09-19T18:51:29.091+05:30सुवर्णक्षणमागल्या शनिवारी अर्थात ७ जुलैला आमचे नित्याचेच उद्योग चालू होते. त्यातच ऐन दुपारी मोबाइलने मान टाकली आणि तो दुरुस्तीला द्यावा लागला. रात्री मोबाइल ताब्यात घेतला आणि घराकडे कूच केली. साधारण रात्री १०.३० च्या सुमाराला मिस कॉल अॅलर्ट मिळाला की 'हे नराधमा तुला एकूण ३१ मिस कॉल येऊन गेलेले आहेत.' येवढी कोणा कोणाला बॉ माझी आस लागली आहे, असा विचार करून एकेका मिस कॉलला डायल करायला सुरुवात केली. पहिला फोन लावला तो आमचे मित्र कीर्तिकुमार ह्यांना मुंबईला.
'काय रे फोन करत होतास का ? माझा डब्बा दुरुस्तीला दिला होता, आत्ता चालू केला आहे.'
"प्रसाद, अरे किती फोन लावायचे तुला? तुला उद्या मातोश्रीला जायचे आहे, तुझ्या प्रकाशनाच्या पुस्तकाचे बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे,"
पुढे तो काय काय बोलला हे मला अजूनही आठवत नाही. आ.श्री. दिवाकर रावते ह्यांच्या 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचा मी प्रकाशक असल्याने त्या पुस्तकाच्या उद्घाटनाला मी हजर राहायलाच हवे आहे येवढेच माझ्या डोक्यात शिरले. काही वेळाने डोके काम करायला लागल्यावरती पुन्हा एकदा फोना फोनी करून ही गंमत नसल्याची खातरजमा करून घेतली. अर्थात त्या क्षणानंतर जी धाकधूक आणि काहीशी विचित्र मन:स्थिती होती तिचे वर्णन करणे खरेतर अशक्यच आहे. सकाळी ११ च्या सुमाराला समारंभ असल्याने पहाटेच मुंबईला निघणे आवश्यक होते. मन अजूनही खात्री देत नव्हतेच. अशातच श्रावण मोडकांना फोन करून त्यांच्या कानावरती बातमी घातली आणि कौतुकाचे चार बोल ऐकून घेतले.
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Parampara/index-page-001.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="300" width="500" src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Parampara/index-page-001.jpg" /></a></div>
सकाळी शिवनेरीने थेट दादर गाठले. मातोश्री परिसरातला बंदोबस्त पाहून हबकलोच. अहो एक चिलखती गाडी देखील तिथे उभी होती. श्री. दिवाकर रावतेंनी आमची नावे आधीच देऊन ठेवली असल्याने, आणि स्वतः ते देखील उपस्थित असल्याने चौकशी टळली, मात्र सलग तीन ठिकाणी तपासणीला सामोरे जावेच लागले. एकेक तपासणी नाका पार करत एकदाचे मातोश्री मध्ये प्रवेशकर्ते झालो आणि पुन्हा एकदा मातोश्रीच्या अंगणात तपासणीला सामोरे जावे लागले. पायर्या चढून मातोश्रीत शिरलो आणि कसेतरी दाबून धरलेले दडपण पुन्हा एकदा उसळी मारून वरती आले. आजूबाजूचे काय बोलत आहेत, काय विचारत आहेत हे देखील पटकन कळत नव्हते. हॉल मधून आत शिरताच लक्ष वेधून घेते ते माँ साहेब आणि बाळासाहेबांचे फुलसाईझ भव्य चित्र. जणू दोघे समोरच उभे आहेत असा सतत भास होतो. काही वेळाने 'साहेब आले आहेत, वरती बोलावले आहे. पण फक्त पाच जणांनीच चला' असा निरोप आला आणि आम्ही लिफ्ट मधून वरच्या मजल्यावरती पोचलो.
लिफ्टमधून बाहेर आलो तर समोरच्या जिन्यात साध्याश्या टीशर्ट आणि पँट मध्ये श्री. उद्धव ठाकरे उभे होते. त्यांना मी ओळखलेच नाही, इतक्या साधेपणाने ते तिथे वावरत होते. सगळ्यात पुढे श्री. दिवाकर रावते, त्यानंतर सामना, नवाकाळचे दोन पत्रकार, फोटोग्राफर आणि सगळ्यात मागे थांबलेलो मी. रावते साहेब आत गेले तेव्हा आम्ही बाहेरच थांबलो होतो. सगळ्यात शेवटी जावे आणि शक्यतो मागेच थांबावे अशा विचारता मी असतानाच आतून 'ताम्हनकर, या आत या' असा आवाज आला आणि आपोआप मोकळी झालेली वाट तुडवत मी साहेबांच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केला. आजवर फक्त न्यूज चॅनलमध्येच ही खोली पाहिली होती. खोली कसली, मस्त मोठा हॉल आहे तो. हॉल डाव्या हाताच्या भिंतीजवळ त्यांच्या नेहमीच्या खुर्ची वरती साहेब बसले होते. इतका मोठा हॉल तो, पण बाळासाहेबांच्या नुसत्या उपस्थितीनेच भरल्यासारखा वाटत होता. आत गेल्यानंतर काही वेळाने हा हॉल नुसता भरलेलाच नसून भारलेला देखील आहे हे जाणवले.
आत शिरल्या शिरल्याच मा. बाळासाहेबांनी 'ए कोणी वाकून नमस्कार वगैरे करू नका बरं का. मला अजिबात आवडत नाही ते' असा खणखणीत आदेशच दिला. एका हाताच्या अंतरावरून त्या हिंदूहृदयसम्राटाला बघताना आणि तो गरजता आवाज ऐकताना असे काही रोमांच उभे राहिले म्हणून सांगू.. अंग चोरतच कसा तरी मी साहेबांच्या डाव्या हाताला उभा राहिलो. सोबत आणलेला पुष्पगुच्छ साहेबांच्या हातात देताना माझ्या हातांची थरथर मलाच जाणवच होती. साहेबांनी पुष्पगुच्छ हातात घेताच मी पटकन हात मागे घेतले. हो उगाच हाताची थरथर जाणवायला नको.
"अहो थांबा, हात लावून ठेवा. फोटो काढतायत ते."
पुन्हा एकदा आमचे हात पुष्पगुच्छाला चिकटले. फोटो काढून होताच पुष्पगुच्छ बाजूला ठेवण्यात आला आणि तीच संधी साधून मी साहेबांच्या पाया पडून घेतले. पाठीवरती हात आला आणि मी उभा राहिलो. साहेबांनी एकदा माझ्याकडे पाहिले आणि काहीतरी विचारायला रावते साहेबांकडे वळले. अचानक पुन्हा माझ्याकडे वळले आणि त्या भारून टाकणार्या आवाजात साहेबांनी विचारले "कानात काय घातले आहे हो तुम्ही ते?"
झाले, आमची हवा गुल. कोरडे पडलेले ओठ आणि सुकलेला घसा ओला करत कसेतरी ' भि क बा ळी' हे शब्द तोंडात गोळा करत असतानाच साहेबच पुन्हा म्हणाले. "भिकबाळी आहे का हो ती? "
"हो साहेब.."
"खर्या भिकबाळीचे डिझाइन असे नसते, हे जरा वेगळे दिसते आहे. कोणाची युक्ती ही ?"
"म म म.. माझीच साहेब."
"छान दिसते आहे. मग पेशवे का तुम्ही ?
ह्या प्रश्नावर काय बोलावे तेच सुचेना. तेवढ्यात बाजूला सामनाचे श्री. द्विवेदी साहेब उभे होते. ते पटकन म्हणाले "साहेब, अहो पुण्याचेच आहेत ते."
साहेब पुन्हा माझ्याकडे बघून विचारते झाले, "पुण्याचे का? मग गाता का तुम्ही?" ह्या प्रश्नावरती आजूबाजूला छान हशा पिकला आणि आमचे 'त त प प..' पुन्हा वाढले.
"नाही साहेब गात नाही."
"मग काय करत ?"
"साहेब प्रकाशन करतात ते" परस्पर कोणीतरी माहिती पुरवली.
"फक्त प्रकाशन करता ? किती प्रकाशन केलीत आजवर?" साहेबांचा कळीचा प्रश्न आला.
"अं.. भरपूर केलीत साहेब." काय पण उत्तर दिले मी. वाह ! पुन्हा एकदा आजूबाजूला छानशी खसखस पिकली.
त्या परिस्थितीतून माझी सुटका करायला रावते साहेब अगदी देवासारखे धावले आणि त्यांनी साहेबांसाठी आणलेली शाल माझ्यापुढे केली. एकतर साहेब बाजूला उभे असल्याचे दडपण, त्यात त्यांच्या प्रश्नांनी उडालेली भंबेरी अशा अवस्थेत मला धड शालीची घडी देखील उलगडता येईना. शेजारी श्री. उद्धव ठाकरे छानशे माझी अवस्था बघून गालातल्या गालात हसत होते. शेवटी रावते साहेबांनीच शाल उघडून दिली आणि ती थरथरत्या हाताने मी बाळासाहेबांना पांघरली. मखमली कापडात गुंडाळलेल्या पुस्तकाच्या प्रती आल्या आणि मा. बाळासाहेब आणि श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Parampara/DSC_0226.jpg" imageanchor="1" style="margin-left:1em; margin-right:1em"><img border="0" height="300" width="500" src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Parampara/DSC_0226.jpg" /></a></div>
आता कधी एकदा इथून बाहेर पळतोय अशी माझी अवस्था झाली होती. प्रकाशन आटोपले आणि बाळासाहेब पुन्हा एकदा विचारते झाले, "हं कशावरती केले आहे पुस्तक ?"
"साहेब, मंत्रालयाला जी आग लागली, त्या घटनेवरती केले आहे." रावते साहेबांनी माहिती दिली.
"अरे ! येवढ्यात छापून देखील आले ?" येवढे बोलून साहेब माझ्याकडे वळले आणि म्हणाले, "तुम्हाला माहिती होते का आधी हे घडणारे म्हणून ? आधीच तयारीला लागला होतात का काय ?" हास्याची एक जोरदार लाट उसळली आणि त्या लाटेत मी आपले कसेतरी गुळमुळीत 'नाही नाही..' येवढेच बोलू शकलो. मग पुन्हा एकदा तोच प्रश्न रावते साहेबांना देखील विचारला गेला.
साहेबांनी पुस्तक चाळले, त्याच्या किमतीची माहिती करून घेतली, त्यातील लेखांची माहिती घेतली, सामनातले कुठले कुठले लिखाण त्यात समाविष्ट केले आहे ते देखील आवर्जून जाणून घेतले. ते रूप, तो आवाज, तो करारीपण, प्रत्येक गोष्टीवरचे बारीक लक्ष पाहून क्षणभर वाटले की 'साहेबांच्या प्रकृतीची, ते भाषण करू शकतील का नाही' ह्याची सतत विनाकारण वांझोटी चिंता करणार्या काही सुमार पत्रकारांना ह्या क्षणी इथे बोलावावे आणि 'आता लिहा बरं तुमची बातमी' असे सांगावे.
जाता जाता :- शक्यतो महिन्याभरातच माझ्या नवीन ग्रंथदालनाची सुरुवात करतो आहे. ह्या प्रसंगी मिपाकरांना खास सवलतीत पुस्तके देण्याचा मानस आहे. तरी ज्यांची खरेदीची इच्छा असेल त्यांनी व्यनी अथवा खरडीतून नोंदणी करावी अशी विनंती. पुस्तके तुमच्या हातात पडल्यावरतीच पैशाची देवाण घेवाण होणार आहे. ह्या व्यवहाराचा व मिपाचा काहीही संबंध नाही.
PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-35154554110728859462012-07-11T19:05:00.000+05:302012-09-19T19:08:41.114+05:30सस्नेह निमंत्रण<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
नमस्कार,
माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे.
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://lh3.googleusercontent.com/-_inS_OznQU4/Tt8m5E9LhgI/AAAAAAAAA6Q/D9f-CSQK3lc/s640/Marathi-cover.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="486" src="https://lh3.googleusercontent.com/-_inS_OznQU4/Tt8m5E9LhgI/AAAAAAAAA6Q/D9f-CSQK3lc/s640/Marathi-cover.jpg" width="640" /></a></div>
तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. तुम्हा वाचकांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे. तेव्हा सर्वांनी यायचेच आहे.
प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम)
कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता.*
*माननीय श्री. राजसाहेब ठाकरे येणार असल्याने, होणारी गर्दी लक्षात घेता जागा मिळवण्यासाठी शक्यतो थोडे आधीच आल्यास उत्तम.
प्रसाद ताम्हनकर
९७३०९५६३५६<br />
<br />
======================<br />
<br />
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने सोहळा उत्तम पार पडला. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<a href="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/PP_zps4f968c95.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="450" src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/PP_zps4f968c95.jpg" width="600" /></a></div>
PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-16324214258900849622012-07-04T13:26:00.000+05:302012-09-18T18:15:40.560+05:30गँग्ज ऑफ वासेपुर<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/gangs_of_wasseypur_review_movie.jpg" width="" height="" />
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे. 'वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यास मुलगा उत्सुक'. झाली संपली कथा. खरे तर संपली नाही, अजून एक भाग यायचा आहे. ह्या चित्रपटाचे समीक्षण लिहिताना, समीक्षण म्हणण्यापेक्षा ह्या चित्रपटाविषयी तुम्हाला माहिती देताना आधी चित्रपटाबद्दल घेतले गेलेले आक्षेप आणि चित्रपटाच्या चांगल्या वाईट गोष्टींची दखल घेऊ.
सगळ्यात मोठा आक्षेप होता तो म्हणजे 'हा चित्रपट दोन भागात काढायचे कारणच काय ?'
हा आक्षेप घेणार्यांवरती खदखदून हसावे, का त्यांची कीव करावी हेच मला नक्की कळत नाहीये. मुळात हा चित्रपटच पाच तासाचा आहे , हे किती आक्षेप घेणार्यांना माहिती आहे ? ह्या चित्रपटाचे पहिले दर्शन 'Cannes Directors' Fortnight' ला करण्यात आले होते, त्यावेळी संपूर्ण लांबीचा चित्रपट दाखवण्यात आला. बॉलीवूड आणि हिंदी दर्शक ह्यांची मानसिकता लक्षात घेऊन मग तो दोन भागात प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले.
<object width="560" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/j-AkWDkXcMY?version=3&hl=en_US&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/j-AkWDkXcMY?version=3&hl=en_US&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="560" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object>
आक्षेप २ :- चित्रपटातील किळसवाणे, अश्लीलतेकडे झुकणारे संवाद आणि हिंसा.
इथे मात्र अनुराग कश्यपला विचार करण्यास नक्की संधी आहे. सरदार खान (मनोज वाजपेयी, रामाधीर सिंह (तिग्मांशु धुलिया) किंवा अगदी एहसान कुरेशी (विपिन शर्मा) हे अडाणी, असंस्कारीत असले तरी ते ज्या प्रकारे टोळ्या सांभाळत असतात ते बघता त्यांची भाषा अक्षरशः एखाद्या देशी दारूच्या गुत्तेवाल्याच्या तोंडी शोभावी अशी देण्यात आली आहे. ते रांगड्या भाषेत जे शब्द बोलतात, तेच शब्द अगदी वेगळ्या प्रकारे ह्या आधी आपल्या कानावरती गेले आहेत, पण ते सुसह्य होते. कारण 'सूंघ के देख आज मंत्रीजी ने क्या खाया है' किंवा 'तेरी कह के लूंगा' सारखी वाक्ये आपण 'खाया पिया सबको पता चल जायेगा' , 'तुम दोनोने एक ही आयटम बजाया था' अशा बंबय्या गॅंग्जच्या भाषेत ऐकली होती. जी कधी ना कधी कानावरून गेली होती, किंवा नसली तरी असह्य वाटली नव्हती. इथे मात्र अनुरागचे गुण नक्की कमी होणार. राहिला मुद्दा हिंसेचा, तर हात मुख्य संघर्ष दाखवला आहे तो कुरेशी आणि खान ह्या दोन स्थानिकांमधला. कुरेशी जमात ही खाटीक, त्यामुळे त्यांच्याकडून दाखवलेला हिंसाचार हा अक्षरशः कसाई बकर्या कापतो तसाच अंगावर येणार दाखवणे गरजेचे. कुठेतरी प्राणी आणि माणसे ह्यात हे कुरेशी काहीच फरक जाणत नाहीत असे काहीसे दाखवण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. दुसर्या बाजूला वर्षानुवर्षे कुरेंशीच्या आधिपत्याखाली पिचणारे खान जेव्हा स्वतःच्या ताकदीवरती विश्वास ठेवायला लागतात, तेव्हा त्याच्याकडून आलेले प्रत्युत्तर देखील त्याच ताकदीचे दाखवणे गरजेचे होते. वर्षानुवर्षाचा राग, संताप, द्वेष, अन्यायाची चीड ही त्या हल्ल्यांमधून बाहेर पडत असताना दिसायला हवीच होती.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/gangs-of-wasseypur_350_051012111009.jpg" alt="1" />
हा हिंसाचार अंगावरती काटा आणतो हे नक्की, पण ह्याहून अधिक भयावह हिंसाचार आपण पाहिलेला आहे. अर्थात तो अॅटोमॅटिक रायफल्स, मशीनगन्स इत्यादींनी केलेला असल्याने आपल्या सरावाचा आहे. पण हा चित्रपट ज्या कालखंडात घडतो तो कालखंड पाहता त्या काळातल्या हत्यारांनीच हा हिंसाचार लडबडलेला असणे योग्यच नाही का ? खाटीक त्याच्या हातातल्या सुर्याने एखाद्याला मारेल, तेव्हा तो काय अगदी व्यवस्थित पोटात सुरा खुपसणे ह्या सारखे प्रकार करणार नाही. तो सरळ बकरा कापतो तसे खपाखप वार करणार आणि मोकळा होणार.
आक्षेप ३ :- अनुराग कश्यप डायरेक्टर म्हणून कुठेच जाणवत नाही. बिहार देखील मनात ठसत नाही.
हा आक्षेप घेणारी बहुतांश मंडळी ही 'प्रकाश झा, रामगोपाल वर्मा ' ने झपाटलेली असावीत असा मला संशय आहे. झा साहेबांनी आपल्या अनेक चित्रपटांमधून जो बिहार उभा केला, तो बिहारच आता दर्शकांची ओळख बनला आहे. बिहारचे राजकारणी, बाहुबली, तिथली घरे, पोलीस, तिथली भाषा ह्या सगळ्यांचा एक वेगळाच ठसा काही लोकांनी स्वतःवरती उमटवून घेतला आहे. मराठी माणूस म्हणजे हवालदार किंवा हीरोचा मूर्ख मित्र, किंवा गेला बाजार जोकर वाटावा असा राजकारणी अशी जी एक प्रतिमा काही काळापूर्वी बॉलीवूड मध्ये होती, तसेच काहीसे बिहारचे होत आहे. मुळात हा चित्रपट बिहारचा उत्कर्ष / अधःपतन / तिथल्या राजकारणाच्या खेळ्या, बाहुबलींचे राज्य, स्वातंत्र्याचे फायदे -तोटे हे ज्या काळात सुरू झाले, तो काळ दाखवतो हे आधी लक्षात घ्यायला हवे. ह्या चित्रपटाकडून तुम्ही एकदम मुरलेले राजकारणी, सहजपणे गळा चिरणारे आणि नामानिराळे राहणारे बाहुबली, कर्तव्यदक्ष / लाचखोर पोलीस बघण्याची अपेक्षाच करू शकत नाही. तसेच रामगोपाल वर्मा दाखवतात त्या काळातल्या गँगवॉरची आणि बिहारमधल्या चित्रपटात दाखवलेल्या काळाची तुलना देखील अशक्यच.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/imagesCA755PQM.jpg" alt="2" />
आक्षेप ४ :- मनोज वाजयेपी एकटा चित्रपटा तारून नेऊ शकत नाही. तो वगळता इतर कोणी ओळखीचे पण नाही.
ह्या आक्षेपावरती तर काय बोलावे तेच कळत नाही. अहो, हा चित्रपट आहे, प्राणिसंगहालय नाही. एका तिकिटात जंगलातले सगळे प्राणी बघता येतात, तसे तुम्हाला सगळे हीरो आणि हिरवण्या बघायच्या असतात का ? बरं ह्या चित्रपटात मोठी स्टारकास्ट घेतली असती, तर हेच लोक 'कथेत दम नाही म्हणून कलाकारांची फौज गोळा केली आहे' असे गळे काढत बसले असते. काही चित्रपट हे कथांसाठी नाही, तर सादरीकरणासाठी बघायचे असतात हे लक्षात कधी घेणार? ह्या चित्रपटात नीट लक्ष दिले तर मोठे मोठे सीन्स तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. लांब, पल्लेदार संवाद किंवा अभिनयाची जुगलबंदी इथे आणलेली देखील नाही. प्रत्येक भूमिकेला न्याय मात्र नक्की मिळालेला आहे. खरेतर ह्या चित्रपटातील सर्वच पात्रे ही एकमेकांना पूरक आहेत, आणि ह्या आधी कुठल्याही भूमिकेचा शिक्का बसलेला नसणे हीच ह्या पात्रांची खरी गरज होती. अनुरागने अतिशय चाणाक्षपणे हे हेरून नवोदितांना मोठ्या अपेक्षेने इथे संधी दिली आहे, आणि त्यांनी देखील त्याचे सोने केले आहे.
आता चित्रपटाची कथा थोडी समजावून घेऊ. ब्रिटिश अमदानीत कुख्यात डाकू सुलतान ह्याची चांगलीच दहशत असते. ह्या सुलतान डाकूचे खोटे नाव घेत त्याच्या नावाने शाहीद खान हा ब्रिटिशांच्या ट्रेन्स लुटायला लागतो आणि चित्रपटाच्या मूळ कथानकाला सुरुवात होते. ही गोष्ट कळल्यावरती पिसाळलेला सुलतान डाकू खरेतर शाहीदच्या जीवावरच उठतो पण शेवटी सामंजस्य होऊन शाहीदला गावाबाहेर हाकलले जाते. गावाबाहेर पडलेला शाहीद आता थोड्या फार संघर्षानंतर रामाधीर सिंग ह्या कोळसा खाणीतील ठेकेदाराकडे 'पैलवान' अर्थात पाळलेला गुंड म्हणून काम करायला लागतो. शाहीदचा वाढता दबदबा बघून वेळीच पुढचा धोका ओळखून रामाधीर सिंह त्याला संपवतो. इकडे शाहीदचा मुलगा सरदार खान मात्र आपल्या काका बरोबर पळून जाण्यात यशस्वी होतो आणि त्याचा जीव वाचतो. आता सूडाने पेटून उठलेला सरदार खान रामाधीरचा बदला घ्यायला निश्चय करतो. ह्या बदल्याच्या ठिणगीचे आगीत होत जाणारे रूपांतर आणि ह्या आगीत जळणारी ओली सुकी लाकडे म्हणजे 'गँग्ज ऑफ वासेपुर' हा चित्रपट.
काही चित्रपट हे कथांसाठी नाही, तर सादरीकरणासाठी बघायचे असतात असे मी वर म्हणलेच आहे. ह्या अपेक्षेत अनुराग उतरला आहे का ? म्हणले तर हो, म्हणले तर नाही. चित्रपटातला संघर्ष हा हळूहळू अनुरागने उत्तमपणे वाढवत नेलेला आहे. पण कोळशाच्या खाणींचे राजकारण, स्वातंत्र्यानंतर त्यांची बदललेली मालकी आणि ह्या पैसेवाल्या पण कोळसा खाणींचे ज्ञान नसलेल्या मालकांची धडपड, बाहुबलींचा उदय, कोळसा खाणींचा अस्त आणि त्यामुळे बदलत जाणारे समाजकारण ह्या गोष्टी आपल्यापर्यंत फक्त संवादा द्वारे पोचतात, त्यामुळे त्या म्हणाव्या तशा ठसत नाही. ह्या गोष्टी अधिक सुसंगत आणि नेमकेपणाने दाखवल्या असत्या तर चित्रपटाची रंगत अजून वाढली असती. सरदार खानच्या डोक्यातील बदल्याची आग दाखवतानाच, हा सरदार खान कसा स्त्री लंपट आहे, वेळेला मुलांवरती जीव टाकणारा आहे, वेळेला जमातीतील लोकांच्या अडचणीला उभा राहणारा आहे, हे कंगोरे दाखवत अनुराग त्याला सर्वसामान्य पातळीच्या वरती जाऊ न देण्याची जी दक्षता घेतो ती खरंच सुंदर आहे. ह्यामुळे हा संघर्ष फक्त एकट्या सरदार खानचा न उरता, एका समुदायाचा बनत जाण्यास मदत होते.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/335076-gangs-of-wasseypur.jpg" width="400" height="260" />
चित्रपटाचे संगीत उत्तम आहे. 'इक बगल मे चांद होगा' आणि 'वुमनीया' ही गाणी तर अप्रतिमच. वेगवेगळ्या प्रसंगांना धार आणण्यासाठी पार्श्वसंगीत आणि गाणी ह्यांचा केलेला वापर वाखाणण्याजोगा. अभिनयाच्या बाबत म्हणाल तर मनोज वाजपेयी सोडता बरेचशे चेहरे हे नवोदित आहेत. मात्र आपल्या अभिनयात ते कुठेही नवखेपणा जाणवून देत नाहीत. उत्तम प्रकारे समजून उमजून अभिनय त्यांनी केलेला आहे. सरदार खान आता बाहुबली म्हणून प्रस्थापित झालेला आहे आणि त्याच्या हाताखाली त्याची दोन तरूण मुले देखील आली आहेत. अशातच सरदार खानवरती जीवघेणा हला होतो, आणि ह्या टप्प्यावरती चित्रपट संपतो. चित्रपट एकदा तरी पाहाच असा आग्रह करणार नाही, पण 'काहीसे वेगळे' चित्रपट बघण्याची आवड असल्यास हा चित्रपट बघायला नक्की हरकत नाही.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Piyush-Mishra-In-Gangs-Of-Wasseypur-560x543.jpg" width="200" height="200" /> <img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/70048-17-large.jpg" width="200" height="200" />PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-26603328717458986082012-06-13T11:29:00.000+05:302012-09-18T18:15:40.561+05:30शांघाय<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Shanghai-Movie-Review.jpg" alt="" />
विकांताला मेंदूला झालेला त्रास बघता ह्या वेळी मेंदूचा वापरच करावा लागणार नाही असा एखादा मसालापट बघायचे ठरवले आणि पावले चालली 'शांघाय'ची वाट.
'पोलिटिकल थ्रिलर' असा गाजावाजा झालेला हा चित्रपट ना पोलिटिकल थ्रिलरच्या अपेक्षा पूर्ण करतो ना नुसत्या थ्रिलरच्या. हा काही काही प्रसंगात थिल्लर वाटण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे हे नक्की. भडक अभिनय, अभिनय संपन्न पात्रांचा न करता आलेला वापर, उत्कर्ष बिंदू पर्यंत पोचतोय असे वाटत असतानाच टिपीकल मसाला वळण घेणारा संघर्ष ह्या सर्वांमुळे चित्रपट आपल्याला फार काही गवसून देत नाही. मग चित्रपटात बघण्यासारखे काहीच नाही का ? आहे ! अभय देओलचा सुरेख अभिनय आणि बर्याच कालावधी नंतर फारुख शेखचा सहज सुंदर वावर ह्यासाठी एकदा तरी चित्रपट बघायला नक्की हरकत नाही. अर्थात फारशा अपेक्षा ठेवायच्या नाहीत हे ओघाने आलेच.
<object width="560" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/nE0XejAFc9k?version=3&hl=en_US&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/nE0XejAFc9k?version=3&hl=en_US&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="560" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object>
व्हॅसिलीसच्या 'Z' ह्या नॉव्हेलवरती आधारीत ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत दिबाकर बॅनर्जी. खोसला का घोसला, ओये लकी लकी ओये, लव्ह सेक्स धोका असे थोड्या हटके थीमचे चित्रपट बनवणारा दिबाकर बॅनर्जी ह्या चित्रपटात देखील वेगळे काही देण्याचा प्रयत्न नक्की करतो पण कुठेतरी प्रयत्नात कमी पडल्याचे नक्की जाणवत राहते. चित्रपटात अभय देओल, फारुख शेख, कल्की कोचलीन, प्रोसेनजीत चटर्जी अशी तगडी स्टारकास्ट आहे. चक्क चक्क आपला चिन्मय मांडलेकर देखील आहे. तुकड्या तुकड्यांनी आलेल्या प्रसंगात एकदम भाव खाऊन गेला आहे बेटा. ह्या चित्रपटाची कथा ऊर्मी जुवेकर ह्या मराठी मुलीचीच आहे हे एक विशेष.
भारतनगर मध्ये सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यावरती येऊ घातलेले एक मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय काटा काटीचा खेळ हे ह्या चित्रपटाचे कथासूत्र. प्रोजेक्टला पाठिंबा देणारे आले म्हणजेच विरोध करणारे देखील येणारच. डॉ. अहमदी (प्रसेनजीत) हे असेच हाय प्रोफाइल सामाजिक कार्यकर्ते ह्या प्रोजेक्टच्या विरोधात दंड थोपटतात. कल्की अर्थात शालिनी ही एकेकाळची त्यांची विद्यार्थिनी आणि त्यांच्या प्रेमात पडलेली मुलगी. हिचे स्वतःचे वडील सैन्यात अधिकारी असतात आणि सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा भोगत असतात. तर ह्या शालिनीला डॉ. अहमदी शहरात आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याचे आपल्या मोलकरणीकडून कळते आणि ती त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करते. मात्र 'आखरी सांस तक लढना हे!' हा मंत्र जपणारे अहमदी शहरात हजर होतातच. नेहमीप्रमाणेच अशा लोकांची जी गळचेपी चालू होते ती त्यांना देखील अनुभवायला मिळते. पोलिसांची कुमक नाही म्हणून सभेला संरक्षण पुरवता येणार नाही, आणि त्यामुळे मग सभेला परवानगीच नाही असे त्यांना कळवण्यात येते.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/shanghai5.jpg" width="400" height="340" alt="" />
अहमदी मात्र सभा होणारच ह्या जिद्दीला पेटतात. त्यांना विरोध करायला सत्ताधारी पार्टीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतातच. ह्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजी समोर पोलीस नुसते बघ्याची भूमिका घेऊन उभे असतात. छोटीशी दगडफेक, अहमदींच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण असे प्रसंग घडत जातात आणि सभा संपवून परत येत असताना चौकातच एक टेंपो सरळ अहमदींना उडवून निघून जातो आणि चित्रपट संघर्षाच्या एका टोकावरती येऊन पोचतो. कोमात गेलेल्या अहमदींना अपघात झाला नसून तो खूनच आहे अशी शालिनीची पूर्णं खात्री असते. मग न्यायासाठी धडपड करण्याची ती तयारी सुरू करते. अशातच अहमदींची एकेकाळची विद्यार्थिनी आणि आताची बायको हजर होते आणि चित्रपट वेग पकडू लागतो. लग्नानंतर देखील अहमदींच्या कार्याने भारावलेली त्यांची बायको आता मात्र हताश आणि निराश झालेली आहे आणि अशा आंदोलनाला काहीच फळ नसल्याच्या जाणिवेने ह्या सगळ्यातून बाहेर देखील पडली आहे. आता मात्र ती नवर्याला न्याय मिळावा म्हणून धाडसाने उभी राहिली आहे.
प्रकरण चांगलेच जोर धरू लागले आहे हे बघून मुख्यमंत्री मॅडम (सुप्रिया पाठक) चौकशीसाठी क्रिष्णन अर्थात अभय देओलची एक सदस्यीय समिती नेमतात. ह्या अभयला रिपोर्ट करायचा असतो तो आपल्या बॉसला फारुख शेखला. मुरलेला राजकारणी, कसबी आणि व्यवहारी मनुष्य असे विविध कंगोरे फारुख शेखने आपल्या ह्या भूमिकेद्वारे दाखवले आहेत. तर दुसर्या बाजूला प्रामाणिक, सामाजिक अशांततेने अस्वस्थ होणारा, अधिकार असून देखील बजावता येत नसल्याने हतबद्ध झालेला आणि मोक्याच्या क्षणी सगळी बुद्धी पणाला लावत डावात रंगत आणणारा व्हाइस चेहरमन अभय देओलने झकास साकारला आहे. संयत अभिनय, कुठेही आक्रस्ताळेपणा नाही असा कृष्णन त्याने निव्वळ काही शब्दांचे टिपीकल मद्रासी उच्चार आणि मद्रासी लहेजावाली हिंदी ह्या जोरावरती उभा केलेला आहे.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/farooq-shaikh-and-abhay-deol-in-shanghai-film-e1338295324450.jpg" alt="" />
कृष्णनला नेहमीप्रमाणेच गुन्ह्याच्या दिवसाची पोलीस स्टेशनमधली डायरी न मिळणे, खात्यांतर्गतची माहिती देता येणे शक्य नाही ह्या कारणाने पोलीस खात्याकडून माहिती द्यायला टाळाटाळ, मुख्य पोलीस अधिकारी (चिन्मय मांडलेकर)चे असहकाराचे धोरण आणि गुन्ह्यांवरती पांघरूण घालण्याचे प्रयत्न असे अनुभव यायला सुरुवात होते. ह्या सर्वातून कृष्णन हळूहळू पण ठाम मार्गाने पुढे सरकतच असतो. अशातच जोगींदर शर्मा (इम्रान हाश्मी) हा पॉर्न फिल्म मेकर + राजकीय सभांमधला फोटोग्राफर आपल्याकडे अहमदींच्या अपघाता विषयी काही ठोस पुरावे असल्याचा दावा करतो आणि कथेला वेगळेच वळण लागते. शालिनी आता जोगींदरच्या साहाय्याने ह्या प्रकरणाचा गुंता सोडवायला सुरुवात करते. अपेक्षेप्रमाणेच त्यांना गुंड कार्यकर्त्यांच्या हल्ल्यांना सामोरे जावेच लागते. अशातच जोगींदरच्या हाताला असा एक भक्कम पुरावा लागतो जो सरकारला सुरुंग लावण्या येवढा स्फोटक असतो. जीवावरती उदार होऊन ते हा पुरावा कृष्णनकडे घेऊन हजर होतात, पण त्या आधीच 'क्यूं ना ते बीना दातवाला आयोग बंद कर के, CBI को इसकी छान बीन करने दी जाये' असे म्हणत मुख्यमंत्री मॅडम आयोग बंद करण्याचा निर्णय घेऊन मोकळ्या झालेल्या असतात. आता हा पुरावा अभय देओल कसा आणि कुठे वापरतो, ह्या पुराव्याचा खरंच काही उपयोग होतो, का तोच स्वतः अडचणीत सापडतो, नक्की राजकारण काय वळण घेते हे प्रश्न सोडवायचे असतीत तर मग शांघायची सहल करणे गरजेचे.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/shanghai.jpg" alt="" />
अभिनयात अभय देओल आणि फारुख शेखने बाजी मारलेली आहे. थोडासा आक्रस्ताळेपणा सहन करता आला तर कल्की देखील बरीचशी सुसह्य आहे. लगाम व्यवस्थित घातला तर इम्रान हाश्मी देखील सुसह्य वाटू शकतो हे जन्नत २ नंतर पुन्हा एकदा ह्या चित्रपटात अनुभवता येते. चित्रपटात बर्याच खटकणार्या गोष्टी मात्र जागोजागी दिसतात. भ्रष्टाचार विरोधातील एक प्रमुख कार्यकर्ती, डॉ. अहमदींच्या अगदी जवळची असलेली कल्की. ह्या कल्कीच्या वडिलांना भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा झालेली आहे, असे असताना कुठलाच मिडिया ह्याची दखल कशी घेत नाही ? 'डॉ. अहमदींचे समर्थकच भ्रष्टाचाराशी जोडले गेलेले आहेत' हे ठामपणे जनतेसमोर आणणे शक्य असताना, सरळ त्यांच्यावरती हल्ला का केला जातो हे कोडे उलगडत नाही. त्यांच्या अपघाताच्या वेळी तिथे हजर नसलेला जोगींदर पुढे त्या टेंपोच्या ड्रायव्हरला (अनंत जोग) कसे काय ओळखतो ?, राजकीय कार्यकर्ते हे सहजपणे खून, जाळपोळ करून कसे वावरू शकतात? ते कार्यकर्ते कमी आणि सुपारी घेऊन थंड डोक्याने खून करणारे जास्ती शोभतात. असे काही खटकणारे प्रश्न सोडले, तर एकुणात चित्रपटाला 'बरा आहे' असे म्हणायला हरकत नाही.PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-88561707150914648712012-06-11T15:20:00.000+05:302012-09-18T18:15:40.607+05:30तुकाराम... हे राम !तुकारामांची बेअब्रू झाली किंवा नालस्ती झाली तर आपल्याला केस गुदरता येते का हो ? का तुकोबांचे नातेवाईक असणे कंपल्सरी आहे ? तुकोबांच्या बाबतीत मानवी हक्क संघटना मदत करू शकेल काय ? बराच गाजावाजा झालेला आणि चालू असलेला तुकारामा हा चंद्रकांत कुलकर्णी ह्यांचा चित्रपट पाहून (खरेतर पहिल्या ४ मिनिटातच) पडलेले हे काही प्रश्न.
खरंच सांगतो, एक..फक्त एक थप्पड किंवा बुक्का तुकारामांना कोणालातरी मारताना दाखवले असतेना तर हा चित्रपट सौथ स्टाइल म्हणून आरामात खपवता आला असता. सुट्टी चालू आहे तर लहान मुले हट्ट धरायला हवीत म्हणून बाल हनुमान, बाल गणेश तसा बाल तुकाराम, त्याच्या लीला, गाणी दाखवणे, बायकांच्या आडियन्सला रडवायला मेलोड्रामा, गेला बाजार गावाकडचे पब्लिक आकर्षीत करायला दुष्काळ, विवक्षित पब्लिकला खेचायला नाकात बोलणार्या बामणांचे प्रताप हे सगळे सगळे सोपस्कार पार पाडताना कुलकर्णी आणि कंपनीची जी काय ससेहोलपट (खरेतर हसेहोलपट) झाली आहे, ती बघवत नाही. अक्षरशः २.४५ मिनिटे अत्याचारा वरती अत्याचारा सहन करावा लागतो.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/image.jpg" width="450" height="350" alt="" />
'साहस टाळा' असे रविवारचे राशी भविष्य सकाळी सकाळी वाचत असतानाच डाण्रावांचा फोन आला आणि संध्याकाळ म्हणता म्हणता दुपारच्या शो चा प्लॅन पक्का केला आणि तुकाराम चित्रपटाला हजेरी लावली. तुकोबांना विठ्ठलाचा ध्यास लागला होता आणी आम्हाला तुकोबांचा. अन्न पाणी काही ग्रहण करण्याची संधी देखील मिळाली नाही पण आम्हाला त्याचा खेद वाटला नाही.
तर आधी आपण पात्रांचा परिचय करून घेऊ. पात्रं म्हणजे एकेक पात्रंच आहेत म्हणा.
बोल्होबा अंबीले (तुकारामांचे वडील) = शरद पोंक्षे अर्थात मराठी चित्रपट सृष्टीतील बाबा महाराज सातारकर. हा माणूस कुठलाही संवाद निरूपण केल्याच्या थाटातच बोलतो. बाबा महाराजांसारखीच दर चार मिनिटांनी डोळे मिचकावण्याची देखील सवय. डोक्यात अजूनही नथुराम घुसलेला आहे, त्यामुळे बर्याचदा संवादाच्या शेवटी शेवटी आवाज भयानक चिरका होतो. पात्र बरेचशे सुसह्य.
कनकाई (तुकारामांची आई) :- प्रतीक्षा लोणकर. दामिनी दामिनी दामिनी.... अभिनय समजून उमजून करण्यात यशस्वी. फारशे भावनिक प्रसंग वाट्याला न आल्याने भूमिका उत्तम वठवली आहे. पात्र सुसह्य.
सावजी (तुकारामांचे वडील बंधू) :- वृशसेन दाभोळकर. चित्रपटात मोजून चार ते पाच वाक्ये बोलण्याची गरज पडल्याने माणूस कामगिरी निभावून नेतो. बराचसा अभिनय हा शारीरिक करावा लागला असता तरी त्यात छाप पाडून जातो. संसार सोडून मोक्षप्राप्तीसाठी परागंदा झाल्यावरती आलेले शहाणपण मोजक्या शब्दात पण छान मांडतो. पात्र सुसह्य.
मंजुळा (सावजींची पत्नी) :- स्मिता तांबे. संन्यासी वृत्तीचा आणि कधीही पतीधर्म न निभावणारा माणूस आयुष्याच्या दावणीला बांधला गेल्यावरती झालेली घुसमट छान व्यक्त करते. सासू मेल्या नंतरच्या प्रसंगात मात्र तिने केलेला अभिनय (नवर्यावरती दाखवलेला त्रागा) अतिशय बालिश आणि नाटकी. खरेतर हा प्रसंगच पूर्णतः अनावश्यक. ह्या प्रसंगात आई गेल्यामुळे कोसळलेला, निराधार झालेला सावजी निव्वळ शारीरिक अभिनयातून आपल्या मनाला त्याची तडफड जाणवून देत असतानाच, ह्या प्रसंगात अचानक येऊन स्मिता तांबेचे किंचाळणे, बोंबलणे आणि पाठोपाठ मख्ख आणि शांत चेहरा करून तुकारामाने बाहेर येऊन "काय झाले वहिनी" विचारणे खरंच संताप आणते.
रखमा (तुकारामांची पहिली पत्नी) :- विणा जामकर. आपण विद्या बालन नाही हे ह्या बाईला कळेल तो दिवस तिच्यासाठी आणि आपल्यासाठी सुदिन. ह्यासाठी तिने ज्यू. मेहमूदची वाताहात डोळ्यासमोर ठेवली तरी प्रगती निश्चित.
आवली (तुकारामांची दुसरी पत्नी) :- राधिका आपटे. 'मात्र रात्र, रक्तचरित्र मधली राधिका ती हिच का' असा प्रश्न पडण्या येवढा भिकार अभिनय. त्याला अभिनय तरी कसे म्हणावे ? फारतर चित्रपटातला वावर असे म्हणू. ही आवली अक्षरशः कॉमीक वाटते हो. अत्यंत नाटकी अभिनय, 'कर्कशा' असे तुकारामबुवांनी आपल्या अभंगात केलेले वर्णन फिक्के पाडणारी प्रत्येक संवाद किंचाळून आणि हेल काढून बोलण्याची लकब ह्यामुळे आवली हे पात्र अक्षरशः डोक्यात जाते. ना धड तिचा त्रागा समोर येतो, ना धड तुकारामांवरचे प्रेम. पुर्णत: फसलेले आणि असह्य पात्र.
मठाधिपती (रवींद्र मंकणी ):- फक्त एका दृश्यापुरता वावर. सिंव्हासनावरती बसण्याची ऐट आणी संवादाची फेक अप्रतिम. ह्या माणसाला त्या सिंव्हासनावरती असे झोकात बसलेले पाहिले आणि वाटले असेच उचलून ह्यांना शनिवारवाड्यावरती नेऊन ठेवावे. हे रूप, ही ऐट, हा माणूस बघून तो शनिवार वाडा देखील पुन्हा गर्वाने उभा राहील, ती कारंजी पुन्हा ताल धरतील, ते रेशमी पडदे सळसळतील, आमची मस्तानी नाजूक आदाब करत उभी राहील आणि कुठूनतरी ललकारी उमटेल "बाअदब बामुलाहिजा..."
मंबाजी (यतीन कार्येकर) :- संपूर्णतः दिग्दर्शक म्हणेल त्याला मान डोलवून केलेला अभिनय. पात्र पूर्णतः फसलेले. त्याचा तुकारामांवरचा राग, धर्माचा दांभिक अभिमान, स्वतःच्या बुद्धीचा गर्व, ब्राह्मण्याचा माज काही काही म्हणून मनावरती ठसत नाही. दोन लहान मुलांमध्ये चाललेली भांडणे देखील अधिक प्रभावशाली वाटतील. कार्येकरांनी पाटी टाकली आले असे खेदाने म्हणावे लागेल. पात्र मनालाच पटत नसल्याने असह्य.
तुकाराम (जितेंद्र जोशी) :- 'कुठे आहेत तुकाराम ?' असे शेवटापर्यंत वाटायला लावणार अभिनय. प्रत्येक दृश्यात प्रत्येक फ्रेम मध्ये हा जितेंद्र जोशी आहे हेच जाणवत राहते. कुठल्याच क्षणी आपण त्या पात्राशी तुकाराम आहेत म्हणून एकरूप होऊ शकत नाही. अतिशय मख्ख चेहर्याने वावर. मध्येच बापुडवाणा चेहरा करून इकडे तिकडे बघणे म्हणजे तुकाराम उभा करणे नव्हे. अतिशय संथ संवाद फेक. तुकाराम व्यवहारी, रोमँटीक, समाजसुधारक इ. इ. सर्व काही गुणयुक्त दाखवण्याच्या प्रयत्नात स्वतः दिग्दर्शकच आपटल्याने जोशी साहेब त्याच्या जोडीने पडल्याचे आश्चर्य वाटत नाही. नो सर ! हे तुकाराम आमचे नाहीत, रादर आमच्या ध्यानी मनी देखील असे तुकाराम कधीच नव्हते.
बाल तुकाराम (पद्मनाभ गायकवाड) :- विठ्ठलाला एकदा मिठी मारून भक्तीचा पूर आणि विठ्ठलप्रेम दाखवणे ह्यापुरती गरज असताना निव्वळ बालचमूच्या गर्दीसाठी ताण ताण ताणलेले पात्र. ह्याच्या बाललीला तर काय वर्णाव्यात... पात्र मात्र बरेच सुसह्य.
भारत गणेशपुरे, प्रशांत तपस्वी आणि हो विक्रम गायकवाड हे देखील चित्रपटात आहेत. हो.. हो.. तेच आपले विक्रम गायकवाड फकिराचा रोल करताना दिसतात. माझी खात्री नाही, पण ह्या चित्रपटात ३ प्रसंगात (एकदा बाल तुकाराम बाललीला दाखवत सवंगड्यांबरोबर गाणे गात खेळत असताना दोन हात आकाशाकडे करत कबीराचा कुठलासा दोहा गात कॅमेर्यासमोरून इकडून तिकडे वाटचाल, एकदा तोच दोहा म्हणत तुकारामांच्या वाड्यावरती झोळी पसरत येणे आणि शेवटी दुष्काळात मरून जाणे) जे दिसतात ते गायकवडच असावेत असे वाटते. येवढा हट्टा कट्टा माणूस दुष्काळात मेलेला पाहून हळूच खुदकन हसायला येते हो.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/t4.jpg" width="200" height="200" alt="" /><img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/333033-tukaram.jpg" width="200" height="200" alt="" />
तर आता चित्रपटाच्या कहाणीकडे वळू. माफ करा, कहाणी नाही... ऐतिहासिक सत्य. हान तर सुरुवात होते बाललीलांपासून. बाल तुकारामाचे सवंगडी त्याला शोधत आहेत आणि तो सापडत नाहीये. मग त्याला शोधणारा 'तुक्या कधीच सापडत नाही' अशी तक्रार करतो आणि शेवटी मग सगळे सवंगडी त्याला देवळात शोधून काढतात. बाल तुकाराम विठ्ठलाच्या मूर्तीला मिठी मारून ब्रह्मानंदी टाळी लावून रममाण झालेले असतात. ह्या दृश्यावरून आपण सुजाण प्रेक्षकांनी 'तुक्या कधीच सापडत नाही' कारण तो कायम ह्या देवळातच रममाण झालेला असतो, ह्या बालवयात त्याच्या अंतरात्म्यात भक्तीची ज्योत प्रज्वलित झालेली आहे येवढे सगळे अर्थ समजून घ्यायचे. ही ज्योत पुढे १४ रिळे कुठे गायब होते हे मात्र विचारायचे नाही. नाहीतर मग आम्ही तुम्हाला नव्या बदलाला नाक मुरडणारे प्रेक्षक म्हणू.
कुलकर्णींनी ह्या चित्रपटात प्रेक्षकांच्या डोक्याला खूप खाद्य पुरवले आहे बरे. अनेक दृश्ये तुम्हाला काही सांगून, सुचवून जातात. मात्र ते समजण्याची तुमची पात्रता पाहिजे. आर्ट फिल्म मध्ये बघा, हीरोच्या कायम मळकट रंगाच्या शर्टाच्या जागी गुलाबी, हिरवा शर्ट दिसायला लागला, त्याच्या रेडिओवरती गंधर्वांच्या जागी रफी गायला लागला, कुंडीत गुलाब उगवला की त्या हीरोचे आयुष्य पालटले आहे, तो प्रेमात पडला आहे हे आपण जसे समजून घ्यायचे असते, तसेच इस्त्रीच्या स्वच्छ अंगरख्यामधून तुकाराम चुरगाळलेल्या अंगरख्यात आले, जप्ती - मसाले - मेथीची भाजी हे शब्द सोडून संदीप खरे सारखे एकदम (गाडी सुटली, रुमाल हालले.. च्या थाटात) 'कुठून फुटला हा कोंब, कुठे मिळाले जीवन जगण्याचे बळ त्याला..' असे म्हणायला लागले म्हणजे विरक्त झाले, विठ्ठलाच्या ध्यासाला लागले हे समजून घ्यायचे. किती सोपे आहे का नाही ?
तर आपण कुठे होतो ? हान.. तर तुकारामांच्या बाललीला चालू असतानाच एकेक पात्रे आपल्या परिचयाची होत जातात. वडील बंधू सावजी हे देवधर्माच्या नादाने पुर्णतः एकलकोंडे आणि जगाच्या पार पोचलेले असतात. चार गाढवे सांभाळणे आणि मसाला पोचवणे हे कार्य देखील त्यांना जमत नसते. अर्थातच मग लहानग्या तुकोबांची वर्णी वडलांच्या हाताखाली लागते. देवाचा आशीर्वाद घ्यायला वाकलेले बाल तुकाराम एकदम लग्न झालेले तरणेबांड तुकाराम होऊनच उभे राहतात. बाललीला संपल्या म्हणून लगेच निःश्वास टाकायचा नाही. आता एकदम व्यवहारी, मिश्किल, न्याय - अन्यायाची चाड असणारे आणि रॉमेंटीक तुकाराम आपल्या समोर सादर होतात. हे धक्के एका मागोमाग एक पचवत असतानाच एकदम दुष्काळ दाखल होतो. आधी वडील, मग आई असे लोक एका मागोमाग एक गमवायची वेळ तुकारामांवरती येते.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/tu.jpg" alt="" />
दामाजीपंतांची गोष्ट ऐकून तुकाराम आपल्या घराची धान्य कोठारे खुली करतात आणि भणंग होतात. सावजी परागंदा होतात, भुकेपोटी खणून आणलेली कंदमुळे विषारी निघतात आणि लहानग्या सकट अजून काही मृत्यू घरावर हल्ला करतात. हे सर्व बघता बघता आपण पण मरून जाणार असे वाटत असतानाच तुकोबांना भेगाळलेल्या भुईमध्ये एक कोंब उगवलेला दिसतो आणि त्यांना एकदम अभंगाची स्फूर्ती येते. त्यांना इकडे साक्षात्कार होतो आणि तिकडे ताबडतोब पाऊस सुरू होतो. पावसाला जीवनदायी, स्फूर्तीदायी का म्हणतात ते मला तेव्हा कळले, कारण पाऊस चालू झाल्या झाल्या इंटरव्हल झाले.
इंटरव्हल नंतर जी-टॉक, फेसबुक ह्यांचा आसरा घेतल्याशिवाय आता टाईमपास करणे अशक्य आहे असे डाण्राव आणि प्रिमोने जाहीर केल्याने आमचा मोर्चा पुढच्या मोकळ्या पडलेल्या खुर्च्यांकडे वळला. आम्ही तिकडे वळलो आणि तुकाराम अध्यात्माकडे वळले. गेले दीड पावणे दोन तास हरवलेली त्यांची विठ्ठलभक्ती अचानक उफाळून आली आणि ते पांडुरंगाला वदले 'लोकं म्हणतात मला तुझं वेड लागलंय'. त्यांचे माहिती नाही, पण येवढ्या वेळात प्रेक्षकांना मात्र नक्की वेड लागलेले असते. आता विठ्ठलमय झालेले तुकाराम सावकारी सोडतात, लोकांचे त्यांच्याकडे गहाण पडलेले सर्व मुक्त करतात आणि अभंग रचनेला सुरुवात करतात. काम धाम सोडून चार चार दिवस डोंगरावरती जाऊन भक्तीत लीन व्हायला लागतात. इकडे मग ते आवली जे काही अभिनयात सूट सूट सुटते, की तुकारामांना 'तुमच्या ऐवजी मी शेतात राबतो पण ह्या बाईला आवरा' असे सांगावेसे वाटायला लागते. काय भिकार अभिनय करते हो ही बया. हिच्या नाटकी आणि कर्कश्य अभिनयापुढे मुनमुनसेनच्या कन्या देखील फिक्या पडतील.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/santtukaram2.jpg" alt="" />
मग ह्या आवलीच्या किंचाळण्याने तुकाराम पुन्हा ताळ्यावरती येतात आणि शेती करायला लागतात. पुढच्याच दृश्यात ते एकदम शेत वगैरे पिकवून धान्याची रासच ओतताना दाखवले आहेत. मग एकदा रास ओतली की पुन्हा एकदा 'ये रे माझ्या मागल्या'. मधल्या काळात त्यांनी आपल्या वडिलोपार्जित विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असल्याने त्यांचे अभंग रचणे, कीर्तन करणे आणि विठ्ठलात गुंतणे एकदम जोमाने चालू होते. आता तुकाराम संसारातून पूर्ण अंग काढल्यासारखेच वागायला लागतात. त्यांची संत म्हणून कीर्ती वाढत जाते आणि लगेच गावातला दुसरा सावकार, नाकात बोलणारे ब्राह्मण ह्यांचा पोटशूळ वाढत जातो. ब्राह्मण, मग ते अगदी शिवाजीराजांच्या काळातले असोत किंवा आजच्या पुण्यातले असोत, कायम नाकातच बोलताना का दाखवतात हे मला अजून कळलेले नाही. तर मग हे पोटशूळ वाले मंबाजी गोसावी ह्यांना पाचारण करतात वगैरे वगैरे नेहमीचे काड्यासारु धंदे चालू करतात.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/marathi-movie-sant-tukaram-movie-photo05t.jpg" alt="" />
ह्या काळात तुकारामबुवा समाज जागृतीचे आणि सुधारणेचे कार्य करतात असे दिग्दर्शक सुचवू पाहतो. 'लांडग्यांना मारून त्यांचा शेपट्या दाखवल्यास शिवाजी राजे इनाम देतात' हे तरुणांना सांगणे आणि 'पाईक म्हणजे सैनिक. स्वराज्यासाठी लढा' असे सांगून लोकांना राजांच्या सैन्यात भरती होण्यास सांगणे म्हणजे तुकारामांचे समाज जागृतीचे कार्य होय असे जर दिग्दर्शकाला वाटत असेल तर त्याला आमचा मानाचा मुजरा. अहो तुम्हाला तुकारामच कळलेले नाहीत, तर त्यांचे कार्य काय बोडक्याचे कळणार म्हणा.
मग आता हे मंबाजी गोसावी ह्यांचे आगमन झाल्यावरती तुकारामांच्या आयुष्यात उलथा पालथा होणारच. ते नक्की काय होते आणि त्यातून ते कसे बाहेर पडतात हे समजून घ्यायचे असेल तर 'तुकाराम' बघणे क्रमप्राप्त. म्हणजे बघाच असे नाही, परीक्षणानंतर हे वाक्य लिहायची सहसा पद्धत आहे म्हणून आपले लिहिले आहे झाले.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/sant-tukaram-jitendra-joshi.jpg" alt="" />
जाता जाता एका प्रसंगाचा उल्लेख आणि दिग्दर्शकाचे कौतुक मात्र करायलाच हवे. 'बुडालेल्या गाथा आणि त्या वर येणे' हा तुकोबांच्या अद्भुत चरित्रातला प्रसंग कुठलेही वाद विवाद निर्माण न होण्याची काळजी घेत कुलकर्णी साहेबांनी ज्या खुबीने साकारला आहे त्याबद्दल हॅटस ऑफ. ह्या परीक्षणाच्या निमित्ताने हे बोलणे योग्य आहे का नाही माहिती नाही, पण असे वाटते की 'गाथा पुन्हा वर येणे' , ' शिवचरित्रावरील मालिकेत दादोजी, रामदास स्वामी' ही पात्रेच न दाखवणे हे योग्य आहे का ? कुठेतरी 'वाद नकोत' अशी भूमिका घेताना आपण एका विशिष्टं विचारसरणीच्या समूहासमोर मान तर तुकवत नाहीये ना ? हे देखील विचारात घेतले जाणे गरजेचे आहे.
<object width="420" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/gvk2-C56Nw8?version=3&hl=en_US&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/gvk2-C56Nw8?version=3&hl=en_US&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="420" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object>
विठ्ठल विठ्ठल...PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-54233104211752853402012-06-07T12:46:00.000+05:302012-09-18T18:15:40.568+05:30रावडी राठोड<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/rowdy-rathore.jpg" alt="" />
रावडी राठोड ह्या चित्रपटाच्या नावातच फक्त दम आहे. हे येवढे वाक्य सांगून खरेतर चित्रपटाचे परीक्षण मांडता येईल इतका हा चित्रपट डोक्याला शॉट आहे. सध्या आपल्याकडे साऊथच्या चित्रपटांच्या रिमेकची एक लाटच आली आहे, त्यातले काही चित्रपट चांगला पैसा मिळवण्यात यशस्वी देखील झाले आहेत. ह्याच वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचा प्रभुदेवा आणि संजय लीला भन्साळीचा प्रयत्न म्हणजे रावडी राठोड. हा चित्रपट रवी तेजा च्या गाजलेल्या विक्रमार्कूडू चा हिंदी रीमेक आहे. आपल्याकडे साऊथचे जे गाजलेले रीमेक झाले मग ते अॅक्शन असो वा कॉमेडी त्या मध्ये संगीत, अॅक्शन, कथा इ. माल मसाला भलेही साऊथ मधला उचललेला असला तरी हीरो, हिरॉईन, नाच, संवाद ह्यांना एक टिपीकल बॉलीवूड टच होता. जो आपला वाटला आणि ही भेळ लोकांनी उचलून घेतली. रावडी राठोड मध्ये मात्र फ्रेम टू फ्रेम पासून ते अक्षय कुमारच्या रंगीबेरंगी कपड्यांपर्यंत सगळीच उचलेगिरी केलेली असल्याने ती असह्य होते.
<object width="560" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/gCAcU3p9GNo?version=3&hl=en_US&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/gCAcU3p9GNo?version=3&hl=en_US&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="560" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object>
रवी तेजाचा चित्रपट हा चंबळ- हैदराबाद असा फिरतो, तर अक्षयचा रावडी पटणा - मुंबई असा फिरतो. चित्रपटात अक्षयची दुहेरी भूमिका असल्याने अंमळ त्रास देखील दुहेरी सहन करावा लागतो. शिवा (अक्षयकुमार) हा एक नाना उचापत्या करत चोर्या करणारा मनुष्य. त्याच्या जोडीला विनोदासाठी २जी (परेश गणात्रा) हे अजून एक पात्र दिलेले आहे. ह्या शिवाचे पहिल्याच नजरेत पारो (सोनाक्षी सिन्हा) प्रेम बसते. मग तिचे देखील अगदी टिपीकल मसालापटा प्रमाणे ह्याच्यावरती भेटल्या भेटल्या प्रेम बसते. हा तिला प्रामाणिकपणे आपण चोर आहोत असे सांगतो आणि तिच्या विनंतीवरून वाईट रस्ता सोडायचे देखील कबूल करतो. अर्थात त्या आधी एक मोठा हात मारून लाईफ सेटल करायचे असे ही मित्रांची जोडी ठरवते आणि मग खर्या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/326849-rowdy-rathore.jpg" width="430" height="230" alt="" />
मी चित्रपटाला सुरुवात होते असे म्हणतोय खरे, पण तोवर ४३ मिनिटे, असंख्य भिकार विनोदी दृश्ये आणि २ गाणी होऊन गेल्याने आपण जागे नसल्यास खरा चित्रपट सुरू झाला आहे हे देखील लक्षात येणे अवघड. मोठा हात मारण्याच्या नादात ही जोडगोळी रेल्वे स्टेशनवरून एका धनवान स्त्री ची (गुरदीप कोहली) मोठी पेटी पळवून आणतात. ह्या पेटीत एका इन्सपेक्टरच्या (यशपाल शर्मा) छोटी मुलगीच निघते आणि ती 'पापा' म्हणत अक्षयच्या गळ्यालाच मिठी मारते. आता इन्स्पेक्टर समोर ती आपलीच मुलगी आहे हे कबूल केल्याने अर्थातच तिची जबाबदारी पत्करणे अक्षयला भाग पडते. त्याच ट्रंकेत अक्षयला आपल्या सारख्याच दिसणार्या एका माणसाबरोबरचा त्या मुलीचा चिंकीचा फोटो पाहून त्याला धक्काच बसतो. चिंकीच्या वडलांचा शोध तो सुरू करतो आणि अचानक त्याच्यावरती हल्ले व्हायला सुरुवात होतात.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Rowdy_rathore_movie_still_2.jpg" alt="" />
गोंधळलेल्या अक्षयवरच्या अशाच एका हल्ल्याच्या वेळेस त्याला वाचवण्यासाठी इन्स्पेक्टर, ती धनवान स्त्री, एक लंगडा माणूस आणि स्वतः अक्षय सारखाच दिसणारा तो इसम असे सगळे हजर होतात आणि अक्षय अजूनच गोंधळून जातो. ह्या हल्यातून अक्षयला वाचवताना दुसरा अक्षय अर्थात ए. एस. पी. विक्रम राठोड गंभीररीत्या जखमी होतो. त्याला हॉस्पिटलात हालवले जाते आणि मग तिथेच इन्सपेक्टर शर्मा आणि ती धनवान स्त्री अर्थात इन्सपेक्टर रजीया खान ह्यांच्याकडून शिवाला विक्रम राठोडचा भूतकाळ, त्याची हुशारी, ताकद, अन्याया विरुद्धची चीड, त्याचे फेमस डॉयलॉग असे सर्व सर्व समजते. हे सगळे त्याला समजल्यावरती विक्रम राठोड समजूतदारपणे मरून जातो आणि मग त्याची जागा शिवा घेतो. आता तो आपल्या परीने विक्रम राठोडचे राहिलेले कार्य पूर्ण करायची प्रतिज्ञा करतो. तो ते कसे करतो हे पाहायचे असेल तर (पाहायचे आहेच का?) चित्रपट पाहण्या शिवाय पर्याय नाही.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Rowdy-Rathore-Review.jpg" alt="" />
चित्रपटात त्रुटी बघायला गेलो तर भरपूर आहेत. मुळात चित्रपटाची सुरुवात अतिशय संथ आहे. चित्रपटाची कथा सुरू होण्या आधीच घुसडलेले काही प्रसंग वात आणतात. संगीत, नृत्य, गाणी ह्या सगळ्या पातळीवरच चित्रपट साफ झोपला आहे. अक्षय कुठल्या प्रसंगात काय चेहरा करावा हेच समजत नसल्या सारखा वावरला आहे. कधीकाळी अॅक्शन दृश्ये सुंदरतेने साकारणारा अक्षय आजकाल प्रत्येक अॅक्शन दृश्यात उगाच विनोदी चेहरे अथवा हावभाव करून जॅकी चॅन होण्याचा प्रयत्न का करतो हे एक न उलगडणारे कोडे आहे. सोनाक्षी सिन्हा ही आमच्या आवडत्या स्त्रियांपैकी एक असली, तरी ह्या चित्रपटात ती 'जादू' ज्या मख्ख चेहर्याचे 'कोयी मिल गया' मध्ये वावरला आहे अगदी तशी वावरली आहे. अनंत जोग ह्यांची मिनिस्टरची भूमिका तर 'सिंघम' मधून कापून इथे चिकटवल्यासारखी वाटते. बाकी कलाकार 'चित्रपटात आहेत' ह्या दोन शब्दातच त्यांचे कौतुक पूर्ण होण्यासारखे आहे. खास करून ज्या स्टंट्स साठी हे रीमेक बघितले जातात ते तर इतके बालिश घेतले आहेत, की छोटा चेतन आणि अलीबाबा हे चित्रपट त्या समोर टायटॅनिक वाटतात.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Rowdy-Rathore-Akshay-Kumar.jpg" alt="" />
एकुणात काय तर अगदीच काही टाईमपास नसेल आणि २/२.१५ तास हालती चित्रच बघण्याचा अट्टहास असेल तर मग रावडीला हजेरी लावावी. मात्र मेंदू, भावना, आशा, अपेक्षा हे जाताना घरी सोडून जावे.PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-1244349658688122252012-05-07T17:25:00.000+05:302012-09-18T18:15:40.558+05:30जन्नत २<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Jannat2moviewallpapers.jpg" width="450" height="450" alt="" />
इम्रान हाश्मीचे चित्रपट चालण्याचे कारण गमतीने 'ASS' (Action, Songs, Sex) असे आम्ही कायम म्हणत आलेलो आहोत. नुकताच आलेला त्याचा जन्नत २ देखील ह्या सगळ्या अपेक्षांना पुरून उरतो. कुणाल देशमुखचे दिग्दर्शन आणि भट गँगचे प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन आले आहे.
नेहमीप्रमाणेच हा चित्रपट <a href="http://www.imdb.com/title/tt0472399/">mechanic</a> ह्या चित्रपटावर थोडाफार बेतलेला आहे. अर्थात भट गँगची ती खासियतच आहे म्हणा. 'ब्लडमनी' चा धसका घेऊन देखील ह्या चित्रपटाला हजेरी लावली, मात्र चक्क चक्क ह्यावेळी बराच टाईमपास झाला हे मान्य करावे लागेल. अर्थात चित्रपटाला जाण्याआधी आपली मिनिटा मिनिटाला 'भेणचोद' सारखी सतत वापरली जाणारी शिवी आणि 'चुत्तड पे लाथ' सारखे डायलॉग ऐकण्याची मानसिक तयारी आहे का ह्याचा विचार करून मगच पुढे पाऊल टाकावे.
<iframe width="560" height="315" src="http://www.youtube.com/embed/Xd95bTbUMJk?rel=0" frameborder="0" allowfullscreen></iframe>
सोनू दिल्ली अर्थात इम्रान हाश्मी हा एक अनधिकृत आर्म डिलिंग रॅकेट मधला छोटासा मोहरा असतो. सोनू के के सी (कुत्ती कमिनी चीज) ह्याच नावाने तो सगळीकडे ओळखला जात असतो, आणि अर्थात त्या नावाला जागणारे जीवन देखील जगत असतो. रिव्हॉल्वर, देशी कट्टे विकत आपली गुजराण तो करत असतानाच अचानक त्याच्या आयुष्यात दाखल होतो ए. सी. पी. प्रताप रघुवंशी (रणदीप हूडा). ह्या प्रतापची बायको प्रवासात दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेली असते आणि त्याच हल्ल्यात ह्या प्रतापच्या डोक्यात शिरलेली गोळी अजूनही तिथेच अडकलेली असते म्हणे. अर्थातच 'बदले की आग' ह्या न्यायाने प्रताप ह्या अनधिकृत आर्म रॅकेटसची पाळेमुळे खणून काढण्याची जिद्दीने झपाटलेला असतो.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/orginal_069a9c0b-7544-d988-7b61-000054345d4d.jpg" alt="" />
सोनू दिल्लीला कधी धमकावून, कधी तुरुंगात पाठवून तो त्याचे जिणे हराम करून सोडतो. शेवटी हे सगळे असह्य झालेला सोनू त्याच्याशी हातमिळवणी करतो आणि पोलिसांचा खबर्या बनतो. पहिल्याच खबरीच्या वेळी काहीतरी घोळ होतो आणि दुसरेच पोलीस तिथे उपटतात. पळून जाण्याच्या प्रयत्नात सोनूचा डीलर मारला जातो आणि सोनूची रवानगी तुरुंगात होते. ह्या मधल्या काळात सोनू साहेब जान्हवी (इशा गुप्ता) नावच्या डॉक्टरणीच्या प्रेमात पडतात आणि एक वेगळाच ट्रॅक सुरू होतो.
आता प्रताप सोनू दिल्लीला जान्हवीला सगळे सांगण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायला लागतो आणि वरच्या लेव्हलला अर्थात सिंडिकेटमध्ये काम करून ह्या रॅकेटच्या मुख्य कर्त्याधर्त्यापर्यंत पोचवण्याची अट घालतो. जान्हवीला सोनूचे सत्य माहिती नसल्याने आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडल्यावरती एक साधे जीवन जगण्याचे आमिष मिळाल्याने सोनू देखील ह्याला तयार होतो. एका सिंडिकेटच्या पार्टीत सोनू आपले गन्स मधले ज्ञान दाखवून मुख्य बॉसच्या खास माणसाला खूश करतो आणि त्याचा सिंडिकेट मध्ये प्रवेश होतो. आता खबरी आणि सिंडिकेट मधला माणूस अशा सोनूच्या दुहेरी आयुष्याला सुरुवात होते.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/jannat_2_wallpapers_20120424_1799719411.jpg" alt="" />
सोनूच्या आयुष्यात लग्न करून जान्हवीचा प्रवेश होतो आणि पुन्हा एकदा सोनूचे आयुष्य वेगळे वळण घेते. जान्हवीचा बाप मंगलसींग तोमर (मनीष चौधरी) हाच ह्या रॅकेटचा मुख्य असतो आणि आता सोनू वेगळ्याच कचाट्यात सापडतो. इकडे जान्हवीचा बाप सोनू मधले गुण ओळखून त्याला आपला वारस नेमतो आणि एक नवाच खेळ सुरू होतो. सिंडिकेट मधल्या खबरी कोणीतरी बाहेर फोडतो आहे हे एव्हाने सगळ्यांच्या लक्षात आलेले असते आणि संशयाची सुई सतत सोनूकडेच वळत असते, आणि त्यातच पोलिसांच्या खबरी सिंडिकेटला पुरवणारा देखील कोणीतरी आहे हे सोनुला समजते. ह्या सगळ्याला कंटाळून सोनू आता डबलगेम खेळण्याचा निर्णय घेतो. पैसे जमा करायचे आणि सरळ जान्हवीला घेऊन देशाबाहेर पळून जायचे तो ठरवतो. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असते. ते नक्की काय असते, सोनू पळून जाण्यात यशस्वी होतो का, प्रताप नक्की काय खेळ खेळत असतो हे सगळे समजून घ्यायचे असेल तर जन्नत २ ला हजेरी लावणे गरजेचे आहे.
भट गॅंगचा चित्रपट म्हणजे डायरेक्शन, लोकेशन्स अशा चर्चा करण्यात काही अर्थच नसतो. कथेचा प्लॉट व्यवस्थित 'उचलला' आहे का नाही, आणि संगीत कितपत बरे आहे येवढेच लक्ष द्यायचे. 'प्लॉट' उचलला देखील छान गेला आहे आणि संगीत देखील सुसह्य आहे. 'तू ही मेरा खुदा.. ' सारखी गाणी गाजत असल्याने त्याचा देखील फायदा चित्रपटाला मिळतोच आहे. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर अशा टिपीकल भूमिकांचा आता सरावच झालेला असल्याने इम्रान हाश्मी अगदी सहजपणे चित्रपटभर वावरला आहे. इशा गुप्ताला अंगप्रदर्शनाचेच काम आहे आणि तिने ते पुरेपूर सुंदर निभावले आहे. खास उल्लेख करावा लागेल तो रणदीप हूडा आणि मनीष चौधरी ह्यांचा.
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/401B155A2B2369F8C671A251866D8C.jpg" alt="" />
'डी', 'साहब बिवी और गँगस्टर' अशा चित्रपटातून भूमिका साकारणार्या रणदीप हूडाने आपल्या अभिनयात कमालीचा बदल घडवला आहे. एक अभिनेता म्हणून त्याच्याकडून ह्यापुढे काही एक अपेक्षा ठेवायला नक्की हरकत नाही. मनीष चौधरीला आपण 'पावडर' सारख्या मालिकांमध्ये अतिशय सहज आणि सुंदर अभिनय करताना ह्या आधी देखील पाहिले असेलच. इथे देखील त्याने आपल्या आवाजाचा, चेहर्याचा सुरेख वापर करत मंगलसींगची भूमिका झकास साकारलेली आहे. टिपीकल बॉलीवूड चित्रपटाचे चाहते असाल तर जन्नत तुमची मन्नत पूर्ण करणार हे नक्की.
<object width="420" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/BLxI_1iKYgc?version=3&hl=en_US&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/BLxI_1iKYgc?version=3&hl=en_US&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="420" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object>PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-90729656317752404932012-04-09T03:18:00.000+05:302012-09-18T17:49:26.576+05:30टायटॅनिक 4D<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Titanic-movie-poster.jpg" alt="" /><br />
<br />
कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे. ह्या नव्या, भव्य स्वरूपाच्या आणि 3D तंत्रज्ञानात प्रदर्शित झालेल्या टायटॅनिकचे आपण बघता बघता कधी चौथे डायमेन्शन होऊन जातो हे आपल्याला देखील कळत नाही.<br />
<br />
<object style="height: 390px; width: 640px"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/YvPV0F2-xi8?version=3&feature=player_embedded"><param name="allowFullScreen" value="true"><param name="allowScriptAccess" value="always"><embed src="http://www.youtube.com/v/YvPV0F2-xi8?version=3&feature=player_embedded" type="application/x-shockwave-flash" allowfullscreen="true" allowScriptAccess="always" width="640" height="360"></object><br />
<br />
शितयुद्धात बुडलेल्या आपल्या दोन युद्धनौका शोधण्यासाठी खरेतर अमेरिकेने मोहीम आखली होती आणि तेव्हा योगायोगानेच जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिकचा शोध लागला असे म्हणतात. चित्रपटात मात्र टायटॅनिकच्या अंतर्भागातील शोधाने चित्रपटाची सुरुवात होते. ब्रॉक लोव्हेट आणि त्याच्या टीमचा शोध चालू असतो एक अत्यंत मौल्यवान अशा रत्नहाराच्या शोधासाठी. 'हार्ट ऑफ द ओशन' असे सुंदर नाव असलेल्या त्या हाराचा शोध घेताना त्यांना रत्नहाराच्या मालकाची म्हणजेच 'कॅल हॉकली' ची तिजोरी सापडते. मोठ्या उत्साहाने ते तिजोरी बाहेर काढून फोडतात, मात्र तिजोरीत हाराच्या ऐवजी काही नोटा, खराब झालेली कागदपत्रे आणि एका नग्न स्त्री चे स्केच येवढेच सापडते. ह्या शोधाची बातमी टीव्हीवरती ऐकून रोझ डॉसन नावाची एक १०० पार करत असलेली वृद्धा ते स्केच आपलेच असल्याचा दावा करते. थोडी शंका, बरीचशी उत्सुकता अशा वातावरणात तिला शोधस्थळी आणले जाते, आणि तिने सांगितलेल्या एका जहाजाच्या अद्भुत कहाणीने चित्रपटाची खरी सुरुवात होते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Titanic-Prop---The-Heart-of-the-Ocean-Drawing.jpg" alt="" /><br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/titanic_heart_necklace.jpg" alt="" /><br />
<br />
खर्या आणि खोट्या कथांच्या अद्भुत मिश्रणाने दिग्दर्शक जेम्स कॅमरुन ने ह्या चित्रपटाची वीण गुंफलेली आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून तो आपल्याला त्यात गुंतवून ठेवतो. आणि आता 3D तंत्रज्ञानाने तर आपण त्या भव्य बोटीवरचेच एक प्रवासी बनून जातो. 'कधीही न बुडण्याचे सामर्थ्य लाभलेले पाण्यावरती तरंगते एक अद्भुत स्वप्न' असेच खरेतर ह्या भव्य दिव्य टायटॅनिक बोटीचे वर्णन करायला हवे. अमेरिकेच्या दिशेने निघालेल्या ह्या बोटीवरती रोझ (केट विन्स्लेट) ही आपली आई 'रुथ' आणि भावी अब्जाधीश नवरा 'काल' ह्यांच्या बरोबर प्रवास करत असते. रोझ आजूबाजूच्या चकचकीत आणि खोट्या दुनियेला उबलेली तर तिची आई काही करून रोझचे लवकरात लवकर लग्न व्हावे आणि आपल्यावरील कर्जे लवकर फिटावीत ह्या चिंतेत असलेली. तर प्रत्येक गोष्ट पैशात मोजणारा माजोरी कॅल त्याच्या एका वेगळ्याच दुनियेत वावरणारा. ह्याच बोटीत थर्डक्लास मधून प्रवास करत असतो तो जॅक डॉसन (लिओनार्डो डी कॅप्रिओ) हा एक धडपड्या चित्रकार. वेगवेगळे देश हिंडत चित्रकलेचा आनंद लुटणे आणि मनमौजी जगणे हा त्याचा स्वभाव. अशा विविध स्तरांच्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना घेऊन टायटॅनिकचा आणि आपला प्रवास सुरू होतो.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/titanic-sunset.jpg" alt="" /><br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Ruth-Rose-and-Cal-titanic-3033043-720-540.jpg" width="512" height="385" alt="" /><br />
<br />
ह्या दिखाव्याच्या आणि कसलेच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या आयुष्याला कंटाळलेली रोझ एके रात्री बोटीवरून जीव द्यायला निघते. मात्र तिथेच असलेला जॅक तिची समजूत घालून तिला वाचवतो. तिथे जमलेल्या लोकांना आणि 'कॅल' ला रोझ आपण तोल जाऊन पडणार होतो, मात्र जॅकने आपल्याला वाचवले असे खोटेच सांगते. इथेच रोझची आणि जॅकची मैत्री जमते. अर्थात अशा खालच्या दर्जाचा माणसाशी तिची मैत्री तिच्या आईला आणि होणार्या नवर्याला पसंत नसणे हे ओघानेच आले. जॅकच्या संगतीत रोझला एका वेगळ्याच विलक्षण आयुष्याची आणि जगाची ओळख होते. एकाच बोटीवरच्या ह्या आयुष्याच्या वेगवेगळ्या रंगांना पाहून ती थक्क होते. हळूहळू दोघेही एकमेकांकडे आकर्षीत व्हायला लागतात. रोझची आई आणि नवरा ह्यातला धोका वेळीच ओळखून दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी सर्व तर्हेचे प्रयत्न करायला सज्ज होतात.<br />
एके रात्री जॅकने काही मॉडेल्सची ज्या प्रमाणे नग्न स्केचेस काढली आहेत तसेच एक स्केच आपले देखील काढावे अशी इच्छा रोझ व्यक्त करते आणि जॅक तसे स्केच काढतो देखील भावी नवर्याने दिलेला अमूल्य असा 'हार्ट ऑफ द ओशन' फक्त अंगावरती ठेवून रोझ मॉडेल म्हणून हजर होते. स्केच पूर्ण होत असतानाच त्यांच्या शोधात असलेला 'काल' चा नोकर त्यांच्या पर्यंत पोचतो आणि त्यांना तेथून पळ काढावा लागतो. मात्र जायच्या आधी रोझ तो नेकलेस आणि आपले स्केच 'काल'च्या तिजोरीत ठेवून त्याला गुडबाय करायला विसरत नाही. आता बोटीवरती रोझ आणि जॅकसाठी शोधमोहीम सुरू होते. रोझ आणि जॅक मात्र गोडाउनच्या अंधारात एकमेकांच्यात जगाला विसरून गेलेले असतात. मात्र बोटीचे लोक त्यांना शोधत तिथे देखील पोचतात. आरा दोघेही तिथून पळ काढून डेकवरती धावतात, आणि त्याचवेळी रात्रीच्या सुमारास टायटॅनिक नावाच्या ह्या भव्य स्वप्नाला एका हिमनगाची धडक बसते. ही धडक येवढी वेगवान असते की बोटीच्या बेसमेंटला प्रचंड नुकसान होऊन बोटीत वेगाने पाणी शिरण्यास सुरुवात होते. <br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/tumblr_l730ff2NMH1qd9xcco1_400.jpg" alt="" /><br />
<br />
ह्या प्रसंगाचे साक्षीदार असलेले आणि पुढे येणार्या संभाव्य धोक्याची जाण असलेले रोझ आणि जॅक, रोझच्या आईला आणि कॅलला सावध करण्यासाठी त्यांच्या खोलीकडे धावतात. पिसाळलेला कॅल मात्र जॅकला खोट्या चोरीच्या केसमध्ये अडकवतो आणि सुरक्षारक्षकांच्या हवाली करतो. इकडे बोटीची अवस्था क्षणा क्षणाला बिघडत चाललेली असते. जास्तीत जास्त अजून दोन तास बोट तग धरेल ह्याचा अंदाज आणि मदत मिळू शकेल अशी दुसरी बोट टायटॅनिकजवळ पोचायला कमीत कमी चार तास अशी परिस्थिती निर्माण होते आणि एका प्रेमकहाणी मागे पडून मानवी भावभावनांची आणि जीवन-मृत्यूच्या खेळाची एक वेगळीच कहाणी आकार घ्यायला सुरुवात होते. जास्तीत जास्त निम्मेच प्रवासी वाहून नेता येतील येवढ्याच लाइफबोट्स टायटॅनिकवरती असल्याने अजून एक वेगळाच कठीण प्रश्न समोर येतो. अशावेळी मुले आणि स्त्रिया ह्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र ह्या गडबडीत रोझ सगळे काही सोडून जॅकला वाचवण्यासाठी धाव घेते. ती जॅकला वाचवू शकते ?, ते दोघे ह्या संकटातून बाहेर पडतात का?, टायटॅनिक नावाचे स्वप्न कुठले वळण घेते हे सगळे अनुभवायचे असेल तर टायटॅनिकचा प्रवास करण्यावाचून पर्याय नाही.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/halifaxtitaniclifeboat.jpg" alt="" /><br />
<br />
हतप्रभ होऊन स्वतःलाच गोळी मारून घेणारा चीफ ऑफिसर, शेवटच्या क्षणापर्यंत लोकांचे धैर्य टिकवून ठेवण्यासाठी सज्ज असलेला वाद्यवृंद, निराश आणि खचलेल्या मनाने मृत्यूला सामोरा जाणारा कॅप्टन, स्वप्नभंगाच्या दु:खात मृत्यूची वाट बघत थांबलेला बोटीचा डिझायनर असे एक ना अनेक लोक आपल्याला इथे भेटतात आणि जीवनाचे वेगळेच दर्शन घडवून जातात. टायटॅनिक मधले अनेक प्रसंग आपल्या काळजावरती कोरले जातात. स्वतःचा जीव धोक्यात असताना एका लहान मुलाला वाचवायला धावणारे जॅक आणि रोझ एका बाजूला तर लाईफ बोटीत जागा मिळावी म्हणून गर्दीत चुकलेल्या मुलीला आपलीच मुलगी सांगून जागा मिळवणारा कॅल एका बाजूला. बायकांना लाईफ बोटीत बसवता बसवता स्वतःच हळूच त्या बोटीत उडी मारून बसणारा मॅनेजींग डायरेक्टर जोसेफ एका बाजूला आणि पाणी कंबरेपर्यंत आलेले असताना लोकांना लाईफ जॅकेट्स वाटत फिरणारे पोर्टर एका बाजूला. <br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/600px-Titanic-webley3.jpg" alt="" /><br />
<br />
हे आणि असे बरेच प्रसंग आपल्याला हालवून सोडतात. ह्या अशा वेगळ्या अनुभवांसाठी का होईना पण टायटॅनिक पाहणे मस्टच.PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-32058151366706820192012-04-05T01:00:00.000+05:302012-09-18T18:15:40.563+05:30ब्लड मनीलिखाणाला सुरुवात करण्याआधी मला दोन अपराधांची क्षमा मागायची आहे. ते कन्फेशन का काय म्हणतात ना ते.<br />
<br />
१) मी ब्लडमनी हा चित्रपट पैसे खर्च करून थेटरात जाऊन बघितला.<br />
२) आणि वर मी आता त्याचे परीक्षण देखील लिहीत आहे.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/415px-Blood_Money_Poster_2.jpg" width="400" height="510" alt="" /><br />
<br />
ब्लड मनी हा महेश भट्ट साहेबांचा चित्रपट, अर्थात तो कुठूनतरी ढापलेल्या प्लॉटवरून तयार केलेला असणार हे उघड होतेच. त्यातून त्याला अभिनयसम्राट कुणाल खेमू आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री अम्रिता पुरी असल्याचे कळले आणि आम्ही ब्लड मनी विषयी वाचायचे देखील बंद केले. त्यातच एका मित्राकडून हा चित्रपट ब्लड डायमंडसवरून उचलल्याचे समजले. आता ब्लड डायमंड वरून उचलला आहे म्हणाल्यावरती एकदा बघायला हरकत नाही असा विचार मनात डोकावला आणि त्यातच ब्लडमनीचे पहिले पोस्टर रिलीज झाले. बघतो तर ते पोस्टर टाइम ट्रॅव्हलर्स वाइफची नक्कल. भट्ट गँग आजकाल चित्रपटच नाही तर पोस्टर्स देखील नक्कल करायला लागले आहेत, हे जीस्म २ पासून उघड झालेले आहेच. असो..<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/images-4.jpg" alt="" /><br />
<br />
खरेतर चित्रपटगृहाबाहेर पोचल्या पोचल्या समोर एजंट विनोद आणि ब्लड मनी असे दोन पर्याय समोर आले. दोन्हीची तिकिटविक्री काही वेळाने १ तिकिटावरती २ तिकिटे आणि ४ सामोसे फ्री अशा अवस्थेत जाईल अशी होती. पण मी निग्रहाने 'एजंट विनोद' कडे काणाडोळा केला आणि ब्लड मनी कडे धाव घेतली. 'विनाशकाले विपरीत बुद्धी'. ह्या चित्रपटाचे नाव ब्लड मनी का ठेवले असावे ह्याचा उलगडा पहिल्या १० मिनिटातच झाला. दर्शकाच्या खिशातून पैसा आणि शरीरातून रक्त हे दोन्ही कमी करण्याचे कार्य हा चित्रपट करत असल्याने ह्याचे नाव ब्लड मनी.<br />
<br />
<object width="560" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/5-t2-NenlrQ?version=3&hl=en_GB&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/5-t2-NenlrQ?version=3&hl=en_GB&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="560" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object><br />
<br />
कुणाल (कुणाल खेमू) हा एक फाटका तरुण, त्याचे आरझू (अम्रिता पुरी) वरती प्रेम असते. पण ह्याच्या फाटक्या चाळ्यांमुळे पोरीच्या घरचे लग्नाच्या विरोधात. मग दोघे पळून जाऊन लग्न करतात. लग्न झाल्याबरोबर कुणाल खेमूच्या हातावरच्या रेषा पुन्हा उजळतात आणि त्याला एकदम केपटाऊनमध्ये डायमंड एक्स्पोर्टचा बिझनेस करणार्या फर्म मध्ये जॉब मिळतो. त्या आधी कुणाल खेमू भारतात पिझ्झा डिलिव्हरी बॉय असतो म्हणे.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Blood-Money-4.jpg" alt="" /><br />
<br />
धर्मेश झवेरी (मनीष चौधरी) आणि दिनेश झवेरी ( संदीप सिकंद) हे दोन बंधू ह्या फर्मचे मालक दाखवलेले आहेत. खरेतर चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा धर्मेश झवेरी कोणा एकाचा मार मार मारून, आपण किती कमीने आहोत ह्याचा पाढा वाचून खून करताना दाखवलेला असल्याने, कुणाल कुठे येऊन आदळला आहे हे चित्रपटाच्या सुरुवातीलाच कळते. त्यामुळे अंधारात आजूबाजूचे चेहरे न्याहाळण्यासाठी आपल्याला पुढे बराच वेळ मिळून जातो. आल्या आल्या ह्या कुणालला एक लक्झरी बंगला राहायला मिळतो आणि एक ताबडतोब जीवाभावाचा मित्र देखील मिळतो. कंपनीत दाखल झाल्या झाल्या हा कुणाला करोडोंची डिल जी दिनेश झवेरीला करता येत नसते ती अशी चुटकीत करतो आणि धर्मेश तिवारीच्या गळ्यातला ताईत बनून जातो. ती डिल तो इतक्या बालिशपणाने करताना दाखवलेला आहे, की हा चित्रपट कुठल्याही 'झ' दर्जाच्या चित्रपटाची देखील नक्कल असण्याची शक्यता नाही हा अजून एक धक्का आपल्याला बसतो. आता कुणाल हा गळ्यातला ताईत झालेला असल्याने ताबडतोब धर्मेश झवेरी त्याला आपल्या घरी पार्टीला बोलावतो. ह्याच पार्टीत मग दिनेश झवेरी त्याची सेक्रेटरी मिया उएदा हिला कुणालच्या मागावरती सोडतो. ही भवानी संपूर्ण चित्रपटात भडक लिपस्टिक लावणे, आखूड शब्द देखील लांब वाटेल असे कपडे वापरणे आणि जाता येता कुणालच्या अंगचटीला जाणे ह्या शिवाय काहीही काम करताना दाखवलेली नाही. आता कुणालसमोर धर्मेश तिवारी एक पैशाचे जादुई जग उभे करतो, जिथे पैसा, मान मरातब, आलिशान गाड्या, दारू आणि जोडीला ही अवदसा अशी सगळी सुखे हात जोडून उभी असतात. त्यामुळे मग केपटाऊन मध्ये आल्या आल्या फक्त एखादं दोन दिवस बोंबलत हिंडल्यानंतर कुणाल आता आरझूच्या वाटेला येणे बंदच होते. त्याच्या पार्ट्या, त्याच्या रात्र रात्र चालणार्या मीटिंग्ज ह्यामध्ये तो व्यस्त होऊन जातो.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/bloodmoney.jpg" alt="" /><br />
<br />
<br />
आरझू ही टिपीकल बायको असल्याने तिला ह्या सगळ्याचा त्रास सुरू होतो. अधे मध्ये कुणाल तिला लाडाने 'झू' वगैरे म्हणून समजूत काढण्याचा प्रयत्न करतच असतो पण ती काय ऐकायला तयार नसते. अशातच कुणालला आपला बॉस दिनेश तिवारी हा फ्रॉड करत असल्याचे लक्षात येते आणि तो मग सगळे आपल्या बॉसच्या कानावरती घालतो. अर्थातच बॉस लगेच त्याला एक उंची हॉटेलात जेवायला नेतो आणि एक बालिश लेक्चर आणि उदाहरण देऊन आपल्या कामाशी काम ठेवायचा सल्ला देतो. कुणाल मात्र 'मला सत्य समजलेच पाहिजे' अशी भूमिका घेतो. त्यातून त्याला आपल्या धंद्यात माफियांचा देखील समावेश असल्याचे कळते आणि तो हादरतो. पण पैशाची उब मिळालेला आणि चैनीला हपापलेला कुणाल हे सत्य मान्य करूनही आपल्या कामाला लाथ मारत नाही. उलट अजून जोमाने कार्यरत होतो. पुढे एका रात्री पार्टीत तो भरपूर दारू ढोसून आणि अंमली पदार्थ खाऊन मिया उएदाशी देखील रत होतो. (येवढा एकच प्रसंग जरा थोडा फार डोळे भरून बघण्यासारखा आहे. )<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/1665493-1.jpg" alt="" /><br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/blood-money.jpg" alt="" /><br />
<br />
मग त्याच्या प्रगतीवरती जळणारा त्याच्या बॉसचा लहान भाऊ दिनेश त्याला त्याचे आणि मियाचे फोटो दाखवून ब्लॅकमेल करतो. उद्ध्वस्त अवस्थेत पोचलेला कुणाल मग आरझू पाशी सत्य काय ते स्वतःच बोलतो. ताबडतोब आरझू उन्मळून + कोसळून पडते आणि भारतात परतण्याचा निर्णय घेते. मधल्या काळात ती कुणालचा मित्र आणि त्याच्या बायकोकडे आश्रयाला जाते. इकडे कुणालला एक डिल डन करत असताना अचानक आपला बॉस दहशतवाद्यांसाठी देखील काम करत असल्याचे कळते. खरंच सांगतो, इतका मतिमंद प्रसंग मी आयुष्यात कधी मराठी सिनेमात किंवा रामसे बंधूंच्या सिनेमात देखील पाहिलेला नाही. हा दहशतवादी सरदार एका हिर्यांच्या खाणी पाशी ह्या कुणालची वाट बघत बसलेला असतो, त्याच्यासाठी पाठवलेल्या पेट्यांमधून बंदुका असल्याचे कुणालला तिथे लगेच तो बॉक्स असा काड्यापेटी सारखा उघडा पडल्याने लगेच समजते. इकडे ह्या दहशतवाद्याला भेटून ५/६ मिनिटात परत येत असतानाच त्याच बंदुका घेऊन ह्या दहशतवाद्याच्या माणसांनी केपटाऊनमध्ये अनेकांची हत्या केल्याची दृश्ये टीव्ही वरती दाखवली जायला लागतात.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/kunal-blood3.jpg" width="500" height="350" alt="" /><br />
<br />
इमॅजीन करा, कुणाल खेमू त्याच्या प्रायव्हेट प्लेन मधून केपटाऊन मध्ये पोचण्याच्या आधीच शस्त्रे पोचतात आणि दंगल पण होते.ह्या दंगलीत कुणालचा मित्र देखील मारला जातो. कुणाल पोचेपर्यंत त्याचे दफन देखील झालेले असते. आता देशाभिमान आणि मानवनेते पेटून उठलेला कुणाला आपल्या बॉसच्या विरोधात जातो. अता तो विरोधात जातो म्हणजे नक्की काय माकडचाळे करतो ते पाहायला आणि हो ह्या चित्रपटाचा 'न भूतो न भविष्यती' असा शेवट बघायला म्हणून का होईना तुम्ही थेटरामध्ये जायलाच पाहिजे. गेला बाजार टोरेंट तरी उतरवलेच पाहिजेत.PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-8454131449710463252012-03-28T13:21:00.000+05:302012-09-19T19:11:52.187+05:30द विच : एक परी (उत्तरार्ध)'हॅकर्स अंडरग्राउंड' एक अद्भुत, अनोखे आणि थरारक जग. जगभरच्या संगणक वापरकर्त्यांसाठी असलेले सर्वात मोठे नंदनवन, जिथे जागोजागी कल्पवृक्ष आणि कामधेनू उभ्या होत्या. तर मायक्रोसॉफ्ट, अॅडॉब, जावा सारख्या कंपन्यांसाठी सर्वात मोठे शत्रूचे ठाणे, जिथे जागोजागी आंतरजालीय नक्षलवाद्यांच्या आणि समाजवाद्यांच्या टोळ्या मोर्चे बांधून लचके तोडायला बसल्या होत्या. 'हॅकर्स अंडरग्राउंड' म्हणजे काही मातब्बर हॅकर्सनी उभारलेले एक जग होते, जिथे जगातले महागात महाग सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टिम, पॅचेस, विविध अपडेट्स जे जे म्हणून तुम्हाला विनाकारण प्रचंड रक्कम मोजून विकत घ्यावे लागते ते सगळे फुकटात अगदी क्रॅक मारून, अधिकृत करून फुकटात दिले जात असे. विंडोजची नवी ऑपरेटिंग सिस्टिम आली ? दोन दिवसात क्रॅक सकट, की-जेन सकट फुकट उतरवून घ्यायला हॅकर्स अंडरग्राउंड मध्ये उपलब्ध आहे. नवीन अॅंटिव्हायरस हवा आहे ? नॉर्टन पासून पांडा पर्यंत वर्षभर सबस्क्राईब केलेले अनेक पर्याय हॅकर्स वरती उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण आहे ? कीबोर्ड साफ कसा करावा इथपासून ते मदरबोर्ड रिपेअरींग पर्यंत सगळी माहिती अगदी स्क्रीन शॉट सकट हॅकर्सवरती मिळणार म्हणजे मिळणार. 'हॅकर्स अंडरग्राउंड' दिवसें दिवस प्रचंड लोकप्रिय होते होते आणि धोकादायक देखील. आणी ह्या अशा जगात कधी कधी लहान-सहान मदत शोधत जाणारा मी, आता ऍडमिन म्हणून आमंत्रित केला गेला होतो.<br />
<br />
====================<br />
'हॅकर्स अंडरग्राउंड' म्हणजे एक अनोखेच विश्व होते. त्या विश्वात प्रवेश करावा की नको हे मला काहीच ठरवता येत नव्हते. शेवटी मी गुमराहचा सल्ला घेतला. गुमराहने माझे चांगलेच ब्रेन वॉशिंग केले आणि 'हॅकर्स अंडरग्राउंडचा' नवा शिलेदार म्हणून मी बिनघोरपणे माझे पाऊल पुढे टाकले. 'गिव्ह अँड टेक'च्या जमान्यात काही मोजकेच शिलेदार आपली बुद्धिमत्ता आणि वेळ खर्च करून नवशिक्यांसाठी आणि गरजूंसाठी हे विश्व चालवत होते. अर्थात ज्या ऍडमिनच्या शिफारशीने तुम्ही इथे ऍडमिन बनता, तो ऍडमिन सोडला तर इतर कोणाची नावे देखील तुम्हाला कळत नाहीत आणि तुमची देखील कोणी चौकशी करत नाही. ऍडमिन देखील सदस्य म्हणूनच वावरतात आणी मदत करत राहतात. काही अडचण मग ती सदस्यांना असो वा ऍडमिनला सोडवण्यासाठी एकच व्यक्ती उपलब्ध होती आणि ती म्हणजे 'मार्कस'. हा मार्कस म्हणजे देखील एक अनोखा मनुष्य होता. त्याच्या विषयी कधीतरी सवडीने नक्की लिहीन. ह्या संपूर्ण विश्वाचा डोलारा, कॉपीराइट्सचे नियम - कायदे सगळे हा मनुष्य एकहाती सांभाळत असे.<br />
<br />
नवीन नवीन असताना माझ्याकडे वेगवेगळे रिमोटस तयार करणे, याहू, एम्-एस-एन साठी टॉकिंग बॉटस बनवून देणे,लिट ट्रान्सलेटर, हॅश कोडर बनवणे अशी लहान लहान कामे होती. पुढे काही काळातच मी फेक वेबकॅम, अँटिव्हायरस क्रॅकिंग, की-जेन इत्यादींवरती देखील काम करायला लागतो. ह्या काळात मी, गुमराह आणी द विच चे त्रिकूट खूपच जवळ आले. आमचे रोजचे फोन,दिवस दिवस चाट तर चालू असेच. अर्थात फोन करण्याची ऐपत नसल्याने मी याहू कॉल्सवरतीच भागवत असे. द विच तर कधी कधी माझ्या घरच्यांशी देखील गप्पा मारत असे. ह्या फोन्सचा एक फायदा झाला, तो म्हणजे द विच चे मराठी 'तू कशी हाय?' इथपर्यंत सुधारले आणि आमच्या मातोश्रींचे इंग्रजी 'आय एम फाईन, हाऊ आर यू' पर्यंत सुधारले. अशातच एके दिवशी मला 'द विच' चा फोन आला. 'मी मुंबईत येते आहे आणि मुंबई पासून तुझे शहर किती दूर आहे' ह्या दोन प्रश्नांची उत्तरे मिळवून तिने सरळ फोन ठेवून दिला. कधी येणार आहे, कशी येणार आहे, का येणार आहे.. काही काही सांगितले नाही. ह्यानंतर आठवडाभर ती नेटवरून गायबच झाली. सात-आठ दिवसांनी पुन्हा फोन आला आणि माझा पत्ता माहिती करून घेऊन पुन्हा कट झाला. ह्यावेळी निदान 'मी बुधवारी येते आहे' येवढे सांगण्याची कृपा आमच्यावरती झाली होती.<br />
<br />
बुधवारी मी सकाळपासूनच आतुरतेने द विच ची वाट पाहत होतो. ह्याआधी तिला फोटोत देखील कधी बघितले नसल्याने आठवतील तेवढ्या परदेशी ललनांच्या चेहर्यांची उजळणी करून झाली होती. साधारण दुपारी २ च्या सुमाराला कॅफेबाहेर एक रिक्षा थांबली आणि त्यातून गोरीपान, निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची 'द विच' आमच्या कॅफेकडे बघायला लागली. मी लगबगीने उठून तिचे स्वागत केले आणि आधारासाठी हात पुढे केला. 'डिअर साठ वर्षाची असले तरी अजून आधाराची गरज लागत नाही मला, उलट लोकांना मीच आधार देत असते.' असे म्हणत आणि डोळे मिचकावत द विच आमच्या कॅफेत प्रवेशकर्ती झाली. "तुला कोणी यंग ब्युटिफुल येणार वाटले होते का?" ह्या तिच्या प्रश्नाने आमच्या चेहर्यावरचे भाव तिने सहज वाचल्याचे समजले आणि कबुली देण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. पण एखाद्या तरुणीला देखील लाजवेल असा उत्साह, उमदेपणा आणि निरागसता 'द विच' मध्ये भरभरून वाहत होती. तिच्या बरोबर वेळ कसा गेला ते देखील कळले नाही. तिच्या बरोबर मग मी मस्त महाराष्ट्रीय थाळी खायला गेलो, तिच्या आग्रहाखातर ऊसाचा रस पिला, तिला गणपतीचे मंदिर दाखवले आणि बरेच काय काय केले. तिला भेटल्यावरती आपण तिला पहिल्यांदाच भेटतो आहोत हा विचार काही क्षणातच नाहीसा झाला आणि आम्ही अगदी मिसळून गेलो. माझ्या भयाण इंग्रजीचा मारा सोडला तर तिचा देखील दिवस छान गेला असावा. संध्याकाळी तिला न्यायला तिचा कोणीतरी मित्र येणार होता. फोनवर पत्ता समजावून घेत घेत एकदाचा तो देखील कॅफेत पोचला आणि आमच्या भेटीचा (द विच च्या शब्दात डेटिंगचा) दिवस संपला. तिच्या ह्या मित्राबरोबर एक छानशी गोडशी मुलगी देखील आली होती. १७/१८ वर्षाची ती मुलगी एखाद्या बाहुली सारखी दिसत होती. द विच ने पुन्हा एकदा बाय बाय केले आणि "अरे ओळख करून द्यायला विसरलेच, 'ही माझी मुलगी कॅथरीन आणि कॅथरीन तू पॅपिलॉनला ओळखतेसच." असे सांगून पुन्हा एकदा डोळे मिचकावले. त्या बाहुलीने देखील खट्याळपणे हसून दाखवले आणि शेवटी स्वतःची खरी ओळख करून दिली आणि "मी बबलगर्ल" सांगून माझी विकेट काढली.<br />
<br />
ह्या भेटीनंतर द विच बरोबरच बबलगर्लशी देखील माझे सूत चांगलेच जुळले आणि समवयस्क असल्याने आमच्या गप्पा देखील रंगू लागल्या. 'द विच' हे काय रसायन आहे हे मला बबलगर्ल कडून हळूहळू उलगडले आणि मी अक्षरशः थक्क झालो. 'द विच' चा जन्म झाला तोच मुळी तुरुंगात. आईची आणि बँकेची फसवणूक करून बाप परागंदा झाला होता आणि त्या केसमध्ये आई मात्र अडकली होती. मुलीला जन्म देताच त्या बिचारीने प्राण सोडले आणि 'द विच' ची रवानगी आधी आश्रमात आणि कळत्या वयात दत्तक म्हणून वॉटसन कुटुंबाकडे झाली. वॉटसन कुटुंबात तिला पहिल्यांदा हक्काचे प्रेम अनुभवायला मिळाले. शिक्षणाची गाडी रुळावरती यायला लागली. पण नियतीला ते बघवले नसावे. अचानक आलेल्या हार्ट अॅटॅक मध्ये मिस्टर वॉटसन दगावले आणि वॉटसन कुटुंब गरिबीच्या कड्याकडे वेगाने धावू लागले. अशावेळी छोटी 'जेन' अर्थात 'द विच' हिमतीने पुढे झाली आणि फ्लॉवर गर्ल पासून ते पिझ्झा शॉप, बेबी सिटिंग पर्यंत सर्व कामे हिमतीने करत तिने घर सावरले आणि स्वतःचे शिक्षण देखील चालू ठेवले. ह्या सगळ्या काळात तिला अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले. अपमानापासून ते बलात्कारापर्यंत सगळे भोग तिच्या वाटेला आले. घर सावरले जात असतानाच मिसेस वॉटसन देखील कालवश झाल्या आणि जेन पुन्हा एकदा एकाकी झाली. अशातच तिला बँकेची नोकरी चालून आली. बँकेच्या नोकरीतच तिचा संगणकाशी परिचय झाला. आधीच थोडीशी अबोल असलेल्या आणि आता पूर्णच एकाकी झालेल्या जेन च्या जिवाला एका आभासी जगाचा ओलावा मिळाला आणि ती हरखूनच गेली. फावल्या वेळात संगणकाचे शिक्षण घेणे तिने चालू केले आणि जोडीला चालू केले अनाथ मुलांसाठी समाजकार्य. तिच्या पगारातला एक मोठा हिस्सा संगणकावरती आणि ह्या मुलांवरती खर्च होऊ लागला. "आजच्या घडीला ती २४ अनाथ मुलांच्या पालन पोषणाचा आणि शिक्षणाचा खर्च उचलत आहे आणि त्यातला एकाला तर तिने दत्तक घेऊन आपल्या घरीच आणून ठेवले आहे, आणि ती मी आहे पॅपिलॉन."<br />
<br />
'द विच' चे हे रूप माझ्यासाठी अगदीच शॉकींग होते. एक हॅकर म्हणून दरारा असलेली, माझ्या चुकांमध्ये देखील मला पाठीशी घालणारी, माझ्यासाठी बिनधास्त पंगे घेणारी ही 'द विच' अशी असेल असे कोणाला वाटले होते? पुढे पुढे तर मी तिला मदर टेरेसाच म्हणायला लागलो होतो. पण सुखाचे दिवस टिकत नाही म्हणतात हेच खरे. एके दिवशी एयरपोर्टवरून येत असताना कॅथरीनच्या गाडीला अपघात झाला आणि ती जागेवरच ठार झाली. येवढी धीरोदात्त असूनही 'द विच' हा आघात मात्र सोसू शकली नाही. अक्षरशः ती कोलमडून पडली. कुठेतरी स्वतःचे बालपण आणि तारुण्य कॅथरीन मध्ये ती बघत असावी, जपत असावी. अनेक वादळाला सामोरे गेलेली 'द विच' ह्या वयात ह्या प्रसंगाने मात्र पूर्ण खचली. हळूहळू नेटवरचा तिचा वावर देखील कमी होत गेला. आठवडा पंधरा दिवसांनी येणारे कॉल्स आता दोन्-तीन महिने देखील येईनासा झाले. तोवर माझी परिस्थिती जरा बरी झाली असल्याने मीच अधे मध्ये तिला कॉल लावायचो पण बर्याचदा तो उचलला जायचा नाही किंवा २/४ मिनिटात ती संभाषण आटोपते घ्यायची. तिला बहुदा आता ह्या जगापासून आणि आमच्यापासून देखील दूर जायचे होते. मी देखील मग तिला त्रास होऊ नये म्हणून फोनच्या ऐवजी ईमेल्स ची वाट पसंत केली. ईमेल्सला देखील फक्त त्रुटक उत्तरे मिळायची. अशातच गुमराह एकदम नाहीस झाला आणि मी पूर्णच खचलो. आधी 'द विच' आणि आता 'गुमराह' मला एकटे टाकून सगळ्यापासून दूर झाले आणि मला अगदी पोरके वाटायला लागले. माझे मन त्या दुनियेत रमेना. शेवटी मी देखील त्या जगाला शेवटचा गुडबाय केला आणि सर्व आठवणी मागे सोडून सगळ्याचा निरोप घेतला.<br />
<br />
गुमराहचा तर पत्ताच नव्हता, पण ख्रिसमस, माझा वाढदिवस, दिवाळी अशा प्रसंगी 'द विच' ची शुभेच्छापत्रे मात्र आठवणीने ईमेलवरती धडकत होती. मी तर इतका विरक्त झाल्यासारखा झालो होतो की मी त्यांची पोच देखील देत नव्हतो. अशातच मागच्या आठवड्यात अचानक 'द विच' चा फोन आला आणि तो आवाज ऐकून पुन्हा एकदा मी रोमांचित झालो. सगळ्या चौकश्या झाल्यावरती 'द विच' अचानक म्हणाली "तुला माहितीये, परवा खूप दिवसांनी इंटरनेटला कनेक्ट केले. माझ्या लॅप्पीत बहुदा ट्रोजन शिरल्याचे जाणवले. रिमूव्हल शोधायला सर्च केला तर एक फोरम मिळाला."<br />
<br />
"मग घेतलेस का नाही रिमूव्हल डाऊनलोड करून?"<br />
<br />
"नाही रे. तुला सांगते, काय हे आजकालचे फोरम रे, रिमूव्हल स्टेप बाय स्टेप कसे करावे हे वाचायला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागते आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत १०$. आणि रिमूव्हलची .exe हवी असेल तरी १०$.<br />
<br />
"ते तर आता सगळ्यांनीच चालू केले आहे. पैसा तेव्हा देखील महत्त्वाचा होता आणि आता तर अतिमहत्त्वाचा झाला आहे बाई. मग शेवटी भरलेस का मग पैसे ?"<br />
<br />
"तेच भरायला आले होते, पण तो फोरमच हॅक झालाय. रजिस्ट्रेशन पण गरजेचे नाही आणि सॉफ्टवेअर पण फुकट डाऊनलोडाला उपलब्ध झाले आहे. स्ट्रेंज ना?"<br />
<br />
"खरंच स्ट्रेंज आहे." मी येवढेच म्हणालो आणि फोन संपल्या संपल्या कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा 'हॅकर्स अंडरग्राउंड'च्या पेजवरती हजेरी लावली आणि फक्त 'she is back' येवढीच पोस्ट टाकली. एका तासात ५७९ लाईक्स आणि ३५९ आनंदाने आणि उत्साहाने भरलेल्या कॉमेंट्स लगोलग येऊन आदळल्या. 'she' म्हणजे कोण हे सांगायची मला गरज पडली नाही.<br />
=========================<br />
<br />
(समाप्त)PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-85634350760509294872012-03-26T13:18:00.000+05:302012-09-19T19:11:52.190+05:30द विच : एक परी (पूर्वार्ध)आंतरजालावरती हॅ़किंगच्या नव्या दुनियेची ओळख करून घेत असताना आणि गुमराहच्या हाताखाली नवं नवे धडे गिरवत असताना अगदी योगायोगाने एकदा माझी भेट 'द विच' बरोबर झाली. ही खरेतर गुमराहची मैत्रीण, पण तसे म्हणाले तर आंतरजालावरती तिला शत्रू असे नव्हतेच. एकतर तिचा धाक आणि आपण बरे आपले काम बरे ही वृत्ती. तिचे खूप काही किस्से होते किंवा तिनी लोकांना छळ छळ छळले होते अशातला काही भाग नाही, पण का कोण जाणे एकूणच आंतरजालावरती ज्या मोजक्या लोकांचा दबदबा होता त्यात द विच चे नाव चांगलेच वरती होते. ह्या 'द विच' ची आणि 'बबल गर्ल' ची जोडी फार जमायची. दोघी एकाच शहरातल्या, मँचेस्टर मधल्या.<br />
<br />
मी गुमराहकडे शिकायला सुरुवात केली त्याच्या साधारण एक वर्षाने गुमराहच्या एखादं दोन FTP चे पासवर्ड एकदा चालेनात, तेव्हा मी त्याला ऑफलाईन मेसेज टाकून ठेवला . गुमराह अॅज युज्वल त्याच्या सहलीमध्ये रममाण होता. दुसर्या दिवशी मला याहू मेसेंजर वरती 'द विच' ची अॅड रीक्वेस्ट मिळाली आणि त्यात तिने FTP चे पासवर्ड पण दिले होते. 'द विच' ने देखील प्लेन टेक्स्ट मध्ये पासवर्डस दिले होते जे मला लिट फॉन्ट्स मध्ये कन्व्हर्ट करून घ्यावे लागले. गुमराहला देखील अशीच सवय होती, तो बिनधास्त ईमेल अथवा प्रायव्हेट मेसेजेसनी पासवर्ड पाठवून। देत असे, अर्थातच प्लेन टेक्स्ट मध्ये. हे प्लेन टेक्स्ट मधले पासवर्ड DOLLDOLL, LOVEANDHATE असे दिसत असत, मात्र ते खरेतर लिट फाँटस मध्ये कन्व्हर्ट करून घेतल्याशिवाय, जसे की D0||D0||, |0v3@nd|-|@t3 चालत नसत. गुमराह आणि द विच ह्यांच्यातल्या ह्या साम्याचे मला तेव्हा फार आश्चर्य वाटले. पण ही तर सुरुवात होती.<br />
<br />
मी थोडाफार शिकलो आहे असे वाटू लागल्यावरती गुमराहने फावल्या वेळात आमची रवानगी 'द विच ट्रेनिंग स्कूल मध्ये' करून टाकली. 'जातोस का?' 'आवडेल का ?' इत्यादी प्रश्न मला विचारण्याची त्याला गरज वाटली नाही, आणि त्याने असे विचारले नाही म्हणून मला देखील राग आला नाही. मी स्वतःला त्याच्या हातात सोपवून मोकळा झालो होतो. 'द विच ट्रेनिंग स्कूल' म्हणजे 'द विच' चे स्वतःची चाट रूम. तिथे तिचे नाना विविध प्रयोग चालायचे आणि अधे मध्ये तिथेच 'बबल गर्ल' चे देखील दर्शन व्हायचे. ही बबल गर्ल एकदम नटखट, बालिश वाटायची पण हळू हळू ती देखील 'द विच' ला तोडीस तोड आहे ह्याची खात्री पटायला लागली. खात्री पटायला लागली म्हणण्यापेक्षा अनुभवच असा आला, की पुन्हा आम्ही खात्री पटवायचा प्रयत्नच केला नाही. 'द विच' आणि 'बल गर्ल' हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी असावेत अशी अनेकांना असलेली शंका माझ्या मनात देखील घर करून होतीच. आता विनासायास 'द विच' च्या प्रयोगशाळेत प्रवेश मिळालाच होता, तर आपण देखील थोडे प्रयोग करून बघायला हरकत नाही असे मी ठरवले. पहिला प्रयत्न म्हणून दोघींचे आयपी ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. पण दोघीही पर्मनंट प्रॉक्सी वापरत असल्याचे लक्षात आले आणि तो नाद सोडून द्यावा लागला. मग पुढील पायरी म्हणून त्यांचे मशीन आयडी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्या दिवशी आम्ही हा प्रयत्न सुरू केला त्याच दिवशी ३० मिनिटात आमच्या मोडेम मधून धूर बाहेर निघाला. झक मारली आणि आयडी शोधली असे होऊन बसले. नशिबाने ह्यावेळी आम्ही कॅफेमधला लोकल पिसी वापरत असल्याने कॅफे बंद वगैरे करावा लागला नाही, पण इंजिनिअर दुसरा मोडेम आणेपर्यंत 'राम नाम' घेत बसावे लागलेच.<br />
<br />
पुन्हा सगळे व्यवस्थित सेट अप करून संध्याकाळी आमची स्वारी ट्रेनिंग स्कूल ला हजर झाली. मला पाहताच द विच ने मला वेट करायला आणि लॉग ऑफ न करायला बजावले आणि अ-वे झाली. १० मिनिटात 'बबल गर्ल' देखील हजर झाली. आल्या आल्या बबल गर्ल ने आम्ही केलेल्या उपद्व्यापांचे टाइम स्टँप लॉग्ज आमच्या तोंडावरती फेकून मारले आणि छानशी खरडपट्टी सुरू झाली. इकडे मी मात्र हे प्रकरण गुमराहला कळले तर अजून काय काय होईल ह्या कल्पनेने अर्धमेला झालो होतो. थोड्यावेळाने पुन्हा इन्व्हाईट केल्याशिवाय ह्या रूम मध्ये यायचे नाही अशी तंबी देऊन आमची हकालपट्टी करण्यात आली. अपेक्षेनुसार दुसर्या दिवशी गुमराहचा याहू कॉल आलाच. मग पुन्हा एकदा शाब्दिक फटके आणि लाथा मिळाल्या. वरती 'तुम पंडित लोक हर जगह अपनी अक्कल क्यू लगाते हो?' हे ऐकावे लागले ते वेगळेच. मग काही दिवसांनी पुन्हा आमची रवानगी 'द विच ट्रेनिंग स्कूल' ला झाली. पण आता 'द विच' पहिल्यापेक्षा पूर्ण बदललेली वाटत होती. कामापुरते बोलणे आणि सतत टोमणे मारणे येवढेच ती सतत करत होती. पण चूक माझीच असल्याने आणि मुख्य म्हणजे तिच्याकडून मिळेल तेवढे ज्ञान घ्यायचे असल्याने मी काही न बोलता सगळे सहन करत होतो. हळूहळू तिचा स्वभाव पालटला आणि बराच शांत झाला. आता काही चुकले तरी टोमणे न मिळता वेगळ्या प्रकाराने पुन्हा तेच शिकवण्यास सुरुवात झाली. २ महिन्यात मी 'द विच' कडे 'शेल हॅ़किंग' पासून ते 'रोड सिग्नल हॅ़किंग' पर्यंत सगळे काही शिकलो. अधे मध्ये 'बबल्स' देखील काही ना काही गमती जमती शिकवून जायची. बघता बघता मी बरेच काही शिकलो आहे आणि 'द विच' च्या म्हणण्याप्रमाणे 'हॉर्स' झालो. एके दिवशी मग आमची साग्रसंगीत परीक्षा घेण्यात आली. अनेक प्रश्न विचारले गेले, अनेक कोड सोडवायला सांगितले गेले, जे मी बर्यापैकी सोडवले देखील. दुसर्या दिवशी आमचा रिझल्ट चांगला लागल्याची पावती दस्तूरखुद्द 'द विच' ने दिली आणि मी भरून पावलो. अर्थात हा आनंद दीर्घकाळ टिकला नाही, कारण रिझल्ट सांगून झाल्या झाल्या 'द विच' चा प्रश्न बाणासारखा सरसरत आला, 'पॅपिलॉन ह्या मिळालेल्या ज्ञानाचे काय करणार आहेस?'<br />
<br />
खरंच काय करणार होतो मी ह्या ज्ञानाचे ? एकदा शिकलो की मग ह्याला सतावू, त्याचा छळ करू, अमक्याला अद्दल घडवू, तमक्याची वेबसाइट हॅक करू हे मनातले सुरुवातीचे बालिश विचार आता गुमराह आणि द विच सारख्यांच्या कंपनीमध्ये पूर्णपणे मागे पडले होते. प्रयोगशाळेतल्या प्रसंगानंतर तर एका वेगळ्याच जिद्दीने मी हे सगळे शिकत होतो. पण खरे सांगायचे तर ह्या ज्ञानाचे करायचे काय हा विचार मी कधीच केला नव्हता. तिच्या प्रश्नावरती मी गप्पच राहिलो, खरंच काय उत्तर देणार होतो मी ? ती अगदी ४ दिवसांनी सांग म्हणाली असती, तरी मी काही सांगू शकलो असतोच असे नाही. त्या दिवशी पहिल्यांदा 'द विच' ने मला माझा फोन नंबर मागितला. दोन दिवसांनी मला याहू मेसेज करून, वेळ वगैरे आहे का नाही ह्याची व्यवस्थित खातरजमा करून मला तिचा फोन आला आणि हा फोन मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे विमान ठरला. फोनवरती कसे बोलावे, काय बोलावे इत्यादीची जुळणी, इंग्रजी शब्दांची जोडा जोड मनातल्या मनात चालू असतानाच तिचा फोन आला. आवाज मस्तच होता तिचा, थोडासा घोगरा पण एक हुकुमत असणारा. फोनवरती तिने अगदी व्यवस्थित माझी चौकशी केली. कॅफे कसा चालू आहे, इन्कम किती होते, शिक्षण किती झाले इ. इ. अगदी विवाह मंडळात विचारतात तसे प्रश्न विचारले. ती स्वतः विषयी खूपच कमी बोलली, पण माझ्याविषयी बरेच काही माहिती करून गेली. अगदी फोन ठेवता ठेवता तिने मला ऑफर दिली ती 'हॅकर्स अंडरग्राउंड' जॉईन करण्याची आणि ते देखील एक ऍडमिन म्हणून.<br />
<br />
'हॅकर्स अंडरग्राउंड' एक अद्भुत, अनोखे आणि थरारक जग. जगभरच्या संगणक वापरकर्त्यांसाठी असलेले सर्वात मोठे नंदनवन, जिथे जागोजागी कल्पवृक्ष आणि कामधेनू उभ्या होत्या. तर मायक्रोसॉफ्ट, अॅडॉब, जावा सारख्या कंपन्यांसाठी सर्वात मोठे शत्रूचे ठाणे, जिथे जागोजागी आंतरजालीय नक्षलवाद्यांच्या आणि समाजवाद्यांच्या टोळ्या मोर्चे बांधून लचके तोडायला बसल्या होत्या. 'हॅकर्स अंडरग्राउंड' म्हणजे काही मातब्बर हॅकर्सनी उभारलेले एक जग होते, जिथे जगातले महागात महाग सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टिम, पॅचेस, विविध अपडेट्स जे जे म्हणून तुम्हाला विनाकारण प्रचंड रक्कम मोजून विकत घ्यावे लागते ते सगळे फुकटात अगदी क्रॅक मारून, अधिकृत करून फुकटात दिले जात असे. विंडोजची नवी ऑपरेटिंग सिस्टिम आली ? दोन दिवसात क्रॅक सकट, की-जेन सकट फुकट उतरवून घ्यायला हॅकर्स अंडरग्राउंड मध्ये उपलब्ध आहे. नवीन अॅंटिव्हायरस हवा आहे ? नॉर्टन पासून पांडा पर्यंत वर्षभर सबस्क्राईब केलेले अनेक पर्याय हॅकर्स वरती उपलब्ध आहेत. काही तांत्रिक अडचण आहे ? कीबोर्ड साफ कसा करावा इथपासून ते मदरबोर्ड रिपेअरींग पर्यंत सगळी माहिती अगदी स्क्रीन शॉट सकट हॅकर्सवरती मिळणार म्हणजे मिळणार. 'हॅकर्स अंडरग्राउंड' दिवसें दिवस प्रचंड लोकप्रिय होते होते आणि धोकादायक देखील. आणी ह्या अशा जगात कधी कधी लहान-सहान मदत शोधत जाणारा मी, आता ऍडमिन म्हणून आमंत्रित केला गेला होतो.<br />
<br />
(क्रमशः)PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-30240974541928002552012-01-25T15:18:00.000+05:302012-09-18T18:15:40.562+05:30शाळा : प्रत्येकाच्या मनातली<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/shala.jpg" alt="" /><br />
<br />
मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे. एकाच विषयावरती दुसरा धागा चालू करत असल्याने आधीच क्षमस्व.<br />
<br />
शाळा चित्रपटाची आतुरतेने वाट बघणे गेली दोन वर्षे सुरूच होते. पुणे चित्रपट फेस्टिवलला हा सगळ्यात आधी पुण्यात आला. मात्र एकाच चित्रपटाचे तिकिट मिळत नसल्याने आणि संपूर्ण सीझन तिकिटच घ्यायच्या सक्तीने तेव्हा हा चित्रपट पाहता आलाच नाही. शेवटी एकदाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि परवा तो बघण्याच्या सुवर्णक्षण आम्हाला मिळाला. रात्री ८.३० वाजताच्या शो ला साधारण ८.१५ वाजताच पोचलो, तर चित्रपट ८.४० ला असल्याचे कळले. स्क्रीन पाशी पोचलो तर एका आई वडील त्यांची कन्या आणि लांब उभ्या असलेल्या एक काकू येवढा प्रचंड प्रेक्षकवर्ग शाळा बघायला आल्याचे लक्षात आले. ८.४० वाजेपर्यंत संख्या वाढून साधारण १०-१२ लोक दाराबाहेर प्रतीक्षा करताना दिसले. ८.४० वाजल्यानंतर देखील दरवाजे उघडेनात तेव्हा आज बहुदा कोरम अभावी शो रद्द होतो का काय अशी शंका मनात आली. शेवटी ८.४५ ला दारे उघडली आणि आम्ही आत शिरकाव केला. नेहमीप्रमाणेच आधी चुकीच्या रो मध्ये, मग हक्काच्या रो मध्ये असे करत स्थानापन्न झालो आणि तेवढ्यात चित्रपटाला सुरुवात झालीच.<br />
<br />
<object width="560" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/CqnEbMjUu8I?version=3&hl=en_US&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/CqnEbMjUu8I?version=3&hl=en_US&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="560" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object><br />
<br />
"वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गायींच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे." शाळाचा हा ब्लुर बरेच काही सांगून जाणारा आणि बर्याच आठवणींचा ठेवा गवसून देणारा. १९७० च्या सुमारास एका छोट्याश्या गावात घडणारी ही एक तरल प्रेम कथा. तिला थोडीफार जोड आहे ती आणीबाणी आणि पौगंडावस्थेतल्या मुलांच्या भावभावनांच्या पार्श्वभूमीची.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/2-1.jpg" width="500" height="370" alt="" /><br />
<br />
सुर्या, फावड्या, चित्र्या आणि जोशी हे नववीत शिकणारे वर्गमित्र. ह्यातला जोश्या अर्थात मुकुंद जोशी हा आपल्या ह्या कथेचा नायक आहे. सुर्याच्या वडलांच्या परवानगीने त्यांच्या बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीत अभ्यासासाठी एकत्र जमणे हे ह्या पोरांचे रोजचे काम. अर्थात शाळा भरण्या आधी तिथे एकत्र जमून मग लपून छपून येणार्या जाणार्या शाळेतल्या मुलींची आणि शिक्षकांची टिंगल करणे, त्यांना आवाज देणे हे ह्यांचे मुख्य काम. ह्यातल्या सुर्याचे वर्गातील गुप्तेवरती प्रेम बसलेले आहे. सुर्याने तिला केवडा हे नाव देखील बहाल करून टाकलेले आहे. खिडकीत उभा राहून तिला जाता येता बघणे आणि उसासे टाकणे ह्या खेरीज सुर्या काही करू शकत नसतो. चित्र्या नेहमीच अभ्यासात आणि संशोधनात मग्न. अर्थात कादंबरीतले चित्रेचे पात्र आणि चित्रपटातील चित्रे ह्यांचा फारसा मेळ जुळत नाही. फावड्या हा सुर्या सारखाच अभ्यासत कच्चा. फावल्या वेळात घरचा भाजीचा गाळा सांभाळणे हे ह्याचे काम. जोशी मात्र हरहुन्नरी. अभ्यासात ठीकठाक, वेळच्या वेळी गृहपाठ करणारा, बुद्धिबळात चमक दाखवणारा आणि मुख्य म्हणजे चित्रपट ओळखण्याच्या भेंड्यांत वर्गातील समस्त मुलींना पुरून उरणारा. ह्या जोश्याची लाइन अर्थात त्याच्या मनात बसलेली असते ती वर्गातली शिरोडकर. <br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/254824_10150196816065904_108029570903_7299452_1441337_n.jpg" width="400" height="300" alt="" /><br />
<br />
ह्या सर्वांचा गुरु म्हणजे चित्र्या आणि चित्र्याचा गुरु म्हणजे त्याचा नरुमाम. हे नरुमामाचे कॅरेक्टर जितेंद्र जोशीने मस्त साकारले आहे. वर्गातल्या वयाने मोठ्या आणि महेश नावाच्या पोरावरती बिनधास्त प्रेम करणार्या गीताला जेव्हा मुकुंदा वर्गात खूप त्रास देतो असे कळते तेव्हा नरुमामा अशा मुलीला आपण खरेतर मदत केली पाहिजे असा सल्ला मुकुंदाला देतो तो शॉट मस्तच. जोश्या आता आपल्या लाइनीचा अर्थात शिरोडकरचा पत्ता मिळवण्याच्या मागे लागतो, मग त्यासाठी तो तिच्या घराच्या आसपास राहणार्या मिसाळला इंग्रजी शिकवण्याचे गाजर दाखवतो. एक अगदी सहजपणे त्याच्याकडून तिचा पत्ता देखील काढून घेतो. पुढे शाळा बदललेल्या एका मित्राकडून शिरोडकरने त्याचाच क्लास लावला असल्याची बातमी कळते आणि जोश्या लगेच त्या क्लासला ऍडमिशन घेऊन मोकळा होतो. मग हमखास गल्लीतल्या गाठी भेटी सुरू होतात. त्यातून कळत नकळत फुलत जाणारी एक वेगळीच भावना चित्रपटात अतिशय छान खुलवली आहे.<br />
<br />
जोश्याच्या भूमिकेत अंशुमन जोशी आणि शिरोडकरच्या भूमिकेत केतकी माटेगावकर अक्षरशः 'छा गये है.' चित्रपट एका निरागसतेने पुढे पुढे सरकत जातो. ही निरागसता प्रत्येक पात्राच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात देखील सतत जाणवत राहते. प्रेम म्हणजे नक्की काय आहे, आपल्या शिरोडकर आवडते म्हणजे नक्की काय होते ह्याची नीटशी जाणीव देखील नसलेला जोश्या तिला "आपण पुढे काय करायचे?" असे विचारतो तेव्हा आपल्याला खदखदून हसायला येतेच मात्र त्या शब्दांमागची निरागसता काळजाचा ठाव देखील घेते. चित्रपटाला आणीबाणीची पार्श्वभूमी देखील आहे, मात्र एक दोन ठळक प्रसंग सोडता ती कुठे फारशी जाणवत नाही. शिरोडकला बेंद्रे बाईंनी रडवल्याने पेटून उठलेला जोश्या त्यांच्या पुढच्या तासाच्या आधी फळ्यावरती 'अनुशासन पर्व' लिहितो तो प्रसंग खासच. सुजय डहाके ह्यांनी खरेतर अप्रतिम अशा तुकड्या तुकड्यांनी जोडलेल्या प्रसंगातून ही कथा मस्त फुलवत नेली आहे. जोश्याने पकडल्यावरती अक्षर ओळखत येऊ नये म्हणून शिरोडकरला डाव्या हाताने चिठ्ठी लिहिणे, फावड्याच्या भाजीच्या गाळ्यावरती समोर एकदम शिरोडकरला आपल्याशी बोलताना पाहून जोश्याची उडालेली भंबेरी, काँन्व्हेंट मधून थेट ह्या मराठी शाळेत आलेली आणि बिनधास्त मुलांशी बोलणारी आंबेकर सुर्याकडे लाँड्रीवाल्या मुलाची तक्रार करते, सुर्या केवड्याला 'आपल्याला लाईन देते का?' असे विचारतो असे काही प्रसंग छान चितारलेले आहेत.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/safe_imagephp.jpg" alt="" /><br />
<br />
'कोवळ्या वयातील प्रेमकथा' ह्या टॅग लाइन खाली आपण आजकाल अनेक अत्याचार सहन केले आहेत. मात्र शाळा ह्याला नक्की अपवाद आहे. केतकी माटेगावकरने उभी केलेली शिरोडकर ही अक्षरशः कादंबरीतूनच बाहेर आल्यासारखी वाटते. तिचे दिसणे तर मोहक आहेच पण अभिनय आणि कॅमेर्याची जाण देखील अतिशय सुरेख. कोवळ्या वयात जाणवणार्या भावना, एखाद्या मुलाशी घराजवळ उभे राहून बोलताना होणारी कुचंबणा, भिती तिने अतिशय सहजपणे अभिनयातून साकार केली आहे. जोश्याने 'भेटणार का?' विचारल्यावरती तिचे 'छे बॉ. आपल्याला नाही जमायचे तसले काही' म्हणणे तर एकदम कलिजा खलास करणारे. अंशुमन जोशीने देखील अतिशय उत्तम आणि समंजस अभिनयाने आपल्या कॅरेक्टर मध्ये रंग भरले आहेत. केवड्याच्या वडलांच्या भूमिकेत आनंद इंगळे, मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर छोट्या प्रसंगातही आपली छाप सोडून जातात. इतिहास भूगोल ह्यावरती अतिशय प्रेम करणारे आणि इतर विषयांना तुच्छ समजणारे मांजरेकर सर संतोष जुवेकरनी अप्रतिम साकारले आहेत. <br />
<br />
कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर उतरली असेल अशा समजुतीने जाल तर हा चित्रपट तुमची नक्कीच निराशा करेल. अर्थात कादंबरी मुख्य कथानकासह पडद्यावर आणण्याच्या सुजय डहाके ह्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे हे नक्की. शाळा न वाचलेल्यांनी तर ती वाचल्याशिवाय ह्या चित्रपटाला जाऊच नये, अन्यथा काही प्रसंग डोक्यावरून जाणार हे निश्चित. चित्रपटात काही उणीवा देखील निश्चित राहिल्या आहेत. वैभव मांगले, अमृता खानवीलकर ह्यांच्या भूमिकांची इतकी काटछाट झालेली आहे, की त्या भूमिकांना काही आगा पिछाच राहिलेला नाही. त्यामुळे त्या मनावरती ठसत नाहीत आणि उगाच घुसडल्यासारख्या वाटतात. आणीबाणी आणि तिच्याशी निगडित काही प्रसंगांचा कादंबरीत इतका सुरेख उपयोग करून घेतलेला असताना चित्रपटात मात्र त्याची उणीव जाणवते. जोश्या आणि शिरोडकर ह्यांच्यातले प्रसंग चित्रपटात छानच फुलवले आहेत, मात्र अधे मध्ये ते उरकून टाकल्यासारखे वाटतात. शिरोडकरचे घर कळल्यावरती जोश्याने तिथे चालू केलेल्या फेर्या, तिच्या गल्लीच्या कोपर्यावरील सार्वजनीक वाचनालयाचा वाढत्या फेर्या हे सगळे चित्रपटात अजिबात दाखवलेले नाही. जोश्याचे वर्गातल्या मुलींना चिमण्या म्हणणे, चित्र्याचे संशोधक प्रयोग, त्याच्या घरच्या परिस्थितीने त्याचे कोवळ्या वयात होणारे हाल, फावड्याची परिस्थिती हे देखील कुठेच समोर येत नाही. त्यामुळे सुर्या, फावड्या, चित्र्या ही पात्रे काहीशी दुर्लक्षित आणि विनोद निर्मिती पुरतीच उरून बसतात.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/shala-moviestills-01.jpg" alt="" /><br />
<br />
अर्थात उणीवा बाजूला सरून एकदा तरी हा चित्रपट अनुभवावा हे निश्चित. जाता जाता दखल घेण्याजोगे म्हणजे चित्रपटासाठी केलेली गावाची निवड आणि गावाचे घडणारे रम्य दर्शन गणपतीचे देऊळ, नदीचा काठ.. सगळेच अप्रतिम. निव्वळ ह्यासाठी ह्या चित्रपटाला मी ४ गुण नक्की देईन.<br />
<br />
<object width="420" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/6IFxDCci564?version=3&hl=en_US&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/6IFxDCci564?version=3&hl=en_US&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="420" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object>PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-44516411559661821642011-12-26T02:30:00.000+05:302012-09-18T18:15:40.565+05:30मगधीरा<object width="560" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/OJS3ghj0mmY?version=3&hl=en_GB&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/OJS3ghj0mmY?version=3&hl=en_GB&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="560" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object><br />
<br />
काजल अगरवाल हिच्यावरती आजकाल आमचा भारी जीव. तिच्यावरती चित्रित केलेले मगधीरा मधील ' धीर धीर..' हे आमचे अत्यंत आवडते असे गाणे. ह्या मगधीरा चित्रपटाबद्दल खूप ऐकले होते, खरेतर हा एकदा पाहिला देखील होता. मात्र सबटायटल्स नसल्याने शष्प काही कळले नव्हते. चार दिवसांपूर्वी सबटायटल्स सकट ह्या चित्रपटाची प्रिंट मिळाली आणि दिल एकदम गार्डन गार्डन झाले. ह्या एका नितांत सुंदर चित्रपटाची ही ओळख.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Magadheeramp3songsT_114.jpg" alt="" /><br />
<br />
मगधीरा म्हणजे शूर, धैर्यवान. हा चित्रपट फ्लॅशबॅक आणि वर्तमान अशा दोन्ही काळात वावरणारा असला तरी दोन्ही काळांचा सुंदर संगम साधलेला असल्याने इतर फ्लॅशबॅक चित्रपटांसारखा कंटाळवाणा होत नाही. चित्रपटाची कथा सुरू होते ४०० वर्षापूर्वीच्या काळापासून. चित्रपटाच्या सुरुवातीलाच कड्यांवरून पडून जखमी काजल अगरवाल मृत्युमुखी पडताना दिसते, मृत्यूपूर्वी तिने कोणा भैरवाकडे (राम चरण तेजा) प्रेमाची मागितलेली कबुली आणि तिच्या मागोमाग त्याने देखील मारलेली उडी अशा दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. ह्या दोघांच्या मृत्यूनंतर त्याच कड्यांवरती शेरखान (श्री हरी रघुमुंद्री) भैरव परत जन्म घेणार आणि आपले ह्या जन्मात अपुरे राहिलेले प्रेम प्राप्त करणार अशी गर्जना करताना दिसतो आणि आपल्याला पुढचा अंदाज यायला लागतो.<br />
<br />
आता एकदम वर्तमानाकडे चित्रपट वळतो. पूर्वजन्मीचा भैरव आता हर्षा म्हणून जन्माला आलेला असतो. बाइक रेसींग, स्टंट हे त्याच्या उपजीविकेचे साधन. तर पूर्वीची युवराज्ञी मित्रविंदा अर्थात काजल अगरवालने इंदू म्हणून जन्म घेतलेला आहे. एका पावसाळी दिवशी रिक्षाने जात असताना हर्षाचा स्पर्श इंदूच्या हाताला होतो आणि त्याला गतजन्मीच्या काही गोष्टी दिसतात. ह्या धक्क्याने हादरलेला हर्षा आता इंदूचा शोध घ्यायला रिक्षा सोडून धावतो. काजल अगरवाल त्याच्या शोधामागचे नक्की सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्याला आपण इंदूची मैत्रीण असल्याचे खोटेच सांगते आणि त्यांची गाठ घालून देण्याचे वचन देते. इकडे चालबाज हर्षा देखील आपण इंदूला ओळखतो, तिचे आणि आपले प्रेम आहे मात्र तिचा बाप ह्याच्या विरुद्ध आहे असे खोटेच सांगतो. आता सुरू होतो तो इंदूला भेटवण्याचा आणि दर वेळी तो फसण्याचा खेळ.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/magadheera-000011.jpg" alt="" /><br />
<br />
इंदूचे वडील इकडे आपल्या पूर्वजांच्या उदयगढ ह्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयीन लढा देत असतात, ज्यावर त्यांच्या मेव्हण्याने कब्जा केलेला असतो. ह्या मेव्हण्याचा मुलगा रघुवीर (देव गील) इंदूला पाहताच तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्या प्राप्तीसाठी वेळेला स्वतःचा वडलांचा देखील खून करायला मागे पुढे पाहतं नाही. आता इंदू आणि प्रॉपर्टी दोन्ही मिळवायचा तो निश्चय करतो. त्याचा गुरु घोरा मात्र त्याला सावध करतो, की जोवर हर्षा जिवंत आहे तोवर तो इंदूला कधीच मिळवू शकणार नाही. त्यानंतर घोरा त्याला त्याच्या पूर्वजन्मीची हकिगत सांगतो. इकडे इंदू मात्र हर्षाच्या प्रेमात बुडलेली असते. आता तो इंदू आणि तिच्या वडलांची क्षमा मागून त्यांना आपल्याकडे घेऊन येतो. हर्षाच्या प्रेमात बुडलेल्या इंदूच्या प्रेमाला आधी तिचे वडील विरोध करतात, मात्र नंतर त्याला मान्यता देण्याचा निश्चय करतात. त्यांचा हा बदलता निर्णय पाहून रघुवीर त्यांचा खून करतो आणि आळ हर्षावरती आणतो. परिस्थिती देखील अशी येते की हर्षाच खुनी असल्याचा इंदूचा ठाम विश्वास बसतो.<br />
रघुवीर आता इंदूला आपल्याबरोबर उदयगढला नेण्याचा निर्णय घेतो, त्याचवेळी हर्षा आपले निर्दोषत्व सांगायला तिथे पोचतो. बर्याच हाणामारीनंतर हेलीक्रॉप्टरला लटकलेल्या हर्षाला इंदूचा पुन्हा स्पर्श होतो आणि एक झटका बसून तो थेट खाली तळ्यात कोसळतो.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Magadheera-Bluray-Screenshots-1080p-4.jpg" width="400" height="317" alt="" /><br />
<br />
आता ह्यावेळी आपला संपूर्ण पुनर्जन्म त्याला आठवतो. आता चित्रपट थेट ४०० वर्षे मागे १६०० सालात जाऊन पोचतो. उदयगढ च्या राज्याची मित्रविंदा (वर्तमानातली इंदू) ही एकुलती एक कन्या. तिचा भावी पती म्हणून रणदेव भिल्ल (अर्थात वर्तमानातला रघुवीर) कडे पाहिले जात असते. मित्रविंदा मात्र मनातल्या मनात भैरव (वर्तमानातील हर्षा) वरती प्रेम करत असते. ह्या भैरवाच्या अनेक पिढ्यांनी उदयगढ साठी आपले प्राण त्यागलेले असतात. त्याच्या वंशातील योद्ध्यांना एक शाप असतो, १०० शत्रू मारल्याशिवाय ते रणांगणात देह ठेवणार नाहीत आणि ३० वर्षाच्या वरती कोणी जगणार नाही.<br />
मित्रविंदाच्या प्राप्तीसाठी ठेवलेल्या पणात रणदेव भिल्ल आणि भैरव दोघेही भाग घेतात. रणदेवाच्या वर्तणुकीने आधीच चिडलेली मित्रविंदा ह्या पणात जो हरेल त्याला बहिष्कृत करून राज्याबाहेर काढले जाईल असेही सुनावते. राज्याच्या आणि मित्रविंदेच्या लालसेने पछाडलेला रणदेव अनेक कॢप्त्या करतो मात्र शेवटी भैरवच जिंकतो. अर्थातच रणदेवाला राज्याबाहेर हाकलले जाते. भैरवच्या वंशाला असलेल्या शापाची माहिती असल्याने राजा भैरवला मित्रविंदाच्या प्राप्तीचा ध्यास सोडण्याची आणि प्रेमाचे त्याग करण्याची विनंती करतो, जी जड मनाने भैरव स्वीकारतो. मित्रविंदा मात्र कोसळून पडते.<br />
<br />
इकडे राज्यावरती शेरखान ह्या हिंदुस्थान प्राप्तीच्या ध्येयाने पछाडलेल्या योद्ध्याचे सावट आदळते. त्यातच अपमानित झालेला रणदेव भिल्ल शेरखानशी हात मिळवतो आणि राजाचा खून करून राज्य ताब्यात घेतो. शंकराच्या पूजेसाठी गेलेले मित्रविंदा आणि भैरव मात्र बचावतात. आता शेरखानच्या फौजेसह रणदेव त्यांच्यावरती चाल करून जातो. भैरवाच्या शौर्याचे किस्से ऐकलेला शेरखान त्याला आव्हान देतो आणि १०० सैनिकांची तुकडी त्याच्या एकट्यावरती हल्ला करायला पाठवतो. भैरव त्या सर्व सैनिकांना कंठस्नान घालतो. त्याच्या पराक्रमाने स्तब्ध झालेला शेरखानदेखील त्याच्यापुढे आदराने झुकतो. रणदेव मात्र ह्यासर्वाला तयार नसतो. शेवटी त्याचा व भैरवच्या अंतिम युद्धात भैरव त्याला ठार मारतो, मात्र मरता मरता रणदेव मित्रविंदाला चाकूने प्राणघातक जखम करूनच प्राण सोडतो.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Magadheera_Movie_Review.jpg" width="400" height="317" alt="" /><br />
<br />
चित्रपट पुन्हा वर्तमानकाळाकडे वळतो. पाण्यात बुडलेल्या हर्षाला आता पूर्वजन्मीचा शेरखान आणि ह्या जन्मीचा सोलोमन हा कोळी वाचवतो. त्याच्या मदतीनेच आता इंदू अर्थात मित्रविंदाला मिळवण्यासाठी हर्षा सज्ज होतो. मग जे काय टिपिकल साऊथ स्टाइल घडत जाते ते पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे. <br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/images-3.jpg" alt="" /><br />
<br />
कुठेही उगाच भावनांना हात घालण्याचा न केलेला प्रयत्न, अप्रतिम संगीत, भव्य आणि अप्रतिम सेट्स, सुंदर लोकेशन्स, झकास गाणी आणि कोरीओग्राफी, प्रत्येक फ्रेम मध्ये दिग्दर्शकाबरोबरच जाणवणारे कॅमेरामनचे टीम वर्क, आणि त्याला लाभलेली सर्वच कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाची साथ ह्या सगळ्याचा जुळून आलेला योग म्हणजे मगधीरा. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने अनेक<a href="http://en.wikipedia.org/wiki/Magadheera#Awards"> अॅवॉर्डस </a>मिळवले. लक्ष्मी आणि सरस्वती अशा दोघींचा वरदहस्त ह्या चित्रपटाला लाभला. लवकरच ह्या चित्रपटाचा हिंदी रीमेक देखील येणार असल्याची चर्चा आहे.<br />
<br />
<object width="560" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/EocBE0TD5c8?version=3&hl=en_GB&rel=0&hd=1"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/EocBE0TD5c8?version=3&hl=en_GB&rel=0&hd=1" type="application/x-shockwave-flash" width="560" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object>PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-53261459740975757432011-11-21T12:24:00.000+05:302012-09-18T17:41:51.561+05:30शटर<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/220px-Shutterposter.jpg" alt="1" /><br />
<br />
मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील '<a href="http://www.misalpav.com/node/18837">अ टेल ऑफ टू सिस्टर्स</a>' आणि '<a href="http://www.misalpav.com/node/19643">अॅकेशिआ</a>' ची ओळख ह्या आधी करून दिलीच आहे. ह्याच यादीतला आणखी एक चित्रपट म्हणजे 'शटर'. 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अॅकेशिआ' हे काहीसे गडद गडद अंधारात घडणारे , मानसिक आंदोलने दाखवणारे चित्रपट होते, मात्र शटर ह्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि सतत तुमच्या मनावर एक दडपण ठेवून असणारा चित्रपट. ह्या चित्रपटात देखील रक्तपात, हिडीस चेहरे ह्याचा समावेश नाही, मात्र चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम आपल्याला खिळवून ठेवते.<br />
<br />
<object width="420" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/pJy1R5lI8U8?version=3&hl=en_US&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/pJy1R5lI8U8?version=3&hl=en_US&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="420" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object><br />
<br />
टन हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर असतो. तो आणि त्याची गर्लफ्रेंड जेन एकदा पार्टीवरून परत येत असताना, जेनच्या हातून एक अपघात घडतो. ती आपल्या गाडीने एका तरुण मुलीला उडवते. गाडीबाहेर जाऊन तिला मदत करण्याच्या विचारात असलेल्या जेनला टन थांबवतो आणि त्या तरुणीला तसेच रस्त्यात सोडून दोघे निघून जातात. इथून खर्या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/imagesCA6M5MQ3.jpg" alt="2" /><br />
<br />
ह्या प्रसंगानंतर एकाएकी अनेक चमत्कारिक घटना घडू लागतात. सतत आपल्या भोवती कोणीतरी वावरत आहे असे दोघांना वाटत असते. त्यातच टनने काढलेल्या प्रत्येक फोटो मध्ये एक धुरकट आकृती दिसायला लागते. कधी धुरकट सावलीच्या रूपात, तर कधी चेहर्याचा रूपात. प्रथमतः टनला हा कॅमेर्याचा प्रॉब्लेम वाटतो, मात्र तसे काहीच निष्पन्न होत नाही. इकडे जेन मात्र आपण ज्या मुलीला उडवले त्या मुलीचा आत्माच हे सगळे करत आहे ह्या निष्कर्षावर पोहोचते. टनला मात्र हे सगळे अमान्य असते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/shutter1.jpg" alt="3" /><br />
<br />
टनच्या मित्रांना देखील आता विचित्र अनुभव यायला लागतात. टनला देखील अचानक मानदुखीचा त्रास सुरू झालेला असतो, त्याचे वजनकाटा देखील त्याचे वजन विचित्र दाखवायला लागलेला असतो. शेवटी जेन त्या अपघातग्रस्त तरुणीचा शोध सुरू करते. तपासात जेनला त्या मुलीचे नाव नात्रे असल्याचे आणि ती आणि टन व त्याच्या मित्रांचा ग्रुप कधीकाळी एकाच कॉलेजात शिकत असल्याचे समोर येते. आता मात्र टनला सत्य सांगण्याशिवाय पर्याय उरत नाही. कधी काळी त्याचे आणि नात्रेचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याने नाते तोडल्यावर ते दु:ख सहन न होऊन नात्रेने आत्महत्या केल्याचे टन कबूल करतो. इकडे टनचा एक मित्र नात्रेच्या आत्म्याच्या भितीने आत्महत्या करतो. आता पुढचा नंबर आपलाच असल्याची त्याची खात्री पटते.<br />
<br />
ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायच्या इराद्यानेच आता जेन आणि टन दोघेही नात्रेच्या आईला जाऊन भेटता. तिथे गेल्यावर नात्रेने कशी आत्महत्या केली हे त्यांना कळते, मात्र नात्रेची आई तिचा मृत्यू मान्य करायलाच तयार नसते. तिने आपल्या मुलीचे प्रेत अर्थात सांगाडा तिच्या बेडरूम मध्ये जतन करून ठेवलेला असतो. त्याच रात्री हॉटेलात उतरलेल्या टन आणी जेनवरती नत्रेचा आत्मा हल्ला करतो, ज्यात टन जखमी होतो. अथक प्रयत्नांनी दोघेही तिच्या आईला समजवतात आणि शेवटी नात्रेची विधिपूर्वक विल्हेवाट लावली जाते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/2194984.jpg" alt="4" /><br />
<br />
आता सर्व काही सुरळीत होईल ह्या आशेनं परतलेल्या जेनला काही फोटो मिळतात, जे नात्रेचे टनच्या फ्लॅट मधील अस्तित्व दाखवत असतात. फोटोंचा माग घेत असतानाच एका जेनच्या हातात एका बुकशेल्फ मध्ये लपवलेल्या काही जुन्या निगेटिव्ह्ज लागतात. त्या डेव्हलप केल्यानंतर एक भयानक रहस्यच जेनच्या समोर येते आणि चित्रपटाला वेगळेच वळण लागते. हे रहस्य काय असते ? टन आणि त्याच्या मित्रांच्या जीवावर नात्रेचा आत्मा का उठलेला असतो ? हे सगळे शोधायचे तर शटर पाहण्याशिवाय पर्याय नाही. आणि हो हे सर्व सोडाच पण 'टनला नक्की मानदुखीचा त्रास कशाने होत असतो' ह्या एकमेव प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तरी शटर पाहाच पहा.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/shutter5.jpg" alt="5" /><br />
<br />
शटरचा त्याच नावाने २००८ साली अमेरिकन रीमेक देखील आलेला आहे, तर हिंदीत तो क्लिक नावाने आला होता. मी तरी तुम्हाला 'ओरिगिनल' शटरच बघण्याचा सल्ला देईन. अर्थात जालावर त्याचे सबटायटल्स सहजपणे उपलब्ध आहेतच. एका वेगळ्या प्रकारचा हॉरर चित्रपट बघायची इच्छा असेल आणि मिनिटा मिनिटाला नवनवे धक्के बसणे आवडत असेल तर शटरला पर्याय नाही.<br />
<br />
हा संपूर्ण चित्रपट आंतरजालावर <a href="http://www.youtube.com/watch?v=mWno4I62Bs8">फुकट उपलब्ध </a>आहे.<br />
<br />
<object width="560" height="315"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/mWno4I62Bs8?version=3&hl=en_US&rel=0"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/mWno4I62Bs8?version=3&hl=en_US&rel=0" type="application/x-shockwave-flash" width="560" height="315" allowscriptaccess="always" allowfullscreen="true"></embed></object>PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-56498498699159002822011-11-09T01:17:00.000+05:302012-09-18T18:15:40.569+05:30!! मोरया !!<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/moraya.jpg" alt="" /><br />
<br />
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या. किरकोळ बदल सोडता अवधूत गुप्ते ह्यांनी झेंडाचीच टीम इथे उतरवलेली आहे.<br />
<br />
कथा-पटकथा-संवाद अशी तिहेरी जबाबदारी सचिन दरेकर ह्यांनी सांभाळलेली असून, अतुल कांबळे आणि अवधूत गुप्ते ह्यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. दिग्दर्शन म्हणून पुन्हा एकदा अवधूत गुप्तेच आहेत. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, परी तेलंग, संतोष जुवेकर, मेघना एरंडे, धनश्री कोरेगावकर अशी तरुण आणि अभिनयसंपन्न स्टारकास्ट आहे. अर्थात ह्यातील परी तेलंग व मेघना एरंडे ह्यांच्या भूमिका प्रमुख भूमिका म्हणून का गणल्या गेल्या आहेत हा मोठा प्रश्नच आहे.<br />
<iframe width="560" height="315" src="http://www.youtube.com/embed/H75rTaiaU9s" frameborder="0" allowfullscreen></iframe><br />
<br />
गणेशोत्सव, त्याचे पावित्र्य, गणेशाच्या उत्सवात शिरकाव करून बसलेल्या वाईट प्रथा, गणेशोत्सवाच्या आधारे चालवले जाणारे राजकारण आणि एकूण राजकारण्यांची प्रवृत्ती अशा सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न म्हणजे 'मोरया' हा चित्रपट. कथेच्या जोडीला चाळीचे बिल्डिंगमध्ये रुपांतर, दोन चाळींमधला आपलाच गणपती कसा मोठा ह्यासाठी होणारा संघर्ष, तरुणाईची सध्याची तगमग असल्या पटकथांची देखील जोड आहे. मुळात कथाच दमदार नसल्याने ह्या पटकथा देखील तिला टेकू देऊ शकलेल्या नाहीत. ना भरभक्कम कथा, ना पटकथा, त्यातच संवादात देखेल फारसा दम नसल्याने अनेक गुणी कलाकार असूनही हा मोरया काही सुखकर्ता ठरत नाही.<br />
<br />
समोरासमोर परंतु एकाच जागेत असलेल्या गणेश चाळ व खटाव चाळ ह्या दोन चाळी. दोन्ही चाळींचे गणपती वेगळे, इतर सणवारही वेगवेगळे साजरे होणारे. लवकरच तिथे विकसन होणार असल्याने, बिल्डरने एकाच गणपतीसाठी मंदिराची सोय करण्याचे कबूल केले आहे. आता एकाच गणपतीची स्थापना ह्यापुढे दरवर्षी करायचे चाळकरी ठरवतात. दोन्ही चाळीतल्या तरुणांना मात्र हे मान्य नाही. एका चाळीच्या तरुणांचा नेता आहे चिन्मय मांडलेकर तर दुसर्या चाळीचा अर्थातच संतोष जुवेकर. ह्या दोन्ही चाळीतला शहाणा मनुष्य म्हणजे दिलीप प्रभावळकर. अर्थात दोन्ही गट त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. शेवटी ह्या वर्षी ज्या गटाचा गणपती जास्ती गर्दी खेचेल, जास्ती प्रसिद्धी मिळवेल तो टिकेल असा ठराव होतो आणि दोन्ही गट जीव तोडून मेहनतीला लागतात.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/h_morya_pg4_3.jpg" alt="" /><br />
<br />
<br />
आता आपलाच गणपती टिकला पाहिजे ह्या ईर्ष्येने दोन्ही गट पेटून उठल्याने मग मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोला करण्याची चढाओढ सुरू होते. वेळेप्रसंगी मग त्यासाठी एका गटाकडून राजकारण्यांचा आसरा घेतला जातो तर एका गटाकडून चक्क मुसलमान मालक असलेल्या यात्रा कंपनीचे पोस्टर मांडवाबाहेर झळकवले जाते. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर तर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नाही नाही त्या मार्गांचे अवलंब करायला दोन्ही गट सुरुवात करतात. मग आपला गणपती नवसाला पावतो अशी संतोष जुवेकरच्या गटाने चॅनेलवरती खोटी जाहीरात करताच, चिन्मय मांडलेकरच्या गटाकडून त्यांनी लावलेले मुसलमानी पोस्टर आणि त्यांचा गणेशोत्सव कसा सर्वधर्म समभाव निर्माण करणारा आहे ह्याची जाहिरातबाजी केली जाते. त्याच वेळी चिन्मय मांडलेकर हा खरा मुसलमान, मात्र सच्चा गणेशभक्त असल्याचे दाखवून अवधूत गुप्ते आपल्याला छान चक्कर आणतो. डोक्याला हात मारून पुढे काय घडते ते बघण्याशिवाय आपल्या हातात काही नसते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/moryamoviemarathi52335_595518_324502_n.jpg" alt="" /><br />
<br />
मग उरलेल्या काळात बाप्पासाठी कार्यकर्ते कशी जीवतोड मेहनत घेतात, संतोष जुवेकर सारखे तडफदार [?] तरुण रजा मिळाली नाही तर नोकरी वरती लाथ कशी मारतात, दहा दिवस कार्यकर्ते बाप्पासाठी दारूचा त्याग कसा करतात इ. इ. आपण नेहमी वाचत असलेले आणि बघत असलेले प्रसंगच साकार होतात. त्यामुळे मधल्या वेळात थोडीशी डुलकी घेतली तरी चालेल.<br />
<br />
हान तरा आता सरळ मार्गाने पुरेसे यश काही मिळत नाही म्हणल्यावरती दोन्ही गटाकडून गैरमार्गाचा वापर केला जातो. अर्थात त्याला पाठिंबा असतो तो राजकारण्यांचाच. एका गटाकडून दुसर्या गटाच्या मांडवामागे दारूच्या बाटल्यांचा ढीग ठेवला जातो आणि त्याचे चित्रीकरण करून चॅनेलवरती दाखवले जाते. अर्थात मग दुसर्या गटाकडून विरुद्ध गटाच्या मांडवाबाहेर लावलेल्या हिरव्या पोस्टरचे नुकसान केले जाते. ही घटना घडते आणि ताबडतोब शहरात दंगली उसळतात. मग दोन्ही धर्माचे राजकारणी त्याचा येणार्या निवडणूकीत कसा वापर करता येईल त्याच्या हिकमती लढवायला लागतात. शेवटी काय होते ? खरा गुन्हेगार सापडतो ? दोन्ही गटांना आपली चूक लक्षात येते ? आणि शेवटी गणपती कुठल्या गटाचा राहतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर 'मोरया' दर्शाना शिवाय पर्याय नाही. अर्थात आजकालच्या तुम्हा जाणकार मंडळींना असे प्रश्न पडतील असे वाटत नाही. ह्याची उत्तरे चित्रपट न बघताच तुम्हाला कळले देखील असतील.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Spruha-Joshi.jpg" alt="" /><br />
<br />
बरं आता चित्रपटाचे येवढे पोस्टमार्टेम केल्यावर, चित्रपटात काही चांगले आढळलेच नाही का ? नक्की आढळले. स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर ह्या तरुणांचा अभिनय, त्यांचे लुक्स, त्यांची संवादफेक, कॅमेर्याचे ज्ञान सगळे सगळे आवडले. चित्रपटाचे चित्रीकरण, वापरलेले लोकेशन्स देखील झकास. शीर्षक गीत, दहीहंडी नृत्य देखील झकास जमले आहे. मात्र दिलीप प्रभावळकर ह्यांना अशी आगा पिच्छा नसलेली आणि जणूकाही समोपदेशकाच्या थाटाची भूमिका देऊन वाया का घालवले आहे ते कळत नाही. परी तेलंग, मेघना एरंडे ह्या देखील चॅनेल्सच्या निवेदकांच्या भूमिकेत छाप पाडू शकलेल्या नाहीत. अर्थात भूमिका मध्येच काही दम नसल्याने त्यांना दोष का द्यावा ? मुळात ह्या दोन चाळीतल्या गणेशोत्सवा शिवाय जगात काही घडतच नाहीये अशा ठाम मानसिकतेने ही चॅनेल्स चाळीतच ठाण मांडून का बसलेली असतात ते बाप्पालाच ठाऊक. <br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Santosh-Juvekar.jpg" alt="" /><br />
<br />
राकारण्याच्या भूमिकेत इथे पुन्हा एकदा ३/४ प्रसंगात पुष्कर श्रोत्री दर्शन देतो. त्याची भूमिकाच उद्धव ठाकरे टाईप लिहिली आहे, का तो अजून झेंडाच्या मानसिकतेतून बाहेरच पडू शकलेला नाही ते कळत नाही. चित्रपटात मध्येच एक मुसलमान नेता कम बिझनेसमनचे पात्र घुसडलेले आहे. कुठल्याच पात्राला एक ठाम अशी विचारधारा किंवा ज्याला ग्राउंड म्हणावे ते पुरवले गेलेले नाही. कुठलेच पात्र ठसठशीत झालेले नाही. स्पृहा जोशी फक्त गायला मिळते, गळ्याचा कस वगैरे लागतो म्हणून डान्सबार मध्ये गात असते हे तर पटता पटत नाही. चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर हे पोटापाण्यासाठी, रोज रात्री दारू पिण्यासाठी पैसे कुठून आणतात हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या बुद्धिसामर्थ्यावर सोडवावा.<br />
एकुणात काय तर एकाच चित्रपटात सगळेच काही दाखवण्याचा अवधूत गुप्तेंचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/morya-wallpaper-002.jpg" width="448" height="298" alt="" />PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-76561954573403371922011-11-05T17:34:00.000+05:302012-09-18T17:35:58.012+05:30Acacia (कोरिअन चित्रपट)<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/acacia-2.jpg" alt="" /><br />
<br />
हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष.<br />
<br />
<iframe width="560" height="315" src="http://www.youtube.com/embed/6CQ3330InHY" frameborder="0" allowfullscreen></iframe><br />
<br />
डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य. आपल्या वडिलांच्या मदतीने शेवटी एकदा डॉक्टर किम आपल्या पत्नीला मूल दत्तक घेण्यासाठी राजी करतो आणि ह्या चित्रपटाला सुरुवात होते. कलेची आवड असणारी मी-सूक जिन्साँग ह्या सतत चित्रे काढण्याची आवड असणार्या अनाथ मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेते. जिन्साँगच्या घरी येण्याने ह्या कुटुंबाच्या एका नव्याच आयुष्याला सुरुवात होते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/acacia-2-1-2.jpg" alt="" /><br />
<br />
अतिशय अबोल आणि सतत झाडांचीच चित्रे काढण्यात मग्न असणारा जिन्सॉंग आपल्या सभोवताली कायमच एक गूढ वलय बाळगून असतो. काही दिवसातच जिन्साँग समोरच्या घरात राहणार्या मिन्जी ह्या लहान मुलीकडे आणि त्याच्या घराच्या बागेत असलेल्या एका वठलेल्या अॅकेशिआ वृक्षाकडे आकर्षित होतो. ते झाड म्हणजे आपली मेलेली आई असल्याचे जिन्सॉंगचे ठाम मत असते. मिन्जीच्या संगतीत काहीसा अबोल असणारा जिन्साँग थोडाफार बोलका तर बनतोच पण काहीसा दुराग्रही आणि हट्टी देखील बनायला लागतो. त्यातच मी-सूक ला दिवस जातात आणि सगळे चित्रच बदलते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/rev_acacia.jpg" alt="" /><br />
<br />
आपली आई आता नव्या बाळाची आई होणार ह्या कल्पनेने आधीच हट्टी असलेला जिन्साँग फारच दुराग्रही बनून जातो. त्यातच मुलीच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून हजर झालेली मी-सूक ची आई तिला जिन्साँगला परत अनाथाश्रमात पाठवायचा सल्ला देते. मी-सूक मात्र त्याला तयार होत नाही. बाळाच्या जन्मानंतर मात्र जिन्साँगचे वागणे एकदमच खुनशी होऊन जाते आणि सगळे कुटुंबच दचकते. जिन्साँगला सतत समजून घेण्याचा प्रयत्न करणारी मी-सूक देखील आता त्याच्याशी प्रेमाने वागेनाशी होते. अशा काजळलेल्या वातावरणात एका पावसाळी रात्री जिन्साँग अचानक नाहीसा होतो आणि संपूर्ण कथेला एक वेगळेच वळण लागते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/fullsizephoto47338-2.jpg" width="450" height="300" alt="" /><br />
<br />
जिन्साँगच्या जाण्याने एकटी पटलेली छोटी मिन्जी आता सतत आपला वेळ त्या वठलेल्या अकॅशिआ वृक्षाच्या सानिध्यातच घालवायला लागते. त्या झाडातून जिन्साँग तिच्याशी बोलतो असे ती सांगायला लागते आणि सगळे दचकतात. त्यातच अचानक जिन्साँग नाहीसा झाल्याच्या दुसर्या दिवसापासून त्या वठलेल्या वृक्षाला पालवी फुटायला सुरुवात होते. काही दिवसातच तो वृक्ष चांगलाच बहरतो आणि एकेदिवशी त्या वृक्षाकडून त्याच्या परिघात येणार्या जिन्साँगच्या दत्तक कुटुंबावर फांद्या आणि मुंग्यांच्या साहाय्याने जीवघेणे हल्ले सुरू होतात. ह्या अचानक घडू लागलेल्या अनैसर्गिक घटनांनी संपूर्ण कुटुंबच थरारून उठते. आणि मग एक दिवशी अचानक सगळ्या रहस्यावरचा पडदा उघडतो आणि आपण प्रेक्षक सुन्न होऊन जातो.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/acacia-2b-2.jpg" alt="" /><br />
<br />
जिन्साँगच्या बाबतीत नेमके काय घडलेले असते ? तो परत येतो ? अकॅशिआ आणि जिन्साँगचे नक्की नाते काय असते ? मिन्जी जे सांगत असते ते खरे असते का ? ह्या अशा रहस्यमयी प्रश्नांनी सोडवणूक आणि तो सुटतानाचा थरार पडद्यावर बघण्यातच खरी मजा आहे. चित्रपट कोरिअन असला तरी इंग्रजी सबटायटल्स सकट तो उपलब्ध असल्याने निराशा होण्याचे कारण नाही. कुठेही रक्तपात, माणसे कापाकापीची दृश्ये, ओंगळावाणी भुते, विचित्र आणि कर्कश संगीत ह्याची जोड न घेता देखील तुम्हाला रहस्यमयी वातावरणात कसे खिळवून ठेवले जाते ह्याचा अनुभव घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा. अनेक दृश्यात संवाद कमी आणि कॅमेर्याचा वापर जास्ती करून दिग्दर्शक आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतो. दिग्दर्शन, कथा आणि अभिनय सर्वच अंगाने सुरेख असलेला हा चित्रपट पाहायलाच हवा.PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-45497945925930736672011-11-04T15:22:00.000+05:302012-09-19T19:24:50.875+05:30सामना मधील माझा लेख :- मराठी ब्लॉग विश्व<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEigk2oee0ZD-RgRX0M3ewRHK704YodPASZO_vI9j5d12yMiVN5j8R560dvgKmkWL39MKlzZmkSIY2lQXNWkYKamRZSwEqk0M5y9PkXufdcsR9GB-JCwle0hZZOponwYIZpj1N5CoBkPcQ/s1600/D1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEigk2oee0ZD-RgRX0M3ewRHK704YodPASZO_vI9j5d12yMiVN5j8R560dvgKmkWL39MKlzZmkSIY2lQXNWkYKamRZSwEqk0M5y9PkXufdcsR9GB-JCwle0hZZOponwYIZpj1N5CoBkPcQ/s400/D1.jpg" width="265" /></a></div>
<br/><br/>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-lrDClx7pJhFkJD7pIdZ82beYbJNhZ2anPNHBLehdDQp4tOEgOUHMVKuQWf0GyMHZ6XgFpQ-IQtO4eRPMf9gIO5QOPsOyc_uDbocNRyzEAa7VAQ2gl2yIp4FzpzPH6f9Xg2Gz5qzFOA/s1600/D2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-lrDClx7pJhFkJD7pIdZ82beYbJNhZ2anPNHBLehdDQp4tOEgOUHMVKuQWf0GyMHZ6XgFpQ-IQtO4eRPMf9gIO5QOPsOyc_uDbocNRyzEAa7VAQ2gl2yIp4FzpzPH6f9Xg2Gz5qzFOA/s400/D2.jpg" width="269" /></a></div>
<br/><br/>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWgvudfZ0Lraojl4rFA6Vf2mS1nznziyeVb7WjyUoBdR5RRrOxmCCGtPL6UTR0rX6zGidICjLWU-BZGYiYUl3aqPZjz0KWPh9XBlVj-7Fem20An-0j1JjgMYdXf-uqNPDK50OLAjaSHA/s1600/D3.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWgvudfZ0Lraojl4rFA6Vf2mS1nznziyeVb7WjyUoBdR5RRrOxmCCGtPL6UTR0rX6zGidICjLWU-BZGYiYUl3aqPZjz0KWPh9XBlVj-7Fem20An-0j1JjgMYdXf-uqNPDK50OLAjaSHA/s400/D3.jpg" width="262" /></a></div>
</div>
PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-22092017884821729252011-09-05T15:42:00.000+05:302012-09-18T18:01:40.057+05:30Fast Five<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/FastFive.jpg" width="600" height="350" alt="" /><br />
<br />
आज सकाळी नेहमीप्रमाणेच मोकळा असल्याने शनिवारी अर्धवट राहिलेला Fast Five हा चित्रपट पाहून संपवला. <a href="http://en.wikipedia.org/wiki/The_Fast_and_the_Furious_%28film_series%29">The Fast and the Furious</a> सिरीज मधला हा पाचवा चित्रपट. पहिल्या दोन भागांनंतर बाहेर गेलेले विन डिझेल आणि पॉल वॉकर ह्या भागाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, आणि त्यांना साथ मिळाली आहे WWF स्टार 'द रॉक' ची. येवढी तगडी स्टारकास्ट आणि जोडीला The Fast and the Furious ची भन्नाट कार ड्रायव्हिंग, जबरदस्त संवाद आणि तोंडावर कमी आणि बंदुकांवर जास्त विश्वास ठेवणारे खलनायक अशी सर्व वैशिष्ट्ये घेऊन हा चित्रपट हजर झाला आहे.<br />
<br />
विन डीजलला (डॉमनिक) पूर्वाश्रमीच्या गुन्ह्यांसाठी २५ वर्षाची शिक्षा दिली जाते, अर्थात शिक्षेमध्ये पॅरोलची संभावना देखील नसतेच. कायद्याचा रक्षक डॉमचा मित्र आणि डॉमच्या बहिणीचा मियाचा प्रियकर पॉल वॉकर ( ब्रायन ओ कॉनर) आता आपली बाजू बदलून डॉमला वाचवायचे ठरवतो आणि इथे चित्रपटाला सुरुवात होते. अर्थात नेहमीप्रमाणेच अचाट कार ड्रायव्हिंग स्किल्स आणि अचूक टायमिंगच्या जोरावर ब्रायन आणि मिया मिळून डॉमला आणि इतर कैद्यांना घेऊन जाणारी बस उलटवण्यात यशस्वी होतात आणि डॉम पळून जाण्यात.<br />
<br />
<iframe width="560" height="345" src="http://www.youtube.com/embed/FDOBLS8m2yE" frameborder="0" allowfullscreen></iframe><br />
<br />
आता तिघांचे लक्ष असते ते रिओ गाठणे. डॉमनिकची वाट बघत ब्रायन व मिया तात्पुरते त्यांच्या जुन्या मित्राच्या विन्सी च्या आश्रयाला येतात. इथेच मियाला आपण आई होणार असल्याचे कळते. डॉमच्या आगमनाच्या मधल्या काळात विन्सीकडे नेहमीप्रमाणे एक जॉब चालून येतो आणि ब्रायन आणि मिया त्याला जॉईन होतात. जॉब असतो नेहमीप्रमाणेच चोरीचा. ह्यावेळी धावत्या ट्रेनमधून काही कार्स पळवण्याचा जॉब आलेला असतो. जॉब पूर्ण करत असतानाच ज्या गाड्यांच्या चोरीचा हा जॉब आहे त्या गाड्या 'सिझ' केलेल्या आहेत आणि गाड्यांबरोबरच फेडरल एजंटस देखील ट्रेनमध्ये असल्याचे मिया आणि ब्रायनच्या लक्षात येते. त्याचवेळी इतर ग्रुप बरोबर डॉम देखील जॉब पूर्ण करायला हजेरी लावतो. ज्या ग्रुपसाठी ते हा जॉब पूर्ण करात असतात, त्या ग्रुपला इतर कार्स सोडून फक्त आणि फक्त एकाच कार मध्ये (Ford GT4() इंटरेस्ट असल्याचे आता ह्या तिघांच्या लक्षात येते. त्यामुळे नेमकी तिच कार घेऊन डॉम मियाला पळवून लावतो. इकडे चिडलेल्या ग्रुपमध्ये आणि डॉम, ब्रायन मध्ये झालेल्या मारामारीत ग्रुपमधील झिझी नावाच्या माणसाच्या हातून काही फेडरल एजंटस मारले जातात. ब्रायन आणि डॉम पळून जाण्याच्या प्रयत्नात ह्या सगळ्या जॉब मागे असलेल्या एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बिझनेसमनच्या रे च्या हातात सापडतात. अर्थात त्याच्या गुंडांच्या तावडीतून देखील ते पळून जाण्यात यशस्वी होतात.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/fast-five-20101214020415528.jpg" width="600" height="350" alt="" /><br />
<br />
आता शोध सुरू होतो की ह्या कारमध्ये नक्की असे काय आहे की ज्यासाठी हा पूर्णं प्लॅन रचला गेला होता. इकडे परत येऊन मिळालेला विन्सी त्या कारमधून एक कॉम्प्युटर चीप चोरताना त्यांच्या ताब्यात सापडतो. विन्सीला हाकलल्यावर आता त्या चीप मध्ये नक्की काय आहे ह्याची माहिती घ्यायला सुरुवात होते. त्या चीप मध्ये रे च्या संपूर्ण काळ्या साम्राज्याची माहिती आणि त्याने ठिकठिकाणी लपवलेल्या एकूण १०० मिलियन डॉलर्सची माहिती देखील असते.<br />
<br />
इकडे ट्रेनमध्ये झालेल्या खुनांचा आळ डॉम आणि ब्रायन वरती येतो आणि ते मोस्ट वाँटेडच्या यादीत अग्रभागी विराजमान होतात. आपल्या एजंट्सच्या हत्येने पिसाळून उठलेला ल्यूक हॉब्ज (द रॉक) आता ह्या दुक्कलीला पकडण्यासाठी ब्राझील मध्ये दाखल होतो. डॉमच्या ठिकाणाचा पत्ता लागल्याने रे चे गुंड त्यांच्यावरती हल्ला करतात. पोलिस आणि रे अशा कचाट्यात सापडलेला डॉम आपण वेगळे होऊ आणि लवकरात लवकर रिओ सोडू असे सुचवतो. मात्र तेव्हाच मिया आपण प्रेग्नंट असल्याचे सांगते आणि परिस्थिती बदलते. शेवटचा जॉब म्हणून रे चे १०० मिलियन्स चोरायचे आणि ह्या सगळ्याला कायमचा राम राम ठोकून नवे आयुष्य सुरू करायची कल्पना डॉम सुचवतो. आणि मग सुरू होतो शोध ह्या शेवटच्या जॉबसाठी मदतनिसांचा. विन्सी देखील पुन्हा येऊन मिळतो.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/fast_five121-e1304298213972-700x315.jpg" width="500" height="300" alt="" /><br />
<br />
मदतनीस मिळतात, जॉबची आखणी देखील होते मात्र पहिली टीम जॉबसाठी बाहेर पडते आणि इकडे डॉम आणि साथीदारांना ल्यूक अटक करतो. आता अटक केलेल्या सर्वांची अमेरिकेला रवानगी करण्यासाठी ल्यूक त्यांना गाडीतून घेऊन निघतो आणि त्या गाडीवरच रे च्या माणसांकडून हल्ला होतो. जवळ जवळ सर्वच साथीदार मारले गेल्यावरती डॉम व मंडळी कशीतरी ल्यूकची सुटका करतात आणि त्याला आपल्या ठिकाण्यावर घेऊन येतात. आता बदललेला ल्यूक देखील ह्या जॉब मध्ये सामील होतो आणि एकच भन्नाट वेग कथेला मिळतो.<br />
<br />
शेवटी चोरी होते का? चोरीच्या पैशाचे नक्की काय आणि कसे होते, रॉक नक्की जॉब मध्ये सामील होतो ? का त्याचा सतःचा काही वेगळा अजेंडा असतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटाकडूनच मिळवण्यात मजा आहे.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/johnson-and-diesel.jpg" width="370" height="479" alt="" /><br />
<br />
विन डिजेलची थंड नजर, द रॉकचे सुसाट संवाद, पॉल वॉकरची गजब बुद्धिमत्ता आणि धुमशान मारामार्या, जबरदस्त कार स्टंटस, चोरीसाठी वापरलेल्या युक्त्या एकूणच धमाल ही धमाल. ह्या सर्व फटाक्यांची आतषबाजी एकत्र पाहण्याची मजा खरंच काही और आहे.PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-46440131839185111522011-08-16T13:56:00.000+05:302012-09-18T18:02:15.542+05:30ए टेल ऑफ टू सिस्टर्स<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/ATaleofTwoSisters.jpg" width="385" height="500" alt="" /><br />
<br />
<a href="http://en.wikipedia.org/wiki/The_Grudge">द ग्रज</a> पाहिल्यानंतर जापनीज आणि कोरिअन हॉरर चित्रपटांविषयी कायमच उत्सुकता वाटू लागली होती. भयपट बघायचे तर जापनीज किंवा कोरिअनच असे जणू ठरवून टाकले आहे. ह्याच चित्रपटांच्या रांगेत परवा अचानक 'ए टेल ऑफ टू सिस्टर्स' हा कोरिअन चित्रपट हाताला लागला आणि कधी एकदा पाहून संपवतो असे झाले. हॉरर चित्रपटांची आवड असणार्या लोकांसाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणी आहेच पण सायकोलॉजीकल थ्रिलरची विशेष आवड असणार्या रसिकांना हा चित्रपट एक वेगळाच अनुभव देऊन जातो. चित्रपट पाहून काही काळ आपण खरेच सुन्न होऊन जातो. ह्यातले काही काही शॉट किंवा अचानक कथेला कलाटणी देणारे क्षण आपण बर्याच हिंदी, इंग्रजी चित्रपटात नक्की पाहिले असतील. मात्र हे सगळे शॉट आणि ही वळणे एकाच चित्रपटात पाहण्याची मजाच वेगळी.<br />
<br />
सू-मी ह्या मुलीला एका मानसोपचार तज्ज्ञासमोर आणले जाते इथून पुढे तिच्याकडून तिची स्वतःची, तिच्या कुटुंबाची आणि एकूणच चित्रपटाची एक रहस्यरंजक आणि खुर्चीला खिळवून ठेवणारी कहाणी उलगडत जाते.<br />
<br />
सू-मी आपल्या सू-येओन* ह्या लहान बहिणीसमवेत आपल्या घरी परत आलेली असते. ह्यावेळी तिच्या स्वागताला तिचे वडील आणि नवीन सावत्र आई दोघेही हजर असतात. सावत्र आई विषयी दोन्ही मुलींच्या मनात अढी असतेच त्यात आता आपली सावत्र आई काहीतरी विचित्र आणि गूढ वागते आहे ह्या अनुभवाने तिच्याविषयी अधिकच संताप दाटू लागतो. आल्या दिवशी पहिल्याच रात्री सू-येओनला आपल्या खोलीत कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत आहे असा भास होतो आणि ती घाबरून आपल्या बहिणीच्या खोलीत जाऊन झोपते. आपल्या लहान बहिणीला असे घाबरवण्यामागे आपल्या सावत्र आईचाच हात आहे ह्याबद्दल सू-मी ला मात्र शंका नसते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/56_43.jpg" width="450" height="300" alt="" /><br />
<br />
दोन्ही मुली घरी परत येतात आणि अचानक बर्याच चित्रविचित्र घटना घडायला लागतात. त्याच रात्री सू-मी ला देखील एका भयानक स्वप्नाला सामोरे जावे लागते ज्यात तीच्या खर्या आईसारखी दिसणारी एक विचित्र भितीदायक स्त्री तिच्या बेडवर रांगत रांगत चढते. घाबरलेली सू-मी दचकून जागी होते आणि ह्या घरात नक्की काहीतरी विचित्र चालले आहे ह्याची तिला खात्री पटते. सावत्र आईच्या पाहुण्या येणार्या भावाबरोबर आणि त्याच्या बायकोबरोबर जेवण करायला दोघीही नकार देतात आणि सावत्र आईच्या रागात अजूनच भर पडते. जेवता जेवता सावत्र आईच्या वहिनीला अचानक फिट येते. फिट येऊन ती वळवळत असतानाच अचानक पडल्या पडल्या तिचे लक्ष सिंक च्या खाली जाते आणि भितीने थरारुन उठते. परत जाताना आपल्या नवर्याला ती आपण सिंक खाली एक जळालेली मुलगी पाहिल्याचे सांगते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/a-tale-of-two-sisters-6.jpg" width="450" height="300" alt="" /><br />
<br />
इकडे सावत्र आईला आपल्या आवडत्या पक्षांपैकी एक मेलेला आढळतो तर दुसरा मेलेला पक्षी सू-येओन च्या बिछान्यात सापडतो आणि तिच्या रागाचा स्फोट होतो. ती रागारागाने तिला अंधार्या कपाटात बंद करून ठेवते. इकडे अचानक काही आवाजाने जाग आलेली सू-मी आपल्या बहिणीच्या खोलीत येते. तिथे बहिणीला नसलेले पाहून ती काळजीत पडते, पण शेवटी ते आपल्या बहिणीला शोधून काढतेच. दोघी एकमेकींना मिठ्या मारून अश्रूंना वाट करून देतात. काही वेळाने दूसर्या पक्षाला व्यवस्थित पुरून त्यांचे वडील परत येतात तेव्हा सू-मी आपला सगळा संताप त्यांच्या समोर व्यक्त करते. शेवटी चिडलेले वडील सू-मी वर खेकसतात आणि "हे सगळे प्रकार तू कधी बंद करणार आहेस ? तुला बरी व्हायचे नाही आहे का?" असे विचारतात. सू-मी त्यावर आपली सावत्र आई लहान बहिणीवर सतत कसे अत्याचार करत असते ह्याचा पाढाच वाचते. आता मात्र संतापलेले वडील सू-मी वार खेकसतात आणि म्हणतात "ह्या सगळ्यातून बाहेर ये, प्लीज. सू-येओन मेलीये. ती कधीच मेली आहे, आत तरी ह्या सत्याचा स्वीकारा कर." हा शॉट संपतो आणि कथा एक वेगळेच वळण घेऊन आपल्याला गुंगवून टाकते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/miniphoto452.jpg" alt="" /><br />
<br />
दुसर्या दिवशी आपली बहीण पुन्हा नाहिशी झाल्याचे सू-मी च्या लक्षात येते आणि आपण राहून राहून आपल्या आईला एक रक्ताळलेले पोते ओढून नेताना पाहिल्याचे तिला आठवत राहते. आपल्या बहिणीची सुटका करण्यासाठी ती धावते मात्र पुन्हा सावत्र आई मध्ये पडते आणि त्यांच्यात जोरदार झटापट होते. थोड्या वेळाने तिचे वडील परत येतात मात्र तोवर सगळे अस्ताव्यस्त घर अगदी व्यवस्थित दिसत असते. मग नक्की त्या घरात घडलेले तरी काय असते आणि घडत तरी काय असते ?<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/taleoftwosisters09.jpg" alt="" /><br />
<br />
कथा ह्यापुढे अनेक वळणे आणि फ्लॅशबॅक घेत जाते आणि आपल्याला थक्क करून सोडते. दोन्ही बहिणींचा सावत्र आई ही त्यांच्या वडिलांची एकेकाळची सहकारी असते आणि त्यांच्या आजारी आईची देखभाल करण्यासाठी घरी राहतं असते हे सत्य फ्लॅशबॅक मधून समोर येते. आणि त्याच वेळी त्यांची खरी आई आणि लहान बहिणीबद्दल काय घडले हे देखील सामोरे येते.<br />
<br />
सू-मी खरंच वेडी असते, आणि ह्या सगळ्या कल्पना रचत असते ? का खरंच त्यांच्या सावत्र आईने लहान बहिणीची हत्या केलेली असते ? सिंक खाली जळालेली आणि रांगत हिंडणारी मुलगी नक्की कोण असते ? सू-मी ची खरी आई भूत होऊन त्यांच्या घरात वावरत असते का ? का ह्या सगळ्या भूमिका एकटी सू-मी स्वतःच जगत असते ? ह्या आणि अशा अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे कशी मिळत जातात ते चित्रपटातच बघण्यात खरी मजा आहे.<br />
<br />
<iframe width="425" height="349" src="http://www.youtube.com/embed/anF5XiN8QY8" frameborder="0" allowfullscreen></iframe><br />
<br />
चित्रपट सगळ्याच अंगांनी सुंदर बनवलेला आहे. विशेष उल्लेख करावा लागेल तो सतत धक्के देणारी कथा आणि कॅमेर्याच्या अतिशय सुरेख केलेला वापर. चित्रपटाबरोबर उपलब्ध असणारी सबटायटल्स देखील उत्तम. अर्थात सबटायटल्स शिवाय हा चित्रपट कळण्याची सुतराम शक्यता नाही हे मात्र खरे. भयानक चेहरे, कर्णकर्कश्य संगीत आणि उगाच अंधारी दृश्ये ह्या शिवाय देखील एक अतिशय थरारक चित्रपट आपल्या मनात भिती कशी उत्पन्न करू शकतो ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा.<br />
<br />
PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-46464126058555592332011-08-10T13:53:00.000+05:302012-09-19T19:11:52.164+05:30गुमराहरात्रीचे १२ वाजायला आले असतील, बाहेर पावसाची रिपरिप चालू होतीच. आज बाहेर पाऊस असून देखील मला खिन्न खिन्न वाटत होते. खरेतर पावसाळा म्हणजे माझा आवडता ऋतू. आज नेहमीप्रमाणे कॅफे बंद झाल्यावर कावेरी मातेचे यथासांग दर्शन देखील झाले होते, त्यामुळे हा पाऊस आणि अंगावर येणारी मस्त हवा आवडायला काहीच हरकत नव्हती. पण का कोणास ठावुक आज मन लागत नव्हते येवढे खरे. अचानक रात्री १२ च्या सुमारास फोन वाजला. येवढ्या रात्री मला सहसा कोणाचा फोन येणे अशक्यच. त्यात जागा असल्याने दुसर्या रिंगलाच फोन उचलला. पलीकडून काही क्षण फक्त श्वासोच्छ्वासांचे आवाज ऐकू येत होते. <br />
<br />
"पप्पी?" <br />
<br />
मला पप्पी म्हणणारे आणि संपर्कात असणारे आता फार कमी उरले आहेत, अगदी बोटावर मोजण्याइतके. पप्पी अर्थात पॅपिलॉन हे नाव, ते नाव जिथे धुडगूस घालायचे ते विश्व आणि ते सोबती सोडून आत जमांना उलटला आहे. पॅपिलॉनचा परा होऊन आणि सरळ मार्गावर चालायला लागून बराच काळ लोटला आहे. <br />
<br />
"बोलतोय..."<br />
<br />
"पप्पी यार अपना गुमराह अल्लाह को प्यारा हो गया" पलीकडून अजून काही शब्द उच्चारले देखील असतील नसतील मी मात्र योग्य त्या शब्दांचा अर्थ लागताच सुन्न झालो होतो. टोटल ब्लॅंक ! गुमराह गेला ? कसे शक्य आहे ? "साला वो तुम्हारे पंडित लोगोंका चित्रगुप्त हमारे कौम का भी हिसाब लिखता है क्या ? उसको बोल ना के साले कंप्युटर यूज करना शुरु कर दे, तो मै उसके कंम्प्युटर मे भी घुसके अपना अकाउंट क्लिअर करू" म्हणणारा गुमराह गेला ?<br />
<br />
"सुन बे पंडित, मै मरुंगा तो इधर किधर कंम्प्युटर के पास बिजली का झटका लग के, या फीर किसी सरकार की गोली से" म्हणणारा गुमराह गेला.. "अबे तेरो को पढाई करके चष्मा लगा है या औरतो को घुरके?" विचारणारा गुमराह गेला.. अक्षरश: बातमी ऐकून बाहेरच्या पावसाला लाजवेल असा आठवणींचा पाऊस माझ्या अंगावर कोसळायला लागला.<br />
<br />
गुमराहची आणि माझी पहिली भेट झाली ती इंडोपाक चॅट चॅनेल मध्ये. मी नवीनं नवीनं कॅफे सुरू केला होता आणि दिवसभर टायपिंग, डेटा एंट्रीची किरकोळ कामे संपली की आम्ही एकलव्याच्या निष्ठेने वेगवेगळे फोरम पालथे घालत हॅकिंगचा अभ्यास करत होतो. थोड्याफार दिवसात माझ्या सारख्याच किंवा थोड्यास सीनिअर अशा अजून दोन चार हॅकर मित्रांशी ओळख झाली आणि मी खर्या अर्थाने ह्या हॅ़किंग विश्वाच्या एका कोपर्यात आत पाऊल टाकले. 'अमन की आशा' वगैरेचे फॅड निघाले देखील नव्हते तेव्हा काही भारतीय व पाकिस्तानी चाटर्सनी एकत्र येऊन इंडोपाक चाट चॅनेलचा घाट घातला. इतरांबरोबर मग मी देखील ह्या चॅनेलमध्ये दिवसभर पडीक राहू लागलो. चॅनेल सुरू झाला, चांगला प्रतिसाद देखील मिळायला लागला आणि अचानक एके शुक्रवारी चॅनेल हॅक झाला. कोणालाच चॅनेल मध्ये प्रवेश करता येईना, चॅनेल सांभाळायला ठेवलेले बॉट सुद्धा लाथ मारून चॅनेल बाहेर काढले गेले होते. चॅनेलचे ओनर आणि ऑपरेटर अथक प्रयत्न करत होते पण काही उपयोग होत नव्हता. आश्चर्य म्हणजे शनिवारी पुन्हा सर्व सुरळीत चालू झाले. पण हा आनंद फक्त पुढील गुरुवार पर्यंतच टिकला. शुक्रवारी पुन्हा चॅनेल हॅक....शनिवारी पुन्हा सर्व सुरळीत.<br />
<br />
शुक्रवारच्या निवडीवरून आपोआपच सर्व नजरा पाकिस्तानी चाटर्सकडे संशयाने वळल्या, मात्र आपलेही काही महाभाग शुक्रवारच्या आडून हे करत असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था झाली होती. आता चॅनेलचे सिक्युरिटी गार्डस जोमाने कामाला लागले होते, बॉटसची नव्याने बांधणी सुरू झाली होती, नव्या दमाच्या हॅकर्सना भरती करण्यात येत होते आणि त्यात आमचा नंबर पण लागला. काम असे विशेष काही नव्हते, बॉटच्या निकनेममधून लॉगईन करायचे आणि चॅनेलवरती नजर ठेवायची. पण आपल्या कामात काम ठेवणार्यातला मी थोडाच होतो ? बॉट मागे बसल्याने लोकांचे आयपी, त्यांचे जुने बॅन सगळे मला अगदी तपशीलवार दिसायचे. काही संशयितांच्या संगणकात परस्पर शिरून काही माहिती मिळते का बघण्याचा प्रयत्न मी सुरू केला, पण पहिल्याच प्रयत्नात तोंडावर पडलो. माझीच OS क्रॅश झाली आणि सर्वरचीच OS क्रॅश झाल्याने कॅफे दिवसभर बंद ठेवावा लागला तो वेगळाच. ह्यातून पहिला धडा मिळाला म्हणजे कुठलेही किडे करण्यासाठी सर्व्हरचा उपयोग करायचा नाही.<br />
<br />
आता प्रतीक्षा होती ती ह्या शुक्रवारी काय होते त्याची. चॅनेल अॅडमिन्सनी घेतलेल्या कष्टाला काही फळ मिळते का नाही ते ह्या शुक्रवारीच कळणार होते. शेवटी एकदाचा शुक्रवार उजाडला.. आणि गंमत म्हणजे काहीही न घडताच सुरळीत पार देखील पडला. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शनिवारी सकाळी चॅनेल अॅडमिन मध्ये एका नवीनं नावाची भर पडली होती 'गुमराह'. मला हे नाव तसे नवीनं होते पण रुळलेल्या लोकांना मात्र चांगलाच धक्का देणारे होते. सर्व ऑपरेटर्सना नवीनं नेमलेल्या अॅडमिनचा परिचय करून देणारा मेसेज पाठवण्यात आला होता. गेले काही शुक्रवार नियमितपणे चॅनेल हॅक करणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा गुमराहच होता आणि तो फक्त चॅनेल अॅडमिन्सना चॅनेलच्या सिक्युरिटी विषयी अजून सतर्क करत होता. चेन मेसेज मध्ये हा 'गुमराह' बर्याच जणांच्या ओळखीचा होता हे कळून आले. गंमत म्हणजे मेसेज मध्ये नाहीच पण त्यानंतर देखील कधीही मी कोणाला गुमारह बद्दल वाईट बोलताना कधीच पाहिले नाही. 'गुमराह' मुसलमान आहे ही सगळ्यांची खात्री होती, मात्र तो कुठला आहे काय करतो ह्या विषयी भल्या भल्यांना खबर नव्हती.<br />
<br />
सर्वांनी त्या मेसेज मध्ये 'गुमराह' चे अभिनंदन करून झाल्यावर सगळ्यात शेवटी सगळ्यांचे आभार मानणारा गुमराहचा मेसेज आला. त्यात सगळ्यांचे आभार मानून सर्वात शेवटी 'पप्पी लूं' ( हे माझ्या पॅपिलॉन नावाचे त्याने शेवटपर्यंत काढलेले वाभाडे) माझ्या संगणकात शिरल्याने मी घाबरून गुन्हा कबूल केला आणि प्रायश्चित्त म्हणून अॅडमिन झालो असे लिहिले होते. च्यायला ! म्हणजे माझ्या पहिल्याच प्रयत्नात मी शार्कलाच जाळ्यात पकडायला गेलो होतो तर. मला तो मेसेज वाचून भयानक लाजल्यासारखे झाले. माझ्या मेसेज मध्ये मी सगळ्यांसमोर गुमराहची माफी मागून मीच कसा तोंडावर पडलो हे अनिच्छेने कबूल करून मोकळा झालो. पुढचे दोन दिवस मी चॅनेल मध्ये फिरकलोच नाही. एक तर मला वाटत असलेली लाज आणि दुसरे म्हणजे बॉट मधून मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग केल्याने ऑपरेटर वरून लाथ तर मिळणार होतीच कदाचित चॅनेल मधून बॅन केले जाण्याची देखील भिती होतीच.<br />
<br />
पण व्यसने अशी सहजी सुटली तर काय हो... दोन दिवसांनी प्रॉक्सी वापरून दुसर्या निकनी आम्ही हळूच आजूबाजूचा माहौल चेक करायला चॅनेल मध्ये शिरलो. चॅनेल मध्ये शिरलो आणि "आजा पप्पी लूं" असा पहिलाच स्वागत मेसेज समोर आला आणि मी डोक्याला हात लावला. च्यायला हा गुमराह काय भूत आहे का काय ? का ह्याला कोणी कर्णपिशाच्च वगैरे वश आहे ? मनांतल्या मनात स्वतः ला चार शिव्या घातल्या आणि पुन्हा नेहमीच्या पॅपिलॉन निक मध्ये आलो. आश्चर्य म्हणजे ताबडतोब बॉटने मला ऑपरेटरचे साइन देऊन वर नेऊन बसवले. चला म्हणजे बॅन देखील झालेलो नाहीये आणि अजून ऑपरेटरदेखील आहे तर. थोड्यावेळाने प्रायव्हेट विंडो मध्ये गुमराहचा मेसेज दिसला आणि आमच्या हातपायाला पुन्हा घाम फुटला. काय करतो आता हा खवीस ? कुठून दुर्बुद्धी झाली आणि ह्याच्या शेपटीवर पाय दिला असे झाले. भितभितच मेसेज उघडला. "हॅलो पप्पी लूं , कैसा है पंडित ?" येवढाच मेसेज होता. "फाईन सर" येवढे लिहिले आणि मी पहिल्यांना तिथून पळ काढला. चाट करणारे सगळे हिंदू मग ते मद्रासी, मराठी, भय्ये कोणी असोत, ते ह्याच्यासाठी कायम पंडितच असायचे आणि इंडियातून चाट करणारे मुस्लिम म्हणजे 'कनिझ'. त्याचा भारतीय मुसलमानांवर का राग होता ते अल्लालाच माहिती पण तो कायम असा आवेशाने आणि तुच्छतेनेच त्यांच्याविषयी बोलायचा.<br />
<br />
दुसर्या दिवशी पुन्हा मी गेल्या गेल्या हा खवीस माझ्या मानगुटीवर बसलाच. त्याला माझ्याशी व्हॉईस चाट करायचे होते. आता आली पंचाईत ? पण शेवटी काय होईल ते होईल ठरवून मी त्याला माझ्या याहू आयडी दिला. याहूवर तर २४ तास पडीक असायचोच दूसर्या मिनिटाला गुमराह आयडीनेच फ़्रेंड रीक्वेस्ट आली आणि मी ती स्वीकारली. कॉल रिसिव्ह केला आणि एक गंभीर पण अतिशय शांत असा आवाज कानावर पडला 'सलाम पंडितजी.' मी खरेतर त्या आवाजाचे आज इतक्या वर्षांनी आणि इतक्या वेळा ऐकून देखील वर्णन करायला कायम कमीच पडत आलोय. काय असेल ते असेल पण त्याच्या आवाजात एक वेगळेपणा होता, ऐकत राहावे असा हुकुमी आवाज असायचा. थोड्या फार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि खविसाने मुद्द्याला हात घातला.<br />
<br />
"पप्पी लूं तू मेरे डब्बे मे (डब्बा हा संगणकासाठीचा त्याचा आवडता शब्द) घुसने के लिये कौनसा फंडा ट्राय मारा?"<br />
<br />
इकडे आमच्या बोटांना कापरे आणी कपाळावरती घाम.<br />
<br />
"ऐवे ही कुछ कुछ ट्राय मारा. पुराना ट्रिगर मिला था हॅकर्स पॅरेडाइ़ज की वेबसाइटपे उसको ट्राय मारा थोडा मॉडिफाय करके."<br />
<br />
"दिखा जरा मेरे को उसका कोड." मी निमूटपणे कोड कॉपी पेस्ट केला. ५/१० मिनिटे गेली आणि तोच कोड पुन्हा त्याने मला पेस्ट केला. "सुनो पंडित अब ट्राय मारो."<br />
<br />
मी सगळी तयारी करून भितभितच पुन्हा ट्राय मारला आणि स्क्रीनवरती वेगळाच डेस्कटॉप समोर आला. येस येस ! मला जमले.. मी गुमराहच्या संगणकात शिरलो होतो. हा आनंद काही सेकंदच टिकला कारण पुढच्या क्षणी माझा संगणकच शट डाउन झाला. पुन्हा संगणक चालू करून याहू वरती आलो आणि गुमान गुमराहला कॉल लावला.<br />
<br />
"पंडित तेरे कोड मे गडबड थी मैने सुधार दी. लेकीन साला तेरा ट्रिगर डबल वे है. तू यहा घुसा तो उसी रास्तेसे मै भी वहा घुस सकता हूं"<br />
<br />
"तो आब ?"<br />
<br />
"ह्म्म्म्म चल कोइ नही, मै सिखा देता तुझे. सिखेगा दिल लगा के ?" गुमराहनी विचारले आणि मला स्वर्ग दोन बोटेच उरला. <br />
<br />
गुमराह कोण आहे, काय करतो कशाकशाचे भान उरले नाही आणि मी अक्षरश वाहवलो गेलो. मी क्षणार्धात "हो" म्हणालो आणि त्या क्षणापासून गुमराहनी माझा हात हातात धरून माझ्याकडून हॅकींगची ABCD गिरवून घ्यायला सुरुवात केली.<br />
हॅकींगचे एक अद्भुत विश्वच गुमराहनी माझ्यासाठी उघडे केले. मी देखील मन लावून शिकलो. ह्या काळात गुमराहची आणि माझी अगदी घट्ट मैत्री जमली, मात्र माझ्याजवळ आला तो जालावरचा गुमराहच. त्याचे खरे नाव, त्याचे काम, त्याचे कुटुंब कशाकशाचा त्याने मला कधी थांगपत्ता लागू दिला नाही. अर्थात त्याने देखील कधी माझी खाजगी चौकशी करण्याचा प्रयत्न केला नाही. कधी कधी तो माझ्याशी फोनवर देखील बोलायचा, मात्र कायम फोन करताना कटाक्षाने कॉलिंग कार्डचा वापर करायचा. <br />
<br />
गुमराहकडून मी त्याच्या भात्यात होती नव्हती ती सगळी अस्त्रे शिकत गेलो आणि हळूहळू गुमराह काय चीज आहे हे माझ्या लक्षात येत गेले. गुमराह म्हणजे अक्षरशः हॅकिंगचे विद्यापीठ होते. कुठल्याही मोठ्या कंपनीने त्याला हसत हसत डोळे झाकून आयटी चा सिक्युरिटी हेड म्हणून सहज नेमले असते. हा मात्र कायम जालावरच पडीक दिसायचा आणि नोकरी करणार्यांना 'क्या बे गधे? आज तेरा धोबी मॅनेजर ऑफिस मे नही है क्या?" असे चिडवताना दिसायचा. ह्याचा अर्थ हा नमुना नक्की नोकरी करत नसावा असा आपला माझा अंदाज होता.<br />
<br />
एका विशिष्ट टप्प्यावर गुमराहनी मला त्याच्या आंतरजालीय प्रॉपर्टीची ओळख करून दिली आणि मी बेशुद्धच पडायचा बाकी राहिलो. २ FTP, ३ वेबसाइट आणि २ ब्लॉगच्या साहाय्याने हा माणूस जगभरच्या संगणक वापरणार्यांवर अक्षरशः आपल्याकडचा खजिना रिकामा करत होता. संगणकात काही प्रॉब्लेम आहे ? , कुठले सॉफ्टवेअर हवे आहे? , कुठला कोड गंडला आहे?, हॅकिंग शिकायचे आहे? , व्हायरस हवे आहेत? सब मिलेगा... जिनी गुमराह के पास सब मिलेगा. HTML कोडस पासून ते त्सुनामी व्हायरस कोड पर्यंत आणि विनअँप पासून कटिया पर्यंत सर्व काही एका छताखाली ह्या अवलियाने उपलब्ध करून दिले होते. क्रॅक्स, सिरियल्स, मोर्स कोड, किजेन काय मिळत नव्हते ते विचारा. आणि हा पंटर हे सगळे एक हाती सांभाळत होता. गुमराहला प्रवासाचे, भटकंती करण्याचे फार आकर्षण होते. कार्स बाइक मधले त्याचे ज्ञान तर तोंडात बोटे घालायला लावणारे असायचे. दर दोन महिन्यांनी तो पॅरिस, अबुधाबी, चायना सारख्या कुठल्या ना कुठल्या सहलीला निघालेला असायचा आणि दर आठेक महिन्यांनी जुनी बाइक किंवा गाडी बदलून नवी दिमतीला हजर झालेली असायची. मग पुढचे १५ दिवस ह्या बाइकचे किंवा सहलीचे वर्णन ऐकवण्यात त्याचे खर्ची व्हायचे. <br />
<br />
गुमराहचे आणि माझे सूर कसे काय जुळले काय माहिती पण तो माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवायचा हे मात्र खरे. मी देखील त्याच्या विषयी प्रचंड आदर बाळगून होतो आणि अजूनही आहे. आज मी जे काय ज्ञान मिळवले आहे त्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर गुमराहचा. गुमराहच्या तालमीत मी आता चांगलाच तयार झालो होतो. 'ह्या गुमराहला काही तरी मस्त गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे राव' असे मनातल्या मनात म्हणत असतानाच गुमराहने माझ्यावरती बाँब टाकला. एकेदिवशी सकाळी सकाळी गुमराहचा फोन आला. "पंडित तेरे मेरे जॉइंट याहू अकाउंटपे मैने मेरे सारे खजाने के पासवर्डस TXT मे लीख के रखे है, उसको लिट फाँट मे कन्व्हर्ट कर और फीर साले सारी जायदाद तेरी. और सून तय्यब को पेहचानता है ना? किसी को बोल मत लेकीन मेरा भांजा है वो. कोई भी मुसिबत हो तो उसके पास बोल दे."<br />
<br />
"क्यूं ? सरकार आ गयी क्या आपको गोली मारने?" मी गमतीने विचारले.<br />
<br />
"अल्ला हाफिज" बस्स येवढेच बोलून काही न बोलता गुमराहनी फोन ठेवून दिला. मला कल्पना पण नव्हती की हे माझे आणि गुमराहचे शेवटचे संभाषण असेल. त्या फोन कॉल नंतर गुमराह जो गायब झाला तो झालाच, पुन्हा कधी न दिसण्यासाठी. कोणी म्हणायचे त्याला पाकिस्तान सरकाराने अमेरिकेसाठी हेरगिरी करताना पकडले, कोणी म्हणायचे त्याला अमेरिकेने पकडून नेले तर कोणी म्हणायचे तो अल-कायदाला जोडला गेलाय. खरे खोटे कधी कळलेच नाही पण गुमराह नाहीसा झाला किंवा केला गेला हे सत्य मात्र उरलेच. खरे सांगायचे तर ह्या अफवा होत्या का सत्यकथा माहिती नाही पण मला तय्यबला काँटेक्ट करण्याचे धाडस झाले नाही हे मात्र खरे. अनेकदा मी त्याला मेसेज करायचा ठरवायचो आणि ऐनवेळी कच खायचो. काही महिन्यात तैय्यब देखील ऑनलाईन येईनासा झाला आणि गुमराहशी जोडणारा अदृश्य धागा देखील तुटला.<br />
<br />
आणि आज इतक्या वर्षांनी हा तय्यब मला फोन करून सांगतो आहे की गुमराह गेला. तो मेल्याचे ज्या बाहेरच्यांचा कळवले जावे असे त्याची इच्छा होती त्यातला मी एकमेव होतो म्हणे. रात्र अक्षरशः सरता सरली नाही. सकाळी पुन्हा नंबर चेक केला तर तय्यबनी आपल्या मोबाईलवरूनच फोन केला होता. मी ताबडतोब त्याचा नंबर डायल केला, मला काय झाले कसे झाले सगळे सगळे जाणून घ्यायचे होते. रात्री जे बोलता आले नाही ते सगळे बोलायचे होते.<br />
<br />
पण खरे सांगू, मी तय्यबला कॉल करायला नको होता. निदान माझ्या मनात मी ज्या मनमौजी गुमराहचे चित्र रंगवले होते तो जन्मापासून दोन्ही पायांनी पांगळा होता आणि शेवटी कॅन्सरचा घास होऊन मेला हे तरी मला कळाले नसते आणि माझ्या चित्रातले रंग उडून गेले नसते.<br />
<br />
PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-86547465732510371512011-06-30T13:25:00.000+05:302012-09-18T18:02:34.174+05:30रागिणी MMS<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/ragini-mms1.jpg" width="350" height="547" alt="" /><br />
<br />
काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे. खरे सांगायचे तर चित्रपट सुरु झाल्यापासून हळूहळू आता हा सॉफ्ट पॉर्न कडे झुकतो का काय? असाच प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मध्यांतरानंतर तर चित्रपटाला ताण ताण ताणले आहे आणी तिथेच सगळी मजा निघून जाते.<br />
<br />
<iframe width="560" height="349" src="http://www.youtube.com/embed/91Ln65R1tmg" frameborder="0" allowfullscreen></iframe><br />
<br />
रागिणीचा (कैनाझ मोतीवाला) मित्र उदय (राजकुमार यादव) तीला विकेंडसाठी शहराबाहेरच्या एका फार्महाऊस वरती घेऊन जातो. हे फार्महाऊस जंगलात असते. रागिणी आनंदात असते मात्र उदयच्या मनात काही वेगळेच विचार असतात. ऍक्टर व्हायची स्वप्ने बघणारा उदय आपल्या मित्र पंडित ह्याच्या साहाय्याने त्या फार्महाऊस मध्ये रागिणीची सेक्सटेप चित्रित करणार असतो. रागिणी मात्र ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असते.<br />
इकडे बंगल्यात शिरल्या शिरल्याच आधी लाइट नसल्याचे कळते मग उदय एका अडगळीच्या आणि अंधार्या बोळातल्या खोलीत जाऊन स्विच शोधतो. त्याच खोलीत त्याला मॉनिटरवरती त्याच्या मित्राने संपूर्ण फार्महाऊसमध्ये विविध ठिकाणी लपवलेले कॅमेरे दिसतात. आनंदलेला उदय हॉल मध्ये येतो आणि ताबडतोब त्याच्या प्रेमचाळ्यांना ऊत येतो. रागिणी मात्र 'भूक लागलीये म्हणून ओरडत असते.' मग पॅक करून आणलेला डबा बाहेर काढला जातो ज्यात अचानक आळ्या निघतात. (हे राम !) मग शेवटी ते अन्न फेकून देण्यात येते. तोवर बरीच रात्र झालेली असल्याने आता दोघेही वरच्या मजल्यावरच्या बेडरूम कडे मोर्चा वळवतात. (इथे प्रेक्षकही सावरून बसतात)<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Ragini_MMS2.jpg" width="350" height="400" alt="" /><br />
<br />
बाथरुम मध्ये रागिणी फ्रेश होईपर्यंत इकडे उदय टीव्ही मध्ये लपवलेल्या कॅमेर्याची सेटिंग वैग्रे अॅडजेस्ट करून घेतो. रागिणी बाहेर आल्यावर पुन्हा प्रेमचाळ्याना ऊत येतो... पण ह्या वेळी बंगल्याच्या दारावर थापा ऐकायला येऊन लागतात आणि पुन्हा आपल्या आणि उदयच्या रंग मे भंग होतो. हिलस्टेशनला निघालेले रागिणीचे मित्र पिया आणि उदय जाता जाता तिला भेटायला आलेले असतात. नुसते आलेले नसतात तर बिअर वैग्रे घेऊन पार्टिच्या तयारीनेच आलेले असतात. आता उदयची चिडचिड चालू होते, मात्र रागिणी त्याची समजूत काढते. पार्टी ऐन रंगात आलेली असतानाच उदयला बंगल्याच काहीतरी विचित्र जाणवते, आसपास कोणीतरी वावरत आहे असे वाटायला लागते. त्याच्या मानेवर अचानक वार देखील होतो. गावात कोणीतरी सांगितलेली त्या बंगल्यातल्या लोकांनी त्यांच्या कुटुंबातल्या बाईला चेटकीण म्हणून मारल्याची आणि तिच इथे वावरत असल्याची गोष्ट त्याला आठवते. ती गोष्ट तो सगळ्यांना सांगून पियाला घेऊन तिथून पळ काढतो.<br />
आता सगळी आवरा आवर करून पुन्हा उदय आणि रागिणी बेडरूम मध्ये (पुन्हा प्रेक्षकांच्या आशा पल्लवित) जातात. पुन्हा त्यांच्या प्रेमप्रदर्शनाला उत येतो. ह्यावेळी उदय रागिणीचे हात बेड्यांनी बेडला बांधतो आणि प्रेमाचा नवाच आविष्कार दाखवतो. त्यांचे प्रेम रंगात आलेले असतानाच उदयचे केस धरून त्याल कोणीतरी ओढते आणि दोघांचा थरकाप उडतो. त्या दोघांशिवाय अजून कोणीतरी आणि ते ही अमानवीय अस्तित्व आजूबाजूला वावरत आहे ह्याची त्यांना जाणीव होते. ह्यासर्वात बेड्यांची किल्ली हरवते, मोबाईलची बॅटरी संपते आणि शेवटी उदय झपाटला जातो आणि आत्महत्या करतो. आता उरते ते बेड्यांमध्ये हात अडकलेली असाहाय्य रागिणी आणि ते अस्तित्व...<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Ragini-mms.jpg" alt="" /><br />
<br />
पुढे काय होते ते चित्रपटातच बघण्यात खरी रंगत आहे. आता ती प्रत्येकालाच रंगत वाटेल असा माझा दावा नाही. चित्रपटातले अमानवीय अस्तित्व हे एका सो कॉल्ड चेटकिणीचे दाखवले असून ते मराठी भाषिक दाखवली आहे हे रहस्य उघड करायला हरकत नाही. तीचे 'मी चेटकीण नाही... मी माझ्या मुलांना मारले नाही..' चे पालुपद मात्र असह्य. खरे सांगायचे तर कैनाझचा एकूण मादक लुक आणि बोल्ड दृश्यात देखील तिने न लाजता दिलेली साथ ह्यासाठी सुद्धा हा चित्रपट बघायला हरकत नाही. हो..उगा ताकाला जाऊन भांडे का लपवा ? ती दिसली आहे मादक आणि अभिनय देखील बराच चांगला केला आहे. राजकुमार यादव देखील ठीकठाकच, मात्र त्याची घाबरल्याचा जो अभिनय केला आहे ना तो का कुणास ठावुक खदखदून हसवून जातो आपल्याला.<br />
<br />
<br />
तर सांगायचा मुद्दा काय तर थरारपटाची म्हणून फार मोठी अपेक्ष न ठेवता नव्या चेहर्यांचा टैमपास चित्रपट म्हणून हा बघायला नक्कीच हरकत नाही. <br />
<br />
<br />
<a href="http://www.zabrigraphics.com/Glitter-Generator/"><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/p.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/r.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/s.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/d.gif" border="0" alt=""></a>PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-84359264699030786502011-06-21T12:44:00.000+05:302012-09-18T18:15:40.572+05:30रेडी ? नो रेडी ssSSsss ...<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/ready-hindi-movie-salman-khan-asin-stills-300x225.jpg" alt="" /><br />
<br />
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती. (इथे 'अपेक्षा उंचावली होती' असे म्हणालेले नाही ह्याची नोंद घेतल्या जावी.) अगदी फुल्ल्टू धमाल नसेल पण निदान दोन अडीच तास जो काय चित्रपटाचा कालावधी असेल तो झकास जाईल ह्या कल्पनेने रेडीला हजेरी लावली.<br />
<br />
<iframe width="560" height="349" src="http://www.youtube.com/embed/ACvDgKuTxnA" frameborder="0" allowfullscreen></iframe><br />
<br />
सलमान, असीन, परेश रावल, पुनीत इस्सर, मनोज जोशी हे शिलेदार, महेश मांजरेकर, आर्य बब्बर, अनुराधा पटेल हे सैनिक आणि पाहुण्या भूमिकेत संजु बाबा, चंकी पांडे, आरबाज खान, अजय देवगण आणि झरीन खान अशी फौज असताना मस्त झणझणीत भेळेचा बकाणा भरायला मिळणार ह्या आशेने आम्ही स्थानापन्न झालो. खरंच सांगतो तुम्हाला चित्रपट सुरु झाल्यापासून १५ व्या मिनिटाला आम्ही 'चित्रपटालाच नाही तर पृथ्वीवरच का आलो ?' असा प्रश्न स्वतःला विचाराण्यायेवढे निराश आणि हताश झालो.<br />
<br />
खरेतर परीक्षण आणि परिचयात चित्रपटात काय काय आहे हे रंगवून सांगायचे असते; पण इथे आमची झोळी रिकामीच असल्याने काय सांगायचे हा प्रश्नच आहे. आता चित्रपटात काय बघितले असे विचाराल तरी आठवून आठवून लिहावे लागेल. सांगायचे कशाबद्दल ? कथा = भिकार, म्हणजे खरेतर १०/१२ सुप्पर डूप्पर चित्रपटांच्या शॉट्सची मिळून विणलेली गोधडी. पटकथा = कथाच नाही हो., पटकथेचे काय डोंबल घेऊन बसलायत ? अभिनय = शंख ! अक्षरशः सगळ्या कलाकारांना वाया घालवले आहे. आणि सलमान तर असह्यच होतो. देव आनंद.. अगदी गेला बाजार मनोज कुमार देखील स्वतःचा चित्रपटात स्वतःवर येवढा वेळ कॅमेरा ठेवत नसतील येवढा चित्रपटभर सलमानवर केंद्रित आहे. (मनोजकुमार हा गेला बाजारच आहे आणि देव आनंद अजूनही तरुण आहे हे ध्यानात घ्यावे.)<br />
<br />
बरं आता तुम्हाला स्टोरी सांगायची म्हणली तर ती चार ओळीत देखील मावायची बोंबाबोंब. सलमान एक 'मासूम चेहरेवाला कमींना' असतो आणि त्याचा बाप महेश मांजरेकर हा करोडपती असतो आणि विनाकारण विनोद निर्मितीसाठी तो विसराळू देखील असतो. तो नक्की काय धंदा करत असतो हा भाग अलाहिदा. तर ह्या सलमानचा एक भरापुरा परिवार असतो. २ काका , २ काकवा, २ नोकराणी, एक कुत्री इ. इ. कुटुंबाचे एक गुरुजी देखील असतात, ज्यांच्या सल्ल्यानेच घरातली काडी इकडची तिकडे हालत असते. हे गुरुजी सलमान अर्थात प्रेम साठी पूजा नावाची एक कन्या निश्चित करतात आणि तीला एयरपोर्ट वरून आणायची जबाबदारी अर्थात प्रेमवर येते. मग साहेब मुद्दामून वेगळ्याच टर्मिनलवर जाऊन उभे राहतात आणि पूजा विषयी काकाशी गप्पा मारत बसतात. इकडे स्वतःचे लग्न मान्य नसल्याने पळून आलेली आणि माफिया कुटुंबाशी निगडित असलेली असीन अर्थात संजना ह्याचे बोलणे ऐकते आणि पूजा असल्याचा बनाव करून प्रेमच्या घरात आश्रय घेते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Ready-Stills-6.jpg" width="400" height="325" alt="" /><br />
<br />
मग सलमानचे असीन वर आणि असीनचे सलमानवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न अॅज युज्वल सुरु होतात. मग अचानक सलमानला असीनच्या सच्चाईचा पत्ता वैग्रे लागतो आणि मग लवकरच दोघांना आपण एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कार देखील होतो. मग हळूहळू संजनाच्या कुटुंबाची ओळख होते. तीचे दोन्ही मामा तिच्या २०० करोड रुपायाच्या फॅमिलीसाठी तीचे लग्न आपापल्या साल्यांबरोबर लावायच्या तयारीत असतात. हे दोन्ही मामा सख्खे भाऊ असूनही पक्के वैरी असतात बरे. पण अॅज युज्वल त्यांच्या बायका सोशिक, प्रेमळ आणि परिवाराला एकत्र आणण्याची इच्छा असलेल्या वैग्रे असतात. ह्या दोन्ही मामांचा अकाउंटंट म्हणजे परेश रावल. ह्या परेश रावलचा भाचा कम असिस्टंट बनून सलमान ह्या परिवारात प्रवेश करतो आणि मग पुढे काय होते ते सांगायची आवश्यकता नाहीच...<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/ready_001.jpg" alt="" /><br />
<br />
सलमाननी चित्रपटभर अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे जो अॅज युज्वल जमलेला नाही. सौथ फायटींग पुरता तो एकदम झकास, पण चित्रपटात अॅक्शन देखील चवीपुरतीच आहे. मुळात चित्रपट अॅक्शन करावा, रोमॅंटीक करावा का विनोदी करावा हेच लक्षात न आल्याने दिग्दर्शकाची प्रचंड गोची झाल्याचे चित्रपटभर जाणवत राहते. शेवटी त्याने हे सगळे एकत्र करून भेळ बनवण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न केलेला आहे हे सतत जाणवत राहते. ना धड विनोद जमलाय, ना धड रोमांस. अभिनयाचा शंख कसा वाजलाय ते सांगायलाच नको. असीनचे १/२ क्लोजअप घेऊन बाकीच्या चित्रपटभर तिच्या ऐवजी राखी सावंतला घेतले असते तरी खपून गेले असते येवढी असीन ह्यात दुर्लक्षित आहे. महेश मांजरेकरला प्रत्येक वाक्यात एक शब्द विसरायला लावून काय विनोद घडवायचा प्रयत्न केला आहे ते शेवटपर्यंत समजत नाही आणि हसवत त्याहून नाही. परेश रावल एखाद दोन प्रसंगात मस्त धमाल करून जातो पण इतर दगडांची साथ न मिळाल्याने शेवटी फिकाच पडतो. पुनीत इस्सरच्या भूमिकेला देखील पाहुणी भूमिका का म्हणू नये हा अजून एक प्रश्न. अनुराधा पटेलचे बर्याच दिवसानंतरचे रुपेरी दर्शन सुखावह हेच त्यातल्या त्यात एक नशीब.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/new_movie_ready_pictures_download.jpg" width="300" height="225" alt="" /><br />
<br />
सर्वात डोक्यात जातो तो सुदेश लेहरी. ह्या माणसाची भूमिका अक्षरशः विनाकारण आणि पाचकळपणासाठी घुसडलेली आहे हे स्पष्ट जाणवते. कॉमेडी सर्कस गाजवलेला हा कलाकार इथे अक्षरशः फुकट गेला आहे. अभिनयातला तोचतोचपणा आणि मूर्खासारख्या चेहर्याने केलेला वावर अतिशय भिकार. जॉनी लिव्हरची जागा घ्यायला त्याला अजून काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत हे मात्र निश्चित.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/pun.jpg" alt="" /><br />
<br />
चित्रपटाला विनोदी म्हणता येईल असा एकही प्रसंग चित्रपटात नाही. तसा रोमँटिक प्रसंग देखील नाहीचे म्हणा. पात्राचे विचित्र हावभाव, एकमेकांना स्विमिंग पूल मध्ये ढकलणे, माफिया म्हणवले जाणारे आणि जोकर्स सारखे वावरणारे, बोलणारे गुंड आणि पाण्यात पडल्यावर 'मेरा वो गीला हो गया...' ह्या सारख्या संवादांना जर विनोदी म्हणले जात असेल तर मात्र आमचा साष्टांग नमस्कार आहे. अजय देवगण, संजुबाबा, झरीन सारख्या पाहुण्या कलाकारांना तर चित्रपटाच्या पहिल्या ५ मिनिटातच टाटा बाय बाय करण्यात आलेले आहे.<br />
<br />
'ढिंक चिका..' हे एकमेव गाणे जे सतत ऐकून ऐकून कान किटलेत, ते सोडले तर एकही गाणे लक्षात राहतं नाही. प्रितम आणि देवी श्री प्रसाद ह्या दोन दिग्गजांनी दिलेले संगीत सतत ह्या आधी कुठेतरी ऐकले असल्याचे मात्र सतत जाणवत राहते. अनिस बझ्मी ह्याचेच ह्या चित्रपटाला डायरेक्शन आहे हे काय मनाला पटत नाही बॉ ! साफ फसला आहे हा माणूस.<br />
एकूण काय तर अपेक्षा ठेवून अथवा न ठेवून देखील रेडी मनोरंजन करण्यात साफ अपयशी ठरतो.<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<a href="http://www.zabrigraphics.com/Glitter-Generator/"><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/p.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/r.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/s.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/d.gif" border="0" alt=""></a>PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-52331176468465292552011-02-08T14:53:00.002+05:302012-09-18T18:15:40.566+05:30जोगवा<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/2627.jpg" alt="" /><br />
<br />
बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती. शेवटी परवा स्टार प्रवाहमुळे हा संपूर्ण चित्रपट बघण्याचा योग आला.<br />
<br />
<iframe title="YouTube video player" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/e6rVcGAG2Ec" frameborder="0" allowfullscreen></iframe><br />
<br />
चित्रपटाची कथा खरेतर थोडी हटके सदरात मोडणारी. आपल्या आजूबाजूला दिसणार्या जोगतिणी आणि जोगत्यांच्या आयुष्याची हि कथा. ह्यातल्या जोगतिणी आपल्या बर्यापैकी परिचयाच्या पण जोगते सहसा शहरात तरी कमी आढळणारे. हा चित्रपट ह्या पंथाच्या रुढी, चालींवर प्रकाश टाकणारा, त्यांच्या वेदना समाजापुढे मांडणारा म्हणून मनावर ठसतो. दु:खांचे, वेदनांचे अवडंबर न माजवता, अनाठायी मेलोड्रामा न ओतता सहजसोपे पणाने सादर केलेले प्रसंग आपली छाप सोडून जातात. उपेंद्र लिमये, किशोर कदम, मुक्ता बर्वे, विनय आपटे, अदिती देशपांडे, प्रिया बेर्डे, चिन्मय मंडलेकर अशी तगडी स्टार कास्ट लाभलेला हा चित्रपट प्रत्येक अंगाने सुबक ठरला आहे. मग तो अभिनय असो, अजय अतुल ह्यांचे कौतुकास्पद आणि अनुरूप संगीत असो, श्रेया - हरिहरन ह्यांच्या आवाजाचा गोडवा असो किंवा राजीव पाटील ह्यांचे दिग्दर्शन असो. <br />
<br />
कर्नाटकातल्या एका छोट्या गावातील हि कथा. डोक्यात जट सापडल्याने यल्लम्माआईची भक्त असलेली अक्कुबाई सुलु (मुक्ता बर्वे)ला देवी यल्लमाच्या पायावर वाहण्याचा सल्ला देते. अर्थात आता ती जोगतीण बनणार असते. तर इकडे लघवीतुन रक्त जात असणारा तायप्पा (उपेंद्र लिमये) अशाच अंधश्रद्धेमुळे जोगत्या बनवला जातो. खरेतर हि ह्या दोघांच्या आयुष्याची कहाणी, पण हि कहाणी ह्या दोघांबरोबरच हा पंथ, ह्या पंथात आलेल्या / ढकलले गेलेल्या लोकांच्या आयुष्याचा दुर्दैवी फेरा, त्यांचे जगणे ह्या सगळ्यावरच प्रकाश टाकतो.<br />
<br />
ह्या चित्रपटाची कथा कथा खरेतर चार ओळीत मांडता येईल, पण तिला दिग्दर्शकाने लेखकाच्या मदतीने अतिशय छान फुलवून आपल्या समोर मांडली आहे. ह्यातील कित्येक प्रसंग अतिशय हळुवार पणे चित्रित केले आहेत त्याची दाद द्यायला हवीच. यल्लमाच्या डोंगरावर एका बाजूला सुलुचे आणि दुसर्या बाजूला तायप्पाचे लावले जात असणारे लग्न, मैत्रिणीच्या लग्नात तिला हळद लावली जात असताना आपण मात्र आता देवाच्या पायी वाहिली जाणार ह्या विचारात गुरफटलेली सुलु, जोगत्या बनल्यावर साडीच्या आत विजार घालून निदान स्वतःपुरते आपले पुरुषत्व जपण्याचा उपेंद्र लिमयेने केलेला प्रयत्न.. असे काही प्रसंग मनात घर करून बसतात.<br />
<br />
जोगतीण बनलेली सुलु कायमची जोगत्यांच्या मेळ्यात राहायला जाते. अल्लड सुलु मेळ्यात नवीनंच दाखल झालेल्या झांजेवाल्याच्या प्रेमात गुरफटते तर इकडे तायप्पा सुलुत गुंतत जातो. ऐनवेळी सुलुच्या होणार्या बाळाचे पितॄत्व नाकारून तो पळून जातो आणि सुलु कोसळून पडते. सुलुचा गर्भ पाडला जातो. अशा अवस्थेत तायप्पा सुलुला आधार देतो. सुलु कोसळून पडलेली असताना इकडे तायप्पा देखील जीवनाची वेगळीच लढाई लढत असतो. त्याच्यावर लादले गेलेले स्त्रीत्व आणि त्यामुळे त्याच्या मनाचा होणार कोंडमारा तो कुठे मोकळा देखील करू शकत नसतो. अनेक वादाच्या प्रसंगात त्याचे उफाळून येणारे पुरुषीपण आणि त्यापासून त्याला मागे खेचत त्याच्या वडिलांपासून (विनय आपटे) सर्वांनीच त्याला आता त्याच्या जोगत्या होण्याची आणि पुरुषत्व सोडल्याची वेळोवेळी करून दिलेली जाणीव काळजाला घरे पाडते. <br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/36edf131.jpg" alt="" /><br />
<br />
<br />
<br />
विशेष उल्लेख करावा लागेल तो किशोर कदम ह्यांनी साकारलेल्या यमन्या ह्या जोगत्याचा. सर्वांची काळजी घेणारा, सर्वांना सांभाळून घेणारा यमन्या आतून मात्र पूर्ण पोखरला गेलेला आहे. दारूच्या आहारी गेलेला आहे. पुरुषत्व सोडून जाणे म्हणजे काय हे यमन्याने पुरेपूर अनुभवलेले आहे. एका प्रसंगात तो नदीवर उघडा अंघोळ करत असतो आणि काही मुले त्याच्याकडे बघत असतात. त्यावेळी तो उपेंद्र लिमयेला म्हणतो "माझ्या उघड्या अंगाकडे पुरुषाने असे बघितले की मनाला कसे हळुवार वाटते" तेव्हा अंगावर सरसरून काटा येतो. जोगत्या झाल्याझाल्या आलेल्या अनुभवांची, पुरुषांकडून मिळालेल्या अनैसर्गिक वागणुकीची कथा जेव्हा यमन्या विझलेल्या डोळ्यांनी सांगतो तेव्हा आपण अंतर्बाह्य हादरतो. ह्या कथा आपण ह्याआधी ऐकलेल्या असतात देखील पण किशोर कदमकडुन ते ऐकताना जणू त्यांनी तो अनुभव प्रत्यक्षात घेतलाच आहे असे वाटत राहते आणि ते काळजाला अधिक भिडते.<br />
<br />
<iframe title="YouTube video player" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/yksMbFUxTVw" frameborder="0" allowfullscreen></iframe><br />
<br />
पुढे सुलु आणि तायप्पा मनाने आणि शरीराने देखील एकमेकांच्या जवळ येतात. पंथातील काही गोष्टी त्यांना अविचारी वाटत असतानाच गावातले मास्तर ह्या पंथातील अंधश्रद्धा, रुढी ह्या विषयी आवाज उठवायला सुरुवात करतात. एकमेकांच्यात गुंतलेले सुलु आणि तायप्पा पंथ सोडण्याचा आणि संसार करण्याचा निर्णय घेतात आणि संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात पेटून उठतो. पुढे काय होते ते पडद्यावरच अनुभवण्याजोगे...<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/jogwa2.jpg" width="490" height="325" alt="" /><br />
<br />
उपेंद्र दाते, किशोर कदम, मुक्ता बर्वे ह्यांच्या जोडीलाच विनय आपटे, अदिती देशपांडे ह्यांची देखील अभिनयाची आघाडी उत्तम सांभाळली आहे. देवीवर नितांत श्रद्धा ठेवणारी, वेळेला मेळ्यातल्या जोगतिणींच्या हक्कासाठी पंचायती समोर उभी राहणारी पंथाच्या मेळ्याची प्रमुख अदिती देशपांडे ह्यांनी उत्तम साकारली आहे. तर जोगत्या झालेल्या पोराच्या बापाच्या भूमिकेत विनय आपटे त्यांच्या वाट्याला आलेले बरेच प्रसंग खाऊन जातात. स्वतःच्या घरी जोगवा मागायला आलेल्या उपेंद्र लिमयेला पाहून ते जेव्हा हातातली दोरी रागारागाने गुंडाळत त्याच्या नावाने शिव्या देतात तो प्रसंग तर एकदम खासच.<br />
<br />
उपेंद्र दाते आणि मुक्ता बर्वे त्यांच्या भूमिका अक्षरशः जगले आहेत येवढे सांगितले तरी पुरे. ह्या सगळ्याला छानसे कोंदण लाभले आहे ते अजय अतुल ह्यांच्या संगीताचे आणि हरिहरन, श्रेया ह्यांच्या गोड गळ्याचे. 'जीव रंगला' आणि 'ललाटी भंडार' हि गाणी अविस्मरणीयच.<br />
<br />
<iframe title="YouTube video player" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/Hf7FF1Dfm4Q" frameborder="0" allowfullscreen></iframe><br />
<br />
<br />
एकुणं काय तर पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा जोगवा एकदा नक्की अनुभवण्याजोगा.<br />
<br />
<br />
<a href="http://www.zabrigraphics.com/Glitter-Generator/"><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/p.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/r.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/s.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/d.gif" border="0" alt=""></a>PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-86035589141735424572011-01-11T12:37:00.001+05:302012-09-18T18:15:40.605+05:30क्षणभर विश्रांतीपरवा 'क्षणभर विश्रांती' हा एक सुंदर मराठी चित्रपट बघण्यात आला. चित्रपटाला खरेतर खूप आकर्षक कथा वगैरे आहे अशातला भाग नाही, उलट ह्या चित्रपटाची कथा साधी सरळ आणि सहज उलगडत जाणारी आहे. मात्र कमरेखाली न जाणारे विनोद, अतिभावनाप्रधान फुलपाखरी अश्रुपाताला घातलेला आवर, दिग्दर्शकाच्या ताब्यात राहिलेला भरत जाधव आणि फ्रेश आणि तरुण चेहर्यांना मिळालेली सुंदर संधी ह्यामुळे चित्रपट आवडून गेला.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Kshanbhar-Vishranti-03.jpg" width="520" height="300" alt="" /><br />
<br />
चित्रपटाचे तांत्रिक स्वरूप आणि स्टारकास्ट सुद्धा सचित पाटील, हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांनी व्यापून टाकलेली आहे. ह्या चित्रपटात अभिनय करण्याबरोबर सचित पाटील (दिग्दर्शक आणि कथा), मौलिक भट (प्रोड्युसर), हेमंत ढोमे (संवाद) अशा जबाबदार्या सुद्धा लिलया पेलून गेलेले आहेत. तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल. चित्रपटात हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांच्या बरोबरच कादंबरी कदम, मनवा नाईक आणि पुजा सावंत ह्या नवीनं चेहर्यांच्या तरुणींना देखील संधी मिळाली आहे. त्या दिसल्या आहेत छान आणि अभिनयात देखील कमी पडत नाहीत हे विशेष. खरेतर चित्रपटाची कथाच इतकी साधी सरळ आहे की ह्या लोकांना फार अभिनय करायची गरजच पडली नाहीये.<br />
<br />
हृषिकेश कामेरकर ह्या गुणी गायक आणि संगीतकाराला मिळालेली संधी हे ह्या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य, त्याने ह्या संधीचे सोने केले आहे. संगीताच्या आणि गाण्याच्या बाबतीत चित्रपट सरसच.<br />
<br />
<object width="480" height="385"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/kpwEP6m8JnE?fs=1&hl=en_US"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/kpwEP6m8JnE?fs=1&hl=en_US" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="480" height="385"></embed></object><br />
<br />
काय आहे ह्या चित्रपटाची कथा ? कथा एकदम सरळ.. सचित पाटील हा अमेरिकेत नोकरी करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर बर्याच वर्षांनी मुंबईत परत आला आहे आणि आता त्याला आपल्या जीवाभावाच्या मित्रांना भेटायचे वेध लागलेले आहेत. हे मित्र म्हणजे भुर्जीपावची गाडी लावणार सिद्धार्थ जाधव, कवी असणारा पण एका मेडिकलच्या दुकानात नोकरी करणार हेमंत ढोमे आणि समांतर रंगभूमीवर नट म्हणून नशीब अजमावत असलेला मौलिक भट. सचित देखील खरेतर एक छानसा गायक असतो पण आयुष्यात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तो गाण्याला रामराम ठोकून नोकरीसाठी अमेरिका गाठतो. आता निदान आपले मित्र तरी त्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करत आहेत का नाही हे त्याला जाणून घ्यायचे असते. सचितचे एकूणच सगळे सुरळीत चाललेले बघून हे सर्व मित्र त्याच्याशी खोटेच बोलतात. सिद्धार्थ आपले मोठे हॉटेल असल्याचे सांगतो, हेमंत आपला कविता संग्रह छापला गेल्याचे तर मौलिक आपण यशस्वी नट असल्याचे भासवतो. मित्रांच्या यशाने आनंदित सचित पाटील त्यांना आता अलिबागला जाण्याचा प्लॅन सांगतो. सचितच्या अमेरिकेतील कमाईतून वडिलांनी तिथे एक बंगला घेतलेला असतो. त्या बंगल्याला एक भेट आणि त्यानिमित्ताने पिकनिक असा बेत ठरवून सर्वजण अलिबागला कुच करतात.<br />
<br />
<object width="480" height="385"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/xLMewJpSeOo?fs=1&hl=en_US"></param><param name="allowFullScreen" value="true"></param><param name="allowscriptaccess" value="always"></param><embed src="http://www.youtube.com/v/xLMewJpSeOo?fs=1&hl=en_US" type="application/x-shockwave-flash" allowscriptaccess="always" allowfullscreen="true" width="480" height="385"></embed></object><br />
<br />
इकडे अलिबागच्या बंगल्यात वेगळेच नाटक रंगलेले असते. बर्याच वर्षे कोणी न फिरकलेल्या त्या बंगल्यात आता बंगल्याचा केअर टेकर असलेल्या भरत जाधवने (आप्पा) खानावळ आणि लॉज उघडलेले असते. ह्या सगळ्यात अचानक सचित येत असल्याचा त्याच्या वडिलांचा फोन आल्यावर भरतची तारांबळ उडते. जेवणार्या लोकांना ताटावरून उठवण्यापासून ते खोलीत राहणार्यांना आहे त्या कपड्यानिशी बाहेर काढण्यापर्यंतची कामे तो १० मिनिटात उरकतो. मधल्या काळात नोकराकडून बंगल्याबाहेर लावलेला 'क्षणभर विश्रांती' हॉटेलचा बोर्ड देखील काढून घेतो. बंगल्यात शिरत असताना दारातच येवढी गर्दी बघून सचित चौकशी करतोच, मात्र बंगला बघायला पर्यटक येत असतात असले कारण सांगून भरत वेळ मारून नेतो.<br />
<br />
बहीण शुभांगी गोखले (जिजी ) , नोकर आणि मुंबईत शिकणारी भाची ह्या सर्वांशी खोटे बोलून हॉटेल चालवणार्या भरतची आता मात्र तारांबळ उडते. त्यातच त्याची मुंबईला शिकणारी भाची आपल्या तीन मैत्रिणींना घेऊन ट्रीपला आलेली असते आणि बंगल्यातच राहत असते. नेहमीप्रमाणेच सचित, सिद्धार्थ, हेमंत आणि मौलिक हे त्या चार जणींच्या प्रेमात पडतात आणि कथा नेहमीच्या वळणाने जायला लागते. मात्र अचानक एक दिवशी भरतचे बिंग फुटते. बहिणीच्या आजारपणासाठी आणि भाचीच्या शिक्षणासाठी हे सर्व केल्याचे भरत सांगतो आणि सचितची क्षमा मागतो. मोठ्या मनाने सचित त्याला माफ करतो आणि इथे असे पर्यंत भरतला बहीण आणि भाची समोर खोटे न पाडण्याची जबाबदारी घेतो. त्यानंतर ह्या चौघा जणांच्यात थोड्याश्या नेहमीच्या रुसव्या फुगव्यानंतर प्रेमाचे अंकुर फुटायला सुरुवात होते आणि अचानक एक दिवशी सचित आपण हा बंगला विकणार असल्याचे जाहीर करतो.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/kv41.jpg" alt="" /><br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/sonalee-in-kshanbhar-vishranti.jpg" alt="" /><br />
ह्यानंतर कथा नेहमीचेच वळण घेते का अजून काही अनपेक्षित घडते ? हे चित्रपटातच बघण्यात मजा आहे.<br />
अभिनयाच्या आघाडीवर भरत जाधव, सिद्धार्थ, सचित पाटील अप्रतिमच. जिजिच्या भूमिकेत शुभांगी गोखले नेहमीप्रमाणेच यशस्वी खेळी खेळून गेल्या आहेत. हेमंत ढोमे, मैलिक भट, कादंबरी कदम, पुजा जाधव आणि मनवा नाईक आपापली कामे व्यवस्थित पार पाडतात. मुख्य म्हणजे कुठेही लाउड अभिनय जाणवत नाही. भरत जाधवने त्याच्या वाटेला आलेले हळवे प्रसंग अतिशय सुरेख उभे केले आहेत, त्याबद्दल त्याला विशेष दाद द्यायला लागेल. सोनाली कुलकर्णी दिसली आहे छान आणि अभिनयात देखील उत्तम. चित्रपटात खटकलेली एकमेव गोष्ट म्हणजे अलिबागच्या निसर्गसौंदर्याचा १०% सुद्धा वापर चित्रपटात करण्यात आलेला नाही.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/images-1.jpg" alt="" /><br />
तर मग कधी घेताय 'क्षणभर विश्रांती' ?<br />
<br />
<a href="http://www.zabrigraphics.com/Glitter-Generator/"><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/p.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/r.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/s.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/d.gif" border="0" alt=""></a>PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-1452603164909466731.post-70965867399952530192010-12-14T12:46:00.002+05:302012-09-18T18:15:40.571+05:30अल्लाह के बंदेबरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो. "नसिरुद्दिन शहा आणि अतुल कुलकर्णीनी काय बाप काम केलंय राव" पासून "भिकार पिक्चर आहे, नसिरुद्दिन शहाला वाया घालवलंय" पर्यंतच्या कॉमेंट्स अधे मध्ये कानावर येतच होत्या, पण 'स्वतः बघायचा आणि मगच मत ठरवायचे' हा आमचा दंडक असल्याने शेवटी काल अल्लाह च्या बंद्यांचे दर्शन घ्यायचे निश्चित केले.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/AllahKeBanday.jpg" alt="" /><br />
<br />
नसिरुद्दिन शहा, अतुल कुलकर्णी, सुहासिनी मुळे, विक्रम गोखले, झाकीर हुसेन अशी रंगमंचावर आणि पडद्यावर बाप असलेली स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला शर्मन जोशी, रुखसार, सक्षम देशपांडे आणि स्वतः फारुक कबीर अशी फौज. चित्रपटाकडून अपेक्षा नक्कीच वाढलेल्या होत्या. ह्या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत चमकण्याबरोबरच फारुक कबीर ह्याने ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केलेले आहे.<br />
<br />
मोठ्या अपेक्षेने चित्रपट बघायला बसलो खरा पण खरे सांगायचे तर पदरात (का शर्टात? ) निराशाच पडली. अतुल कुलकर्णीचा आणि थोडाफार झाकीर हुसेनचा अपवाद सोडल्यास इतर दिग्गजांना अक्षरशः वाया घालवलेले आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे सारख्या ताकदीच्या कलाकारांची भूमिका तुकड्यातुकड्याने जोडली तरी ५ मिनिटांच्या वर भरणार नाही. सक्षम कुलकर्णीला देखील म्हणावे तसा वाव नाही. सगळ्यात वाईट वाटले ते नसिरुद्दिन शहा ह्यांना बालसुधार गृहाच्या जेलरच्या भूमिकेत बघून. एकही धड आणि पूर्णं दोन वाक्यांचा संवाद नाही, बोलका चेहरा हे त्यांचे जे प्रभावी अस्त्र आहे त्याचा कणभर देखील वापर करून घेतलेला नाही आणि सगळ्यात संतापाचे म्हणजे त्यांना दिलेला गेट अप आणि त्यांना भूमिका साकारताना एका पायाने लंगडत चालत असल्याचे दाखवणे. नसिर ह्यांची हि भूमिका अगदी तंतोतंत 'दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील पाकिस्तान तुरुंगाच्या जेलर असलेल्या 'के के' ह्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. मिळतीजुळती कसली? आपण 'के के' लाच पाहत आहोत असे वाटत राहते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Allah-Ke-Banday.jpg" alt="" /> <img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/5.jpg" alt="" /><br />
<br />
असो...<br />
<br />
तर आता मूळ कथेकडे वळू. विजय आणि याकुब हे मुंबईच्या सगळ्यात मोठ्या 'भुलभुलय्या' झोपडपट्टीत राहणारे दोघे अगदी जवळचे मित्र, सख्खे भाऊच म्हणाना. आई वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अनाथ याकुबला शेजारच्या सुहासिनी मुळेने वाढवलेले असते. तिचाच मुलगा म्हणजे विजय. शाळेच्या नावाखाली घराबाहेर पडणे आणि चरस विकून पैसा कमावणे हे ह्यांचे काम. बालगुन्हेगारी आणि झोपडपट्टीतले दारिद्र्य हा विषय ह्या चित्रपटाचा अग्रभागी असताना देखील हे दोन्ही विषय म्हणावे तसे प्रेक्षकांच्या समोर येत नाहीत. रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे. एका मिनिटासाठी दाखवलेले पायरेटेड सिडी, विषारी दारू, चरस, लोकांची विक्री हे धंदे म्हणजे झोपडपट्टीचे गुन्हेगारी विश्व नाही आणि 'भाई इसने अपुनका माल लिया वापस नही देता' म्हणणारी पोरे दाखवणे म्हणजे बालगुन्हेगारी न्हवे.<br />
<br />
तर ह्या दोघा जय-विरुची आई सुहासिनी मुळे फारच आजारी पडते तिच्या उपचारांवरचा खर्च वाढतच असतो. अशातच पैसा म्हणजेच ह्या भुलभुलय्यातील ताकद आहे हा साक्षाक्तार झालेले विजय आणि याकुब आता मोठा हात मारायचा ठरवतात. त्यासाठी ते भुलभुलय्याच्या दादाचे सहहाय घेतात. आपल्याच वयाच्या चार/पाच मुलांना घेऊन हे दोघेही भरदुपारी एका सोनाराचे दुकान लुटतात आणि मोठा डल्ला मारतात. वचन दिल्याप्रमाणे दादा आपला हिस्सा न देत सगळाच माल घशात घालतोय हे पाहून दोघांचे रक्त खवळते, त्यातच दादा याकुबवर हात उचलतो आणि संतापाच्या भरात दादाच्याच बंदुकीतून विजय दादावर गोळी झाडतो. जखमी दादाला रस्त्यात सोडून दोघेही मालासकट पळ काढतात. इकडे दादाची जागा घ्यायचे स्वप्ने पाहणारा त्याचा उजवा हात ह्या संधीचा फायदा घेऊन दादाची हत्या करतो आणि आळ विजय आणि याकुबवर ढकलतो.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/13ac47b4.jpg" alt="" /><br />
<br />
चोरी, खून, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांची एकत्र शिक्षा म्हणून त्या दोघांनाही बाल सुधारगृहात पाठवले जाते. बाल सुधारगृहात फक्त १७ वर्षापर्यंतचे गुन्हेगार राहू शकत असताना इथे मात्र चक्क २०-२२ वर्षाची मुले आरामात राहतं असतात आणि 'के टी' नावाच्या एका त्यांच्याच वयाच्या बायल्याच्या हाताखाली टोळी देखील चालवत असतात. जी सुधारगृहात चरस विकून मुबलक पैसा कमावत असते. ह्या सगळ्याला आशीर्वाद असतो तो सुधारगृहाच्या वॉर्डनचा म्हणजेच नसिरुद्दिन शहाचा. <br />
<br />
भुलभुलय्याच्या तालमीत तयार झालेले याकुब आणि विजय सुधारगृहात स्वस्तात चरस विकायला सुरुवात करतात आणि इथेच संघर्षाची ठिणगी पेटते. केलेल्या कृत्याचे फळ म्हणून इतर मोठ्या मुलांकडून मार तर मिळतोच वर नसिरुद्दिनच्या आशीर्वादाने त्यांना अनैसर्गिक अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते. ह्यातच सुहासिनी मुळे मरण पावते. एकमेकांना सावरत दिवस ढकलणारे याकुब आणि विजय योग्य संधी मिळताच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या 'के टी' चा खून करतात. खुनामुळे खळबळ माजल्याने एक कमिशन नियुक्त केले जाते, ज्यात खुनी कोण आहे हे कळत नाही पण इतर अवैध धंदे उघड झाल्याने वॉर्डनं नसिरुद्दिन शहाची मात्र हकालपट्टी होते. एक दिवशी सुधारगृहातून बाहेर पडून भुलभुलय्याचे बेताज बादशहा बनण्याचे स्वप्न पाहणारे याकुब आणि विजय आता सुधारगृहाचे भाई बनतात.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/allah-ke-banday-05-12x9.jpg" alt="" /><br />
<br />
काही वर्षात (म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी) दोघेही सुधारगॄहातून बाहेर पडतात आणि उराशी जपलेले स्वप्न साकारायला पुन्हा भुलभुलय्यात हजर होतात. जुना मित्र रमेश (झाकीर हुसेन) च्या सहहायाने ते भुलभुलय्यामधील लहानग्या मुलांची एक टोळी तयार करतात आणि आपल्या काळ्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवतात. घरी दोन वेळ जेवणाचे वांदे असणाऱ्या पण हातात चित्रकलेची जादू असलेल्या सक्षम देशपांडे सारख्या कोवळ्या मुलांच्या ह्या टोळीत समावेश असतो. ह्या सर्वाची माहिती मिळाल्यावर भुलभुलय्यामध्ये एक छोटीशी शाळा चालवणारा आदर्श शिक्षक अश्विन परांजपे (अतुल कुलकर्णी) ह्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला म्हणावे तसे यश येत नाही. अतुल कुलकर्णीच्या पत्नीच्या भूमिकेत बऱ्याच दिवसांनंतर होणारे रुखसारचे दर्शन मन प्रसन्न करणारे. इथून पुढे सुरू होतो तो भुलभुलय्याच्या काळ्या साम्राज्यावर पकड घेण्याचा खेळ... आणि एका तद्दन गल्लाभरू चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपटाची वाटचाल सुरू होते.<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/97859848.jpg" width="300" height="300" alt="" /> <img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/rukhsar-poster.jpg" alt="" /><br />
<br />
ह्यानंतर विजयच्या आयुष्यात संध्या (अंजना सुखानी) चे आगमन, हल्ल्याला प्रत्युत्तर देताना विजयच्याच गोळीमुळे सक्षम देशपांडेचा मृत्यू आणि त्यामुळे अंतर्बाह्य पालटलेला विजय अशा नेहमीच्या रस्त्याने गाडी निघते. चित्रपटाचा शेवट तर निव्वळ बकवास!!<br />
<br />
<img src="http://i42.photobucket.com/albums/e335/PrAsI/Movies/Anjana-Sukhani-in-ALLAH-KE-BANDAY.jpg" width="300" height="300" alt="" /><br />
<br />
विजय च्या भूमिकेत शर्मन जोशी बराच चांगला अभिनय करून गेला आहे. कमावलेले शरीर बरे दिसत असले तरी सतत गंजीफ्रॉकावर वावरायचे नसते हे कळले असते तर अजून बरे झाले असते. चित्रपटाच्या शेवटी शेवटी काही दृश्यात त्याची खोटी दाढी इतकी विनोदी दिसते की फिस्सकन हसून फुटते. याकुबच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक फारुक कबीर आहे. हा याकुब, हा याकुब कमी आणि येडा याकुब जास्ती वाटतो. गँगस्टर म्हणजे केस वेडे वाकडे वाढवलेला, विकृत हसणारा, बंदूक तिरकी तुरकी करत गोळ्या मारणारा नसतो हे ह्यांना कधी कळणार? चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि त्या जोडीचे समूहगान तर असह्य ह्या सदरात मोडणारे. अक्षरशः विनाकारण जागोजागी ह्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा वापर का केला आहे ते लक्षात येत नाही.<br />
<br />
तात्पर्य काय तर 'दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ. ' <br />
<br />
<br />
<br />
<a href="http://www.zabrigraphics.com/Glitter-Generator/"><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/p.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/r.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/s.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/a.gif" border="0" alt=""><img src="http://gallery.zabrigraphics.com/gl/12/d.gif" border="0" alt=""></a>PrAsIhttp://www.blogger.com/profile/03682332159546973852noreply@blogger.com0