सोमवार, १३ एप्रिल, २००९

ताई आणी दादा

दादा :- या या या , या ताई...

ताई :- नमस्कार दादा. कसा आहेस ?

दादा :- मी अगदी मनसे मजेत आहे, तु कशी आहेस ? आज अचानक इकडे कसे काय येणे केलेस ?

ताई :- अरे दादा, आज गुढीपाडवा, तुला आणी तुझ्या पक्षाला सुयश आणी किर्ती मिळो आणी तुझा पक्ष खुप मोठा होवो अशा शुभेच्छा द्यायला आलिये मी.

दादा :- खरच गहिवरुन आले बघ, तुमच्या सारख्यांचे पाठबळ खुप मोलाचे वाटते.

ताई :- अरे वरचेवर भेटत नसलो आणी तु आता घर सोडून गेलास म्हणुन काय झाले ? मी मनानी कायम तुझ्याच मागे उभे होते. बाबा तर कायम म्हणायचेच की तु असा दबुन राहाणारा नाहीस, तु नक्कीच काहितरी भरीव करुन दाखवणार.

दादा :- हो फार प्रेम होते त्यांचे माझ्यावर, आज असते तर त्यांचे मार्गदर्शन खुप कामाला आले असते.असो, तु सांग आज कसे काय येणे केलेस ?

ताई :- काय सांगु दादा, कल्याण मध्ये गोरगरीबांसाठी पुढिल ५ वर्ष एक समाजोपयोगी संस्था उघडावी असे खुप मनात आहे. त्या 'कमळ' बॅंके कडे कर्ज मागायला गेले होते, खरे तर बाबा एकेकाळी त्या बॅंकेचे एक संचालक पण मला बॅंकेनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मामाचे पण त्या बॅंकेत मोठे बचत खाते आहे पण त्याचे सुद्धा काहि चालले नाही रे !

दादा :- नको ताई, अशा सणावारी नको डोळ्यातुन पाणी काढुस. मी आहे ना.

ताई :- हो रे, म्हणुनच तुझ्याकडे धावले, जेष्ठ लोक म्हणाले की 'रेल्वे इंजीन बॅंकेनी' ह्या सहामाहीत चांगलाच नफा दाखवला आहे आणी बॅंक तरुण उद्योजकांना प्रोत्साहनही देत आहे.

दादा :- हो ग ताई, तु काहि काळजी करु नकोस. आमची बॅंक तुझ्या मागे भक्कमपणे उभी राहिल. फक्त तुला इतर सगळे शेअर विकुन टाकुन फक्त आमच्या 'मराठी विकास' उद्योगाचे शेअर खरेदी करावे लागतील.

ताई :- आनंदाने करीन दादा. गरीबांच्या विकासासाठी आणी बाबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी सगळे करीन. त्यतुन त्या 'कमळ' बॅंकेतल्या जेष्ठांच्या बचत खात्यातली रक्कमही संपत चालली आहे तेंव्हा ते ही लवकरच आपल्या बॅंकेचे सभासद होउन आपल्याला मार्गदर्शन करतीलच.

दादा :- भले शाब्बास ! अग शर्मीला श्रीखंड आण ग, बघ तरी कोण आलय ते.

(वरील घटना हि पुर्णपणे काल्पनीक असुन, भावा बहिणीतील प्रेम दाखवणारी आहे. तिचे इतर कुठल्या घटनेशी साम्य अढळल्यास तो एक योगायोग समजावा.)

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा